शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

बदललेल्या निकषांमुळे एकाही शेतकऱ्याला लाभ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST

गतवर्षी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत पावसाचा खंड हा निकषच काढून टाकल्याने त्याचा मोठा फटका फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना ...

गतवर्षी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत पावसाचा खंड हा निकषच काढून टाकल्याने त्याचा मोठा फटका फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. गतवर्षी जिल्ह्यातील ९१ मंडलात सलग पाच दिवस दररोज २५ मि.मी. पावसाची नोंद होऊनही जिल्ह्यातील एकही शेतकरी भरपाईसाठी पात्र ठरला नाही. जिल्ह्यातील २४ हजार ८९६ फळ उत्पादक शेतकऱ्यांनी भारतीय कृषी विमा कंपनीकडे १० कोटी ७४ लाख १६ हजार रुपये भरले होते.

सुमारे १७ हजार १२ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले होते, तर विमा कंपनीकडे २१४ कोटी ६२ लाख ९९ हजार रुपये विमा रक्कम संरक्षित केली होती.

फळबागांसाठी असलेल्या पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विम्याच्या लाभासाठी ठरवलेल्या प्रमाणकांचे निकष चुकीच्या पद्धतीने ठरवल्याने शेतकऱ्यांचे १० कोटी ७४ लाख १६ हजार रुपये बुडाले. तर सरकारी धोरणानुसार विमा कंपन्या मालामाल झाल्या. त्यामुळे साहजिकच, या योजनेला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने वर्षभरानंतर कृषी विभागाला जाग आली असून, या योजनेसाठी कंपन्यांशी केलेला करार रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे.

नव्याने ई-निविदा मागविल्या

कृषी आयुक्तालयाच्या मुख्य सांख्यिकी विभागाने यासंबंधीचे पत्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पाठवले आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमायोजना २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या तीन वर्षांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेचा करार रद्द केल्याचे त्यात म्हटले आहे. तसेच मृग आणि आंबिया बहारांसाठी सन २०२१-२२ ते २०२३-२४ या कालावधी करता नव्याने ई-निविदा मागविल्या आहेत. लवकरच यासंदर्भात नवीन शासन निर्णय जाहीर होईल. त्यानंतरच पीकविमा संकेतस्थळ खुले करण्यात येईल, असेही म्हटले आहे.

तालुकानिहाय आकडेवारी

सांगोला १३,८९३ शेतकरी (५ कोटी ७६ लाख ३ हजार), मंगळवेढा ६,२०२ शेतकरी (३ कोटी १३ लाख ९६ हजार), पंढरपूर १३६२ शेतकरी (५६ लाख ७१ हजार), माळशिरस ९७४ शेतकरी (४१ लाख ४५ हजार), बार्शी ९२४ शेतकरी (१९ लाख ३६ हजार), मोहोळ ७४२ शेतकरी (३८ लाख ७४ हजार), माढा ४९२ शेतकरी (१५ लाख ३१ हजार), करमाळा २४५ शेतकरी (९ लाख ३२ हजार), दक्षिण सोलापूर २४ शेतकरी (१ लाख ३२ हजार), उत्तर सोलापूर २३ शेतकरी (९३ हजार), अक्कलकोट १६ शेतकरी (७६ हजार) अशा २४ हजार ८९६ शेतकऱ्यांनी विमा रकमेच्या हप्त्यांपोटी १० कोटी ७४ लाख १६ हजार रुपये विमा कंपनीकडे होते.