शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

सोलापुरातील एनटीपीसी मधील दोनशे प्रकल्पग्रस्तांसह स्थानिक कामगारांना ब्रेक

By appasaheb.patil | Updated: March 15, 2019 12:48 IST

सोलापूर : एऩ टी़ पी़ सी. येथील ब्रेक दिलेल्या प्रकल्पग्रस्त व स्थानिक कामगारांना लवकरात लवकर कामावर रुजू करून घेण्याची ...

ठळक मुद्देकामावर रुजू करून घेण्याची तिरंगा संघटनेची मागणीदक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी येथे असलेल्या एऩटी़पी़सी. प्रकल्पातील बºयाच कामगारांना मागील काही महिन्यांपासून ब्रेक देण्यात आलाकामगारांना कामावर घ्यावे, यासाठी बालेसाब मुल्ला यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

सोलापूर : एऩ टी़ पी़ सी. येथील ब्रेक दिलेल्या प्रकल्पग्रस्त व स्थानिक कामगारांना लवकरात लवकर कामावर रुजू करून घेण्याची मागणी तिरंगा विकास संस्था, फताटेवाडी येथील बालेसाब मुल्ला यांनी जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी येथे असलेल्या एऩटी़पी़सी. प्रकल्पातील बºयाच कामगारांना मागील काही महिन्यांपासून ब्रेक देण्यात आला आहे़ याशिवाय स्थानिक व प्रकल्पग्रस्त कामगारांना कामावरून काढून टाकले आहे़ या कामगारांना कामावर घ्यावे, यासाठी बालेसाब मुल्ला यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.

या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकाºयांनी उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील यांना याबाबतची माहिती घेऊन कामगारांना न्याय द्यावा, अशा सूचना केल्या होत्या़ त्यानुसार उपविभागीय अधिकाºयांनी १९ जानेवारी २०१९ रोजी एऩटी़पी़सी. अधिकारी, तहसीलदार व कामगार यांच्यात बैठक झाली़ या बैठकीत एनटीपीसीने कामगारांना आम्ही काढून टाकले नाही तर त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरने काढल्याची माहिती दिली़ यानंतर उपविभागीय अधिकारी पाटील यांनी एनटीपीसीच्या संबंधित अधिकाºयांना कामगारांच्या सर्व कागदपत्रांसह अन्य पुरावे घेऊन दुसºया बैठकीला हजर राहण्याच्या सूचना दिल्या़ ठरल्याप्रमाणे दुसरी बैठक ४ फेबु्रवारी २०१९ रोजी घेतली, मात्र या बैठकीला एनटीपीसीच्या अधिकाºयांनी दांडी मारली़ त्यानंतर तिसºया बैठकीचे आयोजन केले़ तिसरी बैठक ५ मार्च २०१९ रोजी घेतली, मात्र याही बैठकीला एनटीपीसीच्या अधिकाºयांनी गैरहजेरी लावली़ त्यामुळे संतप्त झालेल्या उपविभागीय अधिकाºयांनी पुढील बैठक जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत घेऊ, असे आश्वासन कामगार संघटनेला दिले.

अन्यथा आंदोलन करणार- कामगारांच्या प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विविध बैठकीला एनटीपीसीच्या संबंधित अधिकाºयांनी गैरहजेरी लावली. त्यामुळे कामगारांचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. हा प्रश्न येत्या काही दिवसात सोडविला गेला नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तिरंगा विकास संस्थेचे अध्यक्ष बालेसाब मुल्ला यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला़

टॅग्स :SolapurसोलापूरjobनोकरीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय