शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

चंद्रभागा वाळवंटी, झाली भक्तांची दाटी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 01:32 IST

स्वच्छ, निर्मळ आणि वाहते पाणी असल्याने पवित्र स्नान करण्यासाठी ‘चंद्रभागा वाळवंटी भाविकांची दाटी’ झाल्याचे दिसून आले.

- प्रभू पुजारी

पंढरपूर :‘पंढरीचा वास चंद्रभागे स्नान।आणिक दर्शन विठोबाचे।।हेचि घडो मज जन्मजन्मांतरी।मागणे श्रीहरी नाही दुजे।।’या संतवचनाप्रमाणे चंद्रभागा स्नानाला अधिक महत्त्व आहे़ त्यामुळे आषाढी वारी सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशासह अन्य भागातील भाविक पंढरीत दाखल होताच आपापल्या मठात, मंदिरात, धर्मशाळेत साहित्य ठेवून विश्रांती न घेता त्यांची पावले आपोआपच चंद्रभागेकडे वळत होती़ सध्या चंद्रभागा नदीपात्रात भरपूर पाणी आहे़. स्वच्छ, निर्मळ आणि वाहते पाणी असल्याने पवित्र स्नान करण्यासाठी ‘चंद्रभागा वाळवंटी भाविकांची दाटी’ झाल्याचे दिसून आले़गेल्या १५ दिवसांपासून पावसाचा जोर असल्याने उजनी धरणात मोठ्या प्रमाणात वरून विसर्ग येत आहे़ त्यामुळे आणि आषाढी वारी सोहळ्यात भाविकांचे हाल होऊ नये म्हणून उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले होते़ ते पाणी चंद्रभागा पात्रात दाखल झाल्याने भाविकांना स्वच्छ, निर्मळ अन् वाहत्या पाण्यात पवित्र स्नान करण्याची संधी मिळत आहे़ स्नान झाल्यानंतर ज्या भक्तराज पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी परब्रह्म परमात्मा पांडुरंग आला आणि त्यांच्या प्रार्थनेनुसार त्याने दिलेल्या विटेवर युगे अठ्ठावीस भक्तांना दर्शन देऊन कृतार्थ करण्यासाठी भीमातीरी उभा राहिला आहे़ त्यामुळे भाविक प्रथम त्या भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतात़ त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी दर्शनरांगेकडे मार्गस्थ होतात़ मंदिर समितीच्या वतीने गोपाळपूरच्या पुढे विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत दर्शन रांगेची सोय केली आहे़ दर्शन रांगेत यंदा प्रथमच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांच्या पायाला क्रश खडी टोचू नये म्हणून मॅट अंथरले आहे़ तसेच पिण्याचे स्वच्छ पाणी, कायमस्वरूपी पत्राशेड सोडून तात्पुरत्या पत्राशेडच्या संख्येतही वाढ केली आहे़ तसेच त्यामध्ये हायमास्ट दिवेही बसविले आहेत़ तासन्तास दर्शन रांगेत उभारून कंटाळलेल्या भाविकांसाठी बसण्याची सोयही केली आहे़ या सोयीसुविधा भाविकांना वेळेवर उपलब्ध होतात की नाही, याची स्वत: समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले दक्ष राहून पाहणी करीत आहेत़.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpurपंढरपूर