शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

बदलत्या वस्तीची कहानी; ‘नई जिंदगी’त घडलेल्या पोलीस, शिक्षक, वकील मंडळींनी काळा डाग पुसून दाखविली ‘नई जिंदगानी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 15:11 IST

काशिनाथ वाघमारे ।  सोलापूर : एकेकाळी राहायला जागा नव्हती..ग़ुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सैफनला सुधारण्याची संधी दिली..त्यांनीच वसाहत निर्माण केली..अनेक कुटुंबं वसली..या ...

ठळक मुद्देबदलत्या वस्तीची कहानी; ‘नई जिंदगी’त घडलेल्या पोलीस, शिक्षक, वकील मंडळींनी काळा डाग पुसून दाखविली ‘नई जिंदगानी’नव्याने जीवन जगणाºया नई जिंदगीने  एकात्मता आणि शांततेचाही संदेश महापालिकेने १९९२ साली ही वसाहत हद्दवाढ भागात समाविष्ट करुन सेवा- सुविधा दिल्या

काशिनाथ वाघमारे । 

सोलापूर : एकेकाळी राहायला जागा नव्हती..ग़ुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सैफनला सुधारण्याची संधी दिली..त्यांनीच वसाहत निर्माण केली..अनेक कुटुंबं वसली..या वसाहतीतून आता डॉक्टर, इंजिनिअर, वकील, पोलीस अधिकारी घडले़ शिक्षक आणि सुज्ञ नागरिकांची वसाहत म्हणून नई जिंदगीला पाहिले जाऊ लागले..नव्याने जीवन जगणाºया नई जिंदगीने  एकात्मता आणि शांततेचाही संदेश दिला आहे.

१९७८ पूर्वी नई जिंदगी अस्तित्वात नव्हती़ या ठिकाणी कोणी असायचे तर ते समाजाला आणि पोलिसांना त्रासदायी होते़ त्यामुळे येथे कोणीही वास्तव्याला यायचे नाही़ या परिसरात सैफन मुल्ला ही चर्चेतली व्यक्ती होऊन गेली़ समाजात अनेक घटना घडायच्या तेव्हा अशा व्यक्तींची नावे पुढे यायची़ मजरेवाडीचे तत्कालीन सरपंच महादेव ताकमोगे आणि आप्पासाहेब हत्तुरे यांनी पाणी आणि इतर मूलभूत सेवा-सुविधा देऊन माणुसकी दाखवली.

१९८९ साली  दरम्यान खासदार धर्मण्णा सादूल हे निवडणूक लढत होते़ सेवा-सुविधा कुणी देत नसल्याने काही मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला. सुशीलकुमार शिंदे यांनी या परिसराला आसरा चौकातून पाईपलाईन टाकून देण्याचे आश्वासन दिले तेव्हा बहिष्कार हटला़ त्यानंतर  महापालिकेने १९९२ साली ही वसाहत हद्दवाढ भागात समाविष्ट करुन सेवा- सुविधा दिल्या. विकासकामांच्या रुपातून आणि माणसांनी स्वीकारलेल्या बदलाच्या रुपाने कात टाकली आहे.

या नई जिंदगीतून सध्याला बीडमध्ये कार्यरत असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शौकत सय्यद, फौजदार मुबारक शेख, फौजदार नागेश म्हात्रे, अ‍ॅड़ राजू म्हात्रे, १० रेल्वे कर्मचारी, पाच सैनिक, २५-३० पोलीस, सिव्हिल इंजिनिअर, डिप्लोमा, तीन एमबीबीएस डॉक्टरसह नगरसेवक बाबामिस्त्री अशी राजकारणे माणसं घडली.

सैफन मुल्ला नव्हे वाल्याचा वाल्मीकी- नई जिंदगी वसाहत वसवणारा सैफन मुल्ला हा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला होता़ पोलिसांचा ससेमिरा मागे असायचा़ एकदा पोलिसांनीच अर्थात तत्कालीन अधिकारी चरणसिंग यांनी त्याला सुधारण्याची संधी दिली आणि यापुढे पोलीस कारवाई थांबेल, अशी ग्वाही दिली़ त्याने ते मानले आणि नई जिंदगीतील अनेक जमिनीवर अनेकांची घरे उभारुन दिली़  ही जागा अर्बन सिलींग होती़ अर्थात वाल्याचा वाल्मीकी असाही प्रवास त्याच्या वाटेला आला़ ही वस्ती वसवण्यात कोरे, म्हेत्रे अशाही काही लोकांचे योगदान आहे़ 

अन् नई जिंदगी असे नामकरण झाले- १९७८ च्या नई जिंदगीत ना रस्ता, ना वीज, ना पाणी़ या वस्तीत सैफन मुल्लाने अनेक बांधवांना राहायला जागा दिली़ अनेकांनी छोटा-मोठा व्यवसाय येथे सुुरु केला़ कोणी चहा कँटिन, कोणी सायकल दुकान तर कोणी अन्य व्यवसाय सुरु केला़ आज या नई जिंदगीत जवळपास ५० हजार लोक राहतात़ १९७८ पूर्वी या वसाहतीत काहीच नव्हते़ नव्याने एक नगर वसले़ अनेकांचे संसार नव्याने फुलले़ त्यामुळे सैफन मुल्लाने या परिसराला ‘नई जिंदगी’ असे नामकरण केले़

टॅग्स :Solapurसोलापूर