शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

सोलापूर : चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड प्रश्न चिघळला, चार तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिली निवेदने

By संताजी शिंदे | Updated: March 2, 2023 18:57 IST

आम्ही शेती देणार नाही, तुमचा मोबदला मान्य नाही, शेतकऱ्यांचे आंदोलन.

सोलापूर - बहुचर्चित चेन्नई सूरत ग्रीनफिल्ड हायवेच्या संदर्भात भुसंपादनाचा विषय दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. दोन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात घडामोडी सुरू आहेत. गुरुवारी यासंदर्भात पुन्हा संघर्ष दिसून आला. तुमचा मोबदला आम्हाला मान्य नाही, आमची शेती रस्त्याच्या निर्मितीसाठी तुम्हाला देणार नाही असे वैयक्तिक लेखी निवेदन अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व बार्शीच्या हजारो शेतकऱ्यांनी भुसंपादन कार्यालय-११ यांच्याकडे दिली. अत्यल्प मावेजाच्या नोटिशीला जमिनी न देण्याची लेखी हरकत शेतकऱ्यांनी घेतली. अक्कलकोटच्या सुरत चेन्नई ग्रीन फील्ड संघर्ष समितीने या आंदोलनाचे नेतृत्व केले.

यावेळी भाजपाचे नेते बाळासाहेब मोरे यांनी समृद्धी महामार्गप्रमाणे दर दिला नाही, तर शेतकऱ्यांसाठी गोळ्या झेलण्यास तयार आहोत असे सांगितले. ग्रीन कॉरिडोर राष्ट्रीय महामार्गासाठी दिला जाणाऱ्या मावेजाची रक्कम एकरी पाच लाख आणि बागायत जमिनीसाठी सात लाख इतके अत्यल्प आहे. शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या शासनाचा सुलतानी अधिग्रहण कायदा तातडीने रद्द व्हावा. महामार्गासाठी एक इंचही जमीन देऊ नये असे आवाहन केले.

अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष स्वामीनाथ हरवाळकर म्हणाले की, महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गासाठी वेगळा राष्ट्रीय महामार्गासाठी वेगळा आणि ग्रीन फील्ड साठी वेगळा कायदा करून शासनाने शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या जमिनी खुल्या दराने स्क्वेअर फुट  प्रमाणे घ्यावा व तसा कायदा व्हावा, यासाठी सोमवार ६ मार्च रोजी अक्कलकोट सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

बार्शी येथील संघर्ष समितीचे कार्यकर्ते ओम पाटील,नानासाहेब पाटील,प्रकाश गुंड हे बोलताना म्हणाले, शासकीय अधिकाऱ्याच्या पगारी कमी होत नाहीत पण शेतकऱ्याच्या जमिनीचे दर कधीही कमी जास्त होतात. सध्या राज्यात शेतकरी विरोधी सरकार असल्याचं आम्हाला भास होत आहे,असे सांगितले. यावेळी बहुसंख्येने बाधित शेतकरी उपस्थित होते. यावेळी शासनाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली.

सोमवारी होणार चक्का जाम आंदोलन - मोरेयाअगोदर आम्ही शासनाने दिलेल्या मावेजा संदर्भातील नोटीसा जाळून आमचा रोष दाखवला आहे. हा रोष आणखी तीव्र होऊ नये यासाठी दोन दिवसात यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,संबंधित लोकप्रतिनिधी व संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांची बैठक लावून आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात. ही आमची मागणी आहे. अन्यथा येत्या सोमवारी ६ मार्च रोजी अक्कलकोट सोलापूर महामार्गावर ब्यागेहळ्ळी फाटा येथे चक्का जाम आंदोलन करणार आहोत अशी माहिती चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड संघर्ष समिती, अक्कलकोटचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी यावेळी दिली

टॅग्स :Solapurसोलापूर