शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रभागेला पूर : पंढरपुरात मंदिरे पाण्याखाली, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 04:11 IST

उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाळवंटामध्ये असणा-या पुंडलिकासह सर्व मंदिरे निम्मी पाण्याखाली गेली असून घाटांना पाणी लागले आहे. व्यासनारायण झोपडपट्टीतील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे.

पंढरपूर (जि. सोलापूर) : उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाळवंटामध्ये असणा-या पुंडलिकासह सर्व मंदिरे निम्मी पाण्याखाली गेली असून घाटांना पाणी लागले आहे. व्यासनारायण झोपडपट्टीतील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे.उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात सलग दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. उजनीतून ७० हजार क्युसेक्स तर वीर धरणातून ४५ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे़ त्यामुळे भीमा नदीत सध्या १ लाख १५ हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे़ त्यामुळे चंद्रभागेला पूर आला आहे. रात्रीपर्यंत पाणीपातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता असून शहरासह नदीकाठच्या गावातील लोकांना देखील सुरक्षितस्थळी हलविण्याच्या तयारी प्रशासनाने केली आहे.जिल्ह्यात भोगावती व सीना नदीच्या वरच्या भागात जोरदार पाऊस पडल्याने या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. उस्मानाबाद भागातील प्रकल्प पाण्याने भरून वाहू लागले आहेत. हिंगणी मध्यम प्रकल्पातील सांडवा सोडल्यामुळे आणि पावसामुळे भोगावती नदी तुडुंब भरून वाहत आहे.मराठवाडा, विदर्भातही पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातल परभणी, नांदेड, हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील काही भागांत दमदार पाऊस झाला. उस्मानाबादेत एकजण वाहून गेला. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस झाला. अकोला शहर व परिसरात सायंकाळी साडेपाचनंतर जोरदार पाऊस झाला. अर्धा तास झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. चंद्रपूरातही दमदार सरी बरसल्या.साता-यात मुसळधार घरे अन् दुकानांमध्ये पाणी!साता-यात शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने गोडोली, सदरबझार परिसरांत हाहाकार माजविला. ओढ्याचे पाणी शेकडो घरे, पन्नासहून अधिक दुकानांमध्ये शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. साता-यातील नैसर्गिक ओढ्यांवर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. ओढ्यांचा प्रवाह अडवून वसाहती बांधल्या आहेत. त्याचा परिणाम सातारकरांना दरवर्षी सहन करावा लागतो. फलटण तालुक्यात फलटण-बारामती रस्त्यावरील सोमंथळी पूल रात्री उशिरा वाहून गेला. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.