शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

सावधान... बार्शीत महिनाभरात तब्बल २६ जणांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:44 IST

बार्शी : बार्शी शहर व तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात तब्बल २६ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली. सावकाराचे कर्ज, ...

बार्शी : बार्शी शहर व तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात तब्बल २६ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली. सावकाराचे कर्ज, दीर्घ आजार, व्यसनाधीनता ही याची प्रमुख कारणे आहेत. ग्रामीणमध्ये महिला तर शहरात युवकांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

बार्शी शहर, तालुका, वैराग, पांगरी या चार पोलीस ठाण्यात नोव्हेंबर महिन्यात तब्बल २६ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक ११ आत्महत्येची नोंद ही बार्शी शहरात झाली आहे़ वैराग हद्दीत ७, पांगरीमध्ये ३ आणि तालुका पोलीस स्टेशनमध्ये ५ अशा एकूण २६ आत्महत्या झाल्या आहेत़ यामध्ये प्राधान्याने गळफास घेऊन, विषप्राशन करून व विहिरीत उडी मारून केलेल्या आत्महत्येचा समावेश आहे़ यातील ३ या आर्थिक अडचणींमुळे, २ दीर्घ आजाराला कंटाळून, पाच व्यसनाधीनतेमुळे व पाच आत्महत्या या सावकाराच्या कर्जाला कंटाळून झाल्या आहेत; मात्र त्याची तशी पोलीस स्टेशनला नोंद नाही़ उर्वरित आत्महत्या या घरगुती वादातून किंवा अज्ञात कारणाने झाल्या आहेत़ या २६ जणांमध्ये १० महिला तर १६ पुरुषांचा समावेश आहे़ यातील १० जण हे २० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत.

बार्शी शहरात सोशल मीडियावर परिचित असलेल्या व युवक वर्गात लोकप्रिय असलेले मंगेश अशोक भाकरे, प्रशांत गायकवाड, रवींद्र पोपट गुंड, व्यापारी सूर्यकांत भोईटे, नवनाथ रोडे, नितीन कोरे या युवकांच्या आत्महत्येने सोशल मीडियात खूप चर्चा झाली़ बार्शीकर युवक सातत्याने का आत्महत्या करत आहेत यावर चिंता व्यक्त केली जााऊ लागली.

कोट ::::::

आजचा तरुण सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत गुरफटत चालला आहे़ त्याचा जवळच्या व्यक्तीशी असलेला संवाद हा कमी होत चालला आहे़ ज्यावेळी तो अडचणीत येतो तेव्हा त्याला मनमोकळे करण्यासाठी कोणीच नसते़ त्यामुळे युवकांनी या आभासी दुनियेतून बाहेर पडून आपला मित्र परिवार, कुुटुंब व नातलग यांच्याशी घट्ट नाते जोडावे. मन मोकळे करावे.

- विजय राऊत

अध्यक्ष, जय शिवराय प्रतिष्ठान