शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

बदलत्या वस्तीची कहानी; ‘नई जिंदगी’त घडलेल्या पोलीस, शिक्षक, वकील मंडळींनी काळा डाग पुसून दाखविली ‘नई जिंदगानी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 15:11 IST

काशिनाथ वाघमारे ।  सोलापूर : एकेकाळी राहायला जागा नव्हती..ग़ुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सैफनला सुधारण्याची संधी दिली..त्यांनीच वसाहत निर्माण केली..अनेक कुटुंबं वसली..या ...

ठळक मुद्देबदलत्या वस्तीची कहानी; ‘नई जिंदगी’त घडलेल्या पोलीस, शिक्षक, वकील मंडळींनी काळा डाग पुसून दाखविली ‘नई जिंदगानी’नव्याने जीवन जगणाºया नई जिंदगीने  एकात्मता आणि शांततेचाही संदेश महापालिकेने १९९२ साली ही वसाहत हद्दवाढ भागात समाविष्ट करुन सेवा- सुविधा दिल्या

काशिनाथ वाघमारे । 

सोलापूर : एकेकाळी राहायला जागा नव्हती..ग़ुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सैफनला सुधारण्याची संधी दिली..त्यांनीच वसाहत निर्माण केली..अनेक कुटुंबं वसली..या वसाहतीतून आता डॉक्टर, इंजिनिअर, वकील, पोलीस अधिकारी घडले़ शिक्षक आणि सुज्ञ नागरिकांची वसाहत म्हणून नई जिंदगीला पाहिले जाऊ लागले..नव्याने जीवन जगणाºया नई जिंदगीने  एकात्मता आणि शांततेचाही संदेश दिला आहे.

१९७८ पूर्वी नई जिंदगी अस्तित्वात नव्हती़ या ठिकाणी कोणी असायचे तर ते समाजाला आणि पोलिसांना त्रासदायी होते़ त्यामुळे येथे कोणीही वास्तव्याला यायचे नाही़ या परिसरात सैफन मुल्ला ही चर्चेतली व्यक्ती होऊन गेली़ समाजात अनेक घटना घडायच्या तेव्हा अशा व्यक्तींची नावे पुढे यायची़ मजरेवाडीचे तत्कालीन सरपंच महादेव ताकमोगे आणि आप्पासाहेब हत्तुरे यांनी पाणी आणि इतर मूलभूत सेवा-सुविधा देऊन माणुसकी दाखवली.

१९८९ साली  दरम्यान खासदार धर्मण्णा सादूल हे निवडणूक लढत होते़ सेवा-सुविधा कुणी देत नसल्याने काही मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला. सुशीलकुमार शिंदे यांनी या परिसराला आसरा चौकातून पाईपलाईन टाकून देण्याचे आश्वासन दिले तेव्हा बहिष्कार हटला़ त्यानंतर  महापालिकेने १९९२ साली ही वसाहत हद्दवाढ भागात समाविष्ट करुन सेवा- सुविधा दिल्या. विकासकामांच्या रुपातून आणि माणसांनी स्वीकारलेल्या बदलाच्या रुपाने कात टाकली आहे.

या नई जिंदगीतून सध्याला बीडमध्ये कार्यरत असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शौकत सय्यद, फौजदार मुबारक शेख, फौजदार नागेश म्हात्रे, अ‍ॅड़ राजू म्हात्रे, १० रेल्वे कर्मचारी, पाच सैनिक, २५-३० पोलीस, सिव्हिल इंजिनिअर, डिप्लोमा, तीन एमबीबीएस डॉक्टरसह नगरसेवक बाबामिस्त्री अशी राजकारणे माणसं घडली.

सैफन मुल्ला नव्हे वाल्याचा वाल्मीकी- नई जिंदगी वसाहत वसवणारा सैफन मुल्ला हा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला होता़ पोलिसांचा ससेमिरा मागे असायचा़ एकदा पोलिसांनीच अर्थात तत्कालीन अधिकारी चरणसिंग यांनी त्याला सुधारण्याची संधी दिली आणि यापुढे पोलीस कारवाई थांबेल, अशी ग्वाही दिली़ त्याने ते मानले आणि नई जिंदगीतील अनेक जमिनीवर अनेकांची घरे उभारुन दिली़  ही जागा अर्बन सिलींग होती़ अर्थात वाल्याचा वाल्मीकी असाही प्रवास त्याच्या वाटेला आला़ ही वस्ती वसवण्यात कोरे, म्हेत्रे अशाही काही लोकांचे योगदान आहे़ 

अन् नई जिंदगी असे नामकरण झाले- १९७८ च्या नई जिंदगीत ना रस्ता, ना वीज, ना पाणी़ या वस्तीत सैफन मुल्लाने अनेक बांधवांना राहायला जागा दिली़ अनेकांनी छोटा-मोठा व्यवसाय येथे सुुरु केला़ कोणी चहा कँटिन, कोणी सायकल दुकान तर कोणी अन्य व्यवसाय सुरु केला़ आज या नई जिंदगीत जवळपास ५० हजार लोक राहतात़ १९७८ पूर्वी या वसाहतीत काहीच नव्हते़ नव्याने एक नगर वसले़ अनेकांचे संसार नव्याने फुलले़ त्यामुळे सैफन मुल्लाने या परिसराला ‘नई जिंदगी’ असे नामकरण केले़

टॅग्स :Solapurसोलापूर