शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

बदललेल्या निकषांमुळे एकाही शेतकऱ्याला लाभ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST

गतवर्षी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत पावसाचा खंड हा निकषच काढून टाकल्याने त्याचा मोठा फटका फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना ...

गतवर्षी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत पावसाचा खंड हा निकषच काढून टाकल्याने त्याचा मोठा फटका फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. गतवर्षी जिल्ह्यातील ९१ मंडलात सलग पाच दिवस दररोज २५ मि.मी. पावसाची नोंद होऊनही जिल्ह्यातील एकही शेतकरी भरपाईसाठी पात्र ठरला नाही. जिल्ह्यातील २४ हजार ८९६ फळ उत्पादक शेतकऱ्यांनी भारतीय कृषी विमा कंपनीकडे १० कोटी ७४ लाख १६ हजार रुपये भरले होते.

सुमारे १७ हजार १२ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले होते, तर विमा कंपनीकडे २१४ कोटी ६२ लाख ९९ हजार रुपये विमा रक्कम संरक्षित केली होती.

फळबागांसाठी असलेल्या पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विम्याच्या लाभासाठी ठरवलेल्या प्रमाणकांचे निकष चुकीच्या पद्धतीने ठरवल्याने शेतकऱ्यांचे १० कोटी ७४ लाख १६ हजार रुपये बुडाले. तर सरकारी धोरणानुसार विमा कंपन्या मालामाल झाल्या. त्यामुळे साहजिकच, या योजनेला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने वर्षभरानंतर कृषी विभागाला जाग आली असून, या योजनेसाठी कंपन्यांशी केलेला करार रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे.

नव्याने ई-निविदा मागविल्या

कृषी आयुक्तालयाच्या मुख्य सांख्यिकी विभागाने यासंबंधीचे पत्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पाठवले आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमायोजना २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या तीन वर्षांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेचा करार रद्द केल्याचे त्यात म्हटले आहे. तसेच मृग आणि आंबिया बहारांसाठी सन २०२१-२२ ते २०२३-२४ या कालावधी करता नव्याने ई-निविदा मागविल्या आहेत. लवकरच यासंदर्भात नवीन शासन निर्णय जाहीर होईल. त्यानंतरच पीकविमा संकेतस्थळ खुले करण्यात येईल, असेही म्हटले आहे.

तालुकानिहाय आकडेवारी

सांगोला १३,८९३ शेतकरी (५ कोटी ७६ लाख ३ हजार), मंगळवेढा ६,२०२ शेतकरी (३ कोटी १३ लाख ९६ हजार), पंढरपूर १३६२ शेतकरी (५६ लाख ७१ हजार), माळशिरस ९७४ शेतकरी (४१ लाख ४५ हजार), बार्शी ९२४ शेतकरी (१९ लाख ३६ हजार), मोहोळ ७४२ शेतकरी (३८ लाख ७४ हजार), माढा ४९२ शेतकरी (१५ लाख ३१ हजार), करमाळा २४५ शेतकरी (९ लाख ३२ हजार), दक्षिण सोलापूर २४ शेतकरी (१ लाख ३२ हजार), उत्तर सोलापूर २३ शेतकरी (९३ हजार), अक्कलकोट १६ शेतकरी (७६ हजार) अशा २४ हजार ८९६ शेतकऱ्यांनी विमा रकमेच्या हप्त्यांपोटी १० कोटी ७४ लाख १६ हजार रुपये विमा कंपनीकडे होते.