शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

जळत्या चितेच्या साक्षीनं ‘स्वच्छता विधी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 14:02 IST

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम : इतकेच मला झाडताना, सरणालागुनि कळले होते.. झाडूंनी केली सुटका, कचºयाने छळले होते..

ठळक मुद्देसकाळी ७ पासून १0.३0 पर्यंत १२५ ते १५० सदस्यांनी पावसाची पर्वा न करता संपूर्ण स्मशानभूमीची स्वच्छता केलीकोणताही साधक थकत नव्हता किंवा बसत नव्हता, जेवढं शक्य होईल तेवढ्या क्षमतेने स्वच्छता करीत होताअंत्यविधीनंतर त्याच ठिकाणी टाकण्यात आलेल्या तिरड्या, हार, फुले, कपडे, गादी, उशा आदी साहित्य साधक गोळा करत होते

सोलापूर : जन्माला आलेली व्यक्ती एक ना एक दिवस जगाचा निरोप घेणारच... शनिवारी रात्री अंत्यसंस्कार केलेली चिता सकाळपर्यंत जळत होती. एकीकडे चिता जळत असताना दुसरीकडे धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य कठड्याखाली व आजूबाजूला पडलेली राख आणि कचरा गोळा करीत होते. सकाळी ७ पासून १0.३0 पर्यंत १२५ ते १५० सदस्यांनी पावसाची पर्वा न करता संपूर्ण स्मशानभूमीची स्वच्छता केली. 

शहर उत्तरमध्ये मृत्यू होणाºया सर्व जाती-धर्माच्या लोकांचा अंत्यविधी जुना पुणे नाका येथील बाळे स्मशानभूमीत केला जातो. ५ ते ६ एकरातील स्मशानभूमीत सध्या प्रेतांना जाळून अंत्यसंस्कार केला जातो. आजूबाजूच्या परिसरात अनेक मृतदेह जमिनीमध्ये पुरण्यात आले आहेत. स्मशानभूमीत मृतदेह पुरण्यात आलेल्या जागेत काटेरी झुडपे तयार झालेली होती. साधकांनी डोक्यावरच्या पावसाचा विचार न करता स्वत:सोबत आलेल्या दातºया व कुºहाडीने स्वच्छता करण्यास सुरुवात केली.

थडग्यांवरील काटेरी झुडपे व वेली काढत साधकांनी एकमेकांच्या सहायाने स्वच्छता केली. लहान-मोठे वृक्ष कुºहाडीने तोडून बाहेर काढले. काढलेली काटेरी झाडे गोळा करून ती एका ठिकाणी ठेवली जात होती. अंत्यविधीसाठी वापरल्या जाणाºया गवºयांचा भुगा गोळा केला जात होता. जमा केलेला कचरा साधक दोघा- तिघांच्या मदतीने महापालिकेच्या कचरा गाडीत टाकत होते. 

कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही.  फार झालं तर एखादी दुसरी सूचना सहकाºयाला केली जात होती; मात्र कोणी कोणाला आदेश देणार नाही. घाण आहे असे लक्षात आले की तो साधक स्वत:हून पुढे होऊन स्वच्छता करीत होता. स्मशानभूमीतील कडेकोपरे, भिंती, बसण्याचे ठिकाण सर्व ठिकाणं कार्यकर्त्यांनी वाटून घेतली होती. अंत्यविधीनंतर त्याच ठिकाणी टाकण्यात आलेल्या तिरड्या, हार, फुले, कपडे, गादी, उशा आदी साहित्य साधक गोळा करत होते. कोणताही साधक थकत नव्हता किंवा बसत नव्हता, जेवढं शक्य होईल तेवढ्या क्षमतेने स्वच्छता करीत होता. पाहता पाहता संपूर्ण स्मशानभूमी साधकांनी चकाचक केली आणि पुढच्या स्मशानभूमीकडे आपला मोर्चा वळवला. 

- स्मशानभूमी - 11- सदस्य संख्या - 3300- मिनिटे मोहीम - 330- टन कचरा- 140- 16 टन दगडं

टॅग्स :SolapurसोलापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान