शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

भीमा नदीत बुडालेल्या चौघांचेही मृतदेह लागले हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : काल शनिवारी दुपारी भीमा नदीच्या पात्रात बुडालेल्या तीन मुली आणि एका मुलाचा मृतदेह आज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर : काल शनिवारी दुपारी भीमा नदीच्या पात्रात बुडालेल्या तीन मुली आणि एका मुलाचा मृतदेह आज दुपारनंतर सापडले. तब्बल २० तास शोधकार्य सुरू होते.

शनिवारी दुपारी वडील शिवाजी तानवडे यांच्यासोबत पोहायला नदीवर गेलेल्या त्यांच्या समीक्षा (वय १३) आणि अर्पिता (वय ११) या दोन मुली तर त्यांचे मेहुणे शिवानंद पारशेट्टी यांची मुलगी आरती (वय ११) आणि मुलगा विठ्ठल (वय १०) भीमा नदीच्या पात्रात बुडाले होते. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतः शिवाजी तानवडे हेदेखील बुडाले. आरडाओरड ऐकून धावत आलेला मेहुण्याचा मुलगा अप्पू पारशेट्टी याने शिवाजीला कसेबसे बाहेर काढले पण डोळ्यांदेखत चारही मुले खोल पाण्यात बुडाली.

शनिवारी ग्रामस्थांनी नदीपात्रात शोधाशोध केली, परंतु रात्री जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने शोधकार्य थांबवावे लागले. या घटनेची माहिती मिळताच मंद्रूपच्या अप्पर तहसीलदार उज्ज्वला सोरटे आणि मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन थेटे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नदीकाठच्या गावातील मच्छिमार आणि जलतरणपटूंना मदतीसाठी बोलावून घेतले. रात्री उशिराने सांगली येथील आयुष हेल्पलाईन बचाव पथकाला पाचारण केले. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सांगलीहून दोन सर्पमित्र आणि चार जलतरणपटू अशा सहा जणांचे पथक दाखल झाले.

सकाळी ६ वाजल्यापासून पुन्हा शोधकार्य सुरू झाले. स्थानिक मच्छिमारांनी नदीत उड्या घेतल्या. प्रवाहाबरोबर अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत शोध घेऊनही मृतदेह हाती लागले नाहीत. घटनेनंतर तब्बल वीस तासांनी समीक्षा आणि अर्पिता या दोन बहिणींचे मृतदेह सादेपूर येथील मच्छिमार मानसिंग भोई याच्या हाती लागले. त्याने त्या दोघींना अलगदपणे पाण्यातून उचलले. त्यानंतर त्याच ठिकाणच्या जवळ आरती पारशेट्टी हिला बाहेर काढण्यात आले. विठ्ठलचा मृतदेह उशिराने बोटीच्या सहाय्याने सांगलीच्या बचाव पथकाने बाहेर काढला.

----

दोघी बहिणींची घट्ट मिठी तशीच

पाण्यातून बाहेर काढताना मच्छिमार मानसिंग भोई याला मृतदेह वजनदार वाटला. त्याने इतरांच्या मदतीने बाहेर काढला. तेेव्हा समीक्षा आणि अर्पिता यांनी एकमेकींना हातापायांनी घट्ट मिठी मारली होती. ती मिठी सोडवून दोघींना बाहेर काढताना उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला.

-------------

बुडालेल्या जागीच खोल पाण्यात मृतदेह

मच्छिमार आणि सांगलीचे बचाव पथक विस्तीर्ण पसरलेल्या नदीच्या पात्रात मृतदेहांचा शोध घेण्यासाठी नदीच्या उताराच्या बाजूने डुंबत होते. पण मच्छिमार मानसिंग भोई हा घटना घडली त्याच ठिकाणी घुटमळत राहिला. ज्या ठिकाणी ही चारही मुले नदीत बुडालेली होती त्या ठिकाणीच सापडली. प्रवाहाबरोबर वाहून गेली असावीत, हा अंदाज निरर्थक ठरला.

वाळूउपसा आणि विद्युत मोटारी बसवण्यासाठी नदीपात्रातील मोठ्या खड्ड्यांनी या अजाण बालकांचा बळी घेतला.

---------

एकाच दिवसात घर उजाड

माझ्या मागे चारही मुले नदीकडे आली. त्यांना वारंवार हाकलून दिले. तरी दुसऱ्या मार्गाने परत आलीच. कडेला पोहण्याचा त्यांचा हट्ट असल्याने मी कानाडोळा केला. काही मिनिटांत चौघेही बुडताना मी पाहिले. त्यातील दोघांना कसेबसे कडेला आणून सोडले. अन्य दोघांना काढण्यासाठी बुडून त्यांनाही केसांना धरून खेचत असताना कडेला सोडलेले दोघे बुडत होते. त्यांना पाहून माझा धीरच सुटला. हातातून दोन्ही मुली निसटल्या. ओरडण्याच्या आवाजाने धावलेल्या पुतण्याने मला बाहेर काढले. आता जगून तरी माझा काय उपयोग? एका दिवसात माझं गोकुळ असलेलं घर उजाड झालं की हो .... असा आक्रोश करीत मृत मुलींचे वडील शिवाजी तानवडे यांनी टाहो फोडला.

-------

कार्यात प्रशासन अग्रभागी

घटनेनंतर प्रशासकीय अधिकारी लवंगी येथील घटनास्थळी धावले. अप्पर तहसीलदार उज्ज्वला सोरटे सहायक पोलीस निरीक्षक नितीन थेटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे चंद्रकांत हेडगिरे, नायब तहसीलदार प्रवीण घम हे ठाण मांडून होते. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनी रात्री घटनास्थळाला भेट दिली तर प्रांताधिकारी दीपक शिंदे सकाळपासून नदीकाठावर मदत कार्य हाताळत होते. आमदार सुभाष देशमुख यांनी दुपारी तानवडे आणि पारशेट्टी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

------

एकाच चितेवर दिला अग्नी

या घटनेची फिर्याद मृत मुलींचे वडील शिवाजी तानवडे यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले. शवविच्छेदन झाल्यानंतर चारही मृतदेहांना एकाच चितेवर अग्नी देण्यात आला

-----------

फायबर बोट आली कामी

अप्पर तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांनी नदीकाठच्या गावातून बोटींचा शोध घेतला. तेलगाव येथे असलेली लाकडी बोट होऊन कुजल्यामुळे ती वापरण्यायोग्य नसल्याचे सांगण्यात आले. हत्तरसंग संगमातील फायबर बोट ट्रकमधून आणली. या एकाच बोटीच्या साहाय्याने शोधकार्य करावे लागले. ती बोट हाकणारे प्रशिक्षित नावाडी मिळाले नाहीत. सांगलीच्या बचाव पथकातील सदस्यांनी नावेच्या मदतीने शोध घेतला.

--------

परिसरातून धावले मदतीला

पाण्यात बुडालेल्या मुलींच्या शोधासाठी लवंगी ग्रामस्थ कालपासून नदीकाठावर होते. सरपंच संगमेश बगले-पाटील यांनी तरुणांच्या मदतीने स्वतः शोधकार्य हाती घेतले. आप्पासाहेब पाटील (लवंगी), चंद्रकांत खुपसंगे (सादेपूर), डॉ. चनगोंडा हाविनाळे (बरूर), यतीन शहा (भंडारकवठे), हणमंत कुलकर्णी (माळकवठे) यांनी मदतीसाठी धाव घेतली.