शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

बदललेल्या निकषांमुळे एकाही शेतकऱ्याला लाभ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST

गतवर्षी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत पावसाचा खंड हा निकषच काढून टाकल्याने त्याचा मोठा फटका फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना ...

गतवर्षी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत पावसाचा खंड हा निकषच काढून टाकल्याने त्याचा मोठा फटका फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. गतवर्षी जिल्ह्यातील ९१ मंडलात सलग पाच दिवस दररोज २५ मि.मी. पावसाची नोंद होऊनही जिल्ह्यातील एकही शेतकरी भरपाईसाठी पात्र ठरला नाही. जिल्ह्यातील २४ हजार ८९६ फळ उत्पादक शेतकऱ्यांनी भारतीय कृषी विमा कंपनीकडे १० कोटी ७४ लाख १६ हजार रुपये भरले होते.

सुमारे १७ हजार १२ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले होते, तर विमा कंपनीकडे २१४ कोटी ६२ लाख ९९ हजार रुपये विमा रक्कम संरक्षित केली होती.

फळबागांसाठी असलेल्या पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विम्याच्या लाभासाठी ठरवलेल्या प्रमाणकांचे निकष चुकीच्या पद्धतीने ठरवल्याने शेतकऱ्यांचे १० कोटी ७४ लाख १६ हजार रुपये बुडाले. तर सरकारी धोरणानुसार विमा कंपन्या मालामाल झाल्या. त्यामुळे साहजिकच, या योजनेला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने वर्षभरानंतर कृषी विभागाला जाग आली असून, या योजनेसाठी कंपन्यांशी केलेला करार रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे.

नव्याने ई-निविदा मागविल्या

कृषी आयुक्तालयाच्या मुख्य सांख्यिकी विभागाने यासंबंधीचे पत्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पाठवले आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमायोजना २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या तीन वर्षांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेचा करार रद्द केल्याचे त्यात म्हटले आहे. तसेच मृग आणि आंबिया बहारांसाठी सन २०२१-२२ ते २०२३-२४ या कालावधी करता नव्याने ई-निविदा मागविल्या आहेत. लवकरच यासंदर्भात नवीन शासन निर्णय जाहीर होईल. त्यानंतरच पीकविमा संकेतस्थळ खुले करण्यात येईल, असेही म्हटले आहे.

तालुकानिहाय आकडेवारी

सांगोला १३,८९३ शेतकरी (५ कोटी ७६ लाख ३ हजार), मंगळवेढा ६,२०२ शेतकरी (३ कोटी १३ लाख ९६ हजार), पंढरपूर १३६२ शेतकरी (५६ लाख ७१ हजार), माळशिरस ९७४ शेतकरी (४१ लाख ४५ हजार), बार्शी ९२४ शेतकरी (१९ लाख ३६ हजार), मोहोळ ७४२ शेतकरी (३८ लाख ७४ हजार), माढा ४९२ शेतकरी (१५ लाख ३१ हजार), करमाळा २४५ शेतकरी (९ लाख ३२ हजार), दक्षिण सोलापूर २४ शेतकरी (१ लाख ३२ हजार), उत्तर सोलापूर २३ शेतकरी (९३ हजार), अक्कलकोट १६ शेतकरी (७६ हजार) अशा २४ हजार ८९६ शेतकऱ्यांनी विमा रकमेच्या हप्त्यांपोटी १० कोटी ७४ लाख १६ हजार रुपये विमा कंपनीकडे होते.