शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

दोन महिन्यांनंतर केंद्राचे पथक; ग्रामीण भागात नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:22 IST

सांगोला : सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तब्बल दोन महिन्यानंतर केंद्रांच्या पथकाला जाग आली ...

सांगोला : सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तब्बल दोन महिन्यानंतर केंद्रांच्या पथकाला जाग आली आहे. सांगोला तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक आज मंगळवारी सांगोल्यात येणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे केंद्राचे पथक नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याऐवजी हायवेवर असणाऱ्या गावांची पाहणी दौरा करणार असल्याने नुकसान झालेल्या गावातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सांगोला तालुक्यात अतिवृष्टीच्या पावसाने धुडगूस घातला होता. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना अक्षरशः देशोधडीला लावले आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके डोळ्यासमोर वाहून गेली. अशात बळीराजाला मदत तर सोडाच; पण साधी नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारला वेळ मिळाला नव्हता. जवळपास ४० हजार हेक्टरवरील पिके, फळबागांचे नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त झाली होती. शेतकऱ्यांना मदत देण्यावरून सत्ताधारी आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळाली होती.