शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

बदललेल्या निकषांमुळे एकाही शेतकऱ्याला लाभ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST

गतवर्षी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत पावसाचा खंड हा निकषच काढून टाकल्याने त्याचा मोठा फटका फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना ...

गतवर्षी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत पावसाचा खंड हा निकषच काढून टाकल्याने त्याचा मोठा फटका फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. गतवर्षी जिल्ह्यातील ९१ मंडलात सलग पाच दिवस दररोज २५ मि.मी. पावसाची नोंद होऊनही जिल्ह्यातील एकही शेतकरी भरपाईसाठी पात्र ठरला नाही. जिल्ह्यातील २४ हजार ८९६ फळ उत्पादक शेतकऱ्यांनी भारतीय कृषी विमा कंपनीकडे १० कोटी ७४ लाख १६ हजार रुपये भरले होते.

सुमारे १७ हजार १२ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले होते, तर विमा कंपनीकडे २१४ कोटी ६२ लाख ९९ हजार रुपये विमा रक्कम संरक्षित केली होती.

फळबागांसाठी असलेल्या पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विम्याच्या लाभासाठी ठरवलेल्या प्रमाणकांचे निकष चुकीच्या पद्धतीने ठरवल्याने शेतकऱ्यांचे १० कोटी ७४ लाख १६ हजार रुपये बुडाले. तर सरकारी धोरणानुसार विमा कंपन्या मालामाल झाल्या. त्यामुळे साहजिकच, या योजनेला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने वर्षभरानंतर कृषी विभागाला जाग आली असून, या योजनेसाठी कंपन्यांशी केलेला करार रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे.

नव्याने ई-निविदा मागविल्या

कृषी आयुक्तालयाच्या मुख्य सांख्यिकी विभागाने यासंबंधीचे पत्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पाठवले आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमायोजना २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या तीन वर्षांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेचा करार रद्द केल्याचे त्यात म्हटले आहे. तसेच मृग आणि आंबिया बहारांसाठी सन २०२१-२२ ते २०२३-२४ या कालावधी करता नव्याने ई-निविदा मागविल्या आहेत. लवकरच यासंदर्भात नवीन शासन निर्णय जाहीर होईल. त्यानंतरच पीकविमा संकेतस्थळ खुले करण्यात येईल, असेही म्हटले आहे.

तालुकानिहाय आकडेवारी

सांगोला १३,८९३ शेतकरी (५ कोटी ७६ लाख ३ हजार), मंगळवेढा ६,२०२ शेतकरी (३ कोटी १३ लाख ९६ हजार), पंढरपूर १३६२ शेतकरी (५६ लाख ७१ हजार), माळशिरस ९७४ शेतकरी (४१ लाख ४५ हजार), बार्शी ९२४ शेतकरी (१९ लाख ३६ हजार), मोहोळ ७४२ शेतकरी (३८ लाख ७४ हजार), माढा ४९२ शेतकरी (१५ लाख ३१ हजार), करमाळा २४५ शेतकरी (९ लाख ३२ हजार), दक्षिण सोलापूर २४ शेतकरी (१ लाख ३२ हजार), उत्तर सोलापूर २३ शेतकरी (९३ हजार), अक्कलकोट १६ शेतकरी (७६ हजार) अशा २४ हजार ८९६ शेतकऱ्यांनी विमा रकमेच्या हप्त्यांपोटी १० कोटी ७४ लाख १६ हजार रुपये विमा कंपनीकडे होते.