शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जळत्या चितेच्या साक्षीनं ‘स्वच्छता विधी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 14:02 IST

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम : इतकेच मला झाडताना, सरणालागुनि कळले होते.. झाडूंनी केली सुटका, कचºयाने छळले होते..

ठळक मुद्देसकाळी ७ पासून १0.३0 पर्यंत १२५ ते १५० सदस्यांनी पावसाची पर्वा न करता संपूर्ण स्मशानभूमीची स्वच्छता केलीकोणताही साधक थकत नव्हता किंवा बसत नव्हता, जेवढं शक्य होईल तेवढ्या क्षमतेने स्वच्छता करीत होताअंत्यविधीनंतर त्याच ठिकाणी टाकण्यात आलेल्या तिरड्या, हार, फुले, कपडे, गादी, उशा आदी साहित्य साधक गोळा करत होते

सोलापूर : जन्माला आलेली व्यक्ती एक ना एक दिवस जगाचा निरोप घेणारच... शनिवारी रात्री अंत्यसंस्कार केलेली चिता सकाळपर्यंत जळत होती. एकीकडे चिता जळत असताना दुसरीकडे धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य कठड्याखाली व आजूबाजूला पडलेली राख आणि कचरा गोळा करीत होते. सकाळी ७ पासून १0.३0 पर्यंत १२५ ते १५० सदस्यांनी पावसाची पर्वा न करता संपूर्ण स्मशानभूमीची स्वच्छता केली. 

शहर उत्तरमध्ये मृत्यू होणाºया सर्व जाती-धर्माच्या लोकांचा अंत्यविधी जुना पुणे नाका येथील बाळे स्मशानभूमीत केला जातो. ५ ते ६ एकरातील स्मशानभूमीत सध्या प्रेतांना जाळून अंत्यसंस्कार केला जातो. आजूबाजूच्या परिसरात अनेक मृतदेह जमिनीमध्ये पुरण्यात आले आहेत. स्मशानभूमीत मृतदेह पुरण्यात आलेल्या जागेत काटेरी झुडपे तयार झालेली होती. साधकांनी डोक्यावरच्या पावसाचा विचार न करता स्वत:सोबत आलेल्या दातºया व कुºहाडीने स्वच्छता करण्यास सुरुवात केली.

थडग्यांवरील काटेरी झुडपे व वेली काढत साधकांनी एकमेकांच्या सहायाने स्वच्छता केली. लहान-मोठे वृक्ष कुºहाडीने तोडून बाहेर काढले. काढलेली काटेरी झाडे गोळा करून ती एका ठिकाणी ठेवली जात होती. अंत्यविधीसाठी वापरल्या जाणाºया गवºयांचा भुगा गोळा केला जात होता. जमा केलेला कचरा साधक दोघा- तिघांच्या मदतीने महापालिकेच्या कचरा गाडीत टाकत होते. 

कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही.  फार झालं तर एखादी दुसरी सूचना सहकाºयाला केली जात होती; मात्र कोणी कोणाला आदेश देणार नाही. घाण आहे असे लक्षात आले की तो साधक स्वत:हून पुढे होऊन स्वच्छता करीत होता. स्मशानभूमीतील कडेकोपरे, भिंती, बसण्याचे ठिकाण सर्व ठिकाणं कार्यकर्त्यांनी वाटून घेतली होती. अंत्यविधीनंतर त्याच ठिकाणी टाकण्यात आलेल्या तिरड्या, हार, फुले, कपडे, गादी, उशा आदी साहित्य साधक गोळा करत होते. कोणताही साधक थकत नव्हता किंवा बसत नव्हता, जेवढं शक्य होईल तेवढ्या क्षमतेने स्वच्छता करीत होता. पाहता पाहता संपूर्ण स्मशानभूमी साधकांनी चकाचक केली आणि पुढच्या स्मशानभूमीकडे आपला मोर्चा वळवला. 

- स्मशानभूमी - 11- सदस्य संख्या - 3300- मिनिटे मोहीम - 330- टन कचरा- 140- 16 टन दगडं

टॅग्स :SolapurसोलापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान