शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

कुर्डूवाडीत स्वच्छतेचा होतोय जागर ! नगरपरिषदेचा उपक्रम : आठवडा बाजारातील कचरा रात्रीच उचलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 15:41 IST

नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत सर्वेक्षण- २०१८ हे मिशन हाती घेतले असून, शहरात सर्वच ठिकाणी स्वच्छतेचा जागर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक पथके कार्यरतनगरपरिषदेचे एक पाऊल पुढे तर शहरवासीयांनी दोन पावले पुढे टाकून सहकार्य करावे : समीर मुलाणीच्नगरपरिषदेकडून स्वच्छतेबाबत इंजिनिअर्स अ‍ॅप आणि स्वच्छता अ‍ॅप नागरिकांच्या सोयीसाठी

आॅनलाइन लोकमत सोलापूरकुर्डूवाडी दि २३  : नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत सर्वेक्षण- २०१८ हे मिशन हाती घेतले असून, शहरात सर्वच ठिकाणी स्वच्छतेचा जागर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक पथके कार्यरत असून, शाळा-महाविद्यालये, हॉटेल्स, दवाखाने, उद्योगधंदे आदी ठिकाणी पथकातील अधिकारी, कर्मचारी स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगणार असल्याचे मुख्याधिकारी कैलास गावडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.शहरात आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांच्या मार्गदर्शनाखाली खास नियोजन करण्यात आले असून, दिवसा रहदारीला अडथळा होऊ नये म्हणून आठवडा बाजारातील कचरा रात्री ८ ते १० या वेळेत उचलला जाणार आहे. शहराचे मुख्य ५ विभाग करण्यात आले असून, या भागासाठी दोन मुकादम नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या निरीक्षणात सर्व मुख्य रस्ते, उपरस्ते झाडण्यात येत आहेत. स्वच्छ शहर सर्वेक्षण २०१८ मध्ये शहरातील ५ वॉर्डात ५ घंटागाड्या प्रत्येक गाडीत एक कर्मचारी व चालक यांची नेमणूक करण्यात आली आहे. सुका व ओला कचरा याचेही नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी, व्यावसायिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करुन दिला नाही तर तो कचरा स्वीकारणार नाही, असेही मुख्याधिकारी कैलास गावडे यांनी सांगितले.------------------------------स्वच्छता अ‍ॅप कार्यरतच्नगरपरिषदेकडून स्वच्छतेबाबत इंजिनिअर्स अ‍ॅप आणि स्वच्छता अ‍ॅप नागरिकांच्या सोयीसाठी कार्यान्वित करण्यात आले असून, या अ‍ॅपवरच नागरिकांनी आपल्या भागातील तक्रारी, समस्या फोटो व नावासह दाखल करु शकतात. त्यानंतर या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी गावडे म्हणाले.----------------------------नगरपरिषदेचे एक पाऊल पुढे तर शहरवासीयांनी दोन पावले पुढे टाकून सहकार्य करावे. स्वच्छतेच्या मिशनमध्ये नगरपरिषदेने यशस्वी होण्याचा आणि प्रथम तीन क्रमांकात येण्याचा निर्धार केला आहे. यासाठी शहरातील नागरिक, व्यापारी, युवक-युवती, महिला, उद्योजक, डॉक्टर आदींनी सहकार्य करावे. साºयांनी ‘स्वच्छ कुर्डूवाडी-सुंदर कुर्डूवाडी’चा संकल्प करावा. -समीर मुलाणी, नगराध्यक्ष

टॅग्स :SolapurसोलापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान