शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रक्ताळलेल्या पाठीला अजूनही खंजिराची भीती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:16 IST

‘आम्ही दोघी भांडतो, रुसतो, फुगतो; परंतु त्या मंडळींबरोबर नका ना आमची तुलना करू. आम्ही नक्कीच त्यांच्यापेक्षा अधिक समजूतदार आहोत’, ...

‘आम्ही दोघी भांडतो, रुसतो, फुगतो; परंतु त्या मंडळींबरोबर नका ना आमची तुलना करू. आम्ही नक्कीच त्यांच्यापेक्षा अधिक समजूतदार आहोत’, असं दोघींनीही एका तालात, एका सुरात सांगितलं. जणू जुळ्या ‘चिंकी-मिंकी’सारखं. दरबारात हशा पिकला. वातावरण हलकं-फुलकं बनलं.

‘पण काय मुनीऽऽ या तीन पार्ट्यांमध्ये नेमका प्रॉब्लेम तरी काय आहे ? सातत्यानं का फील येतोय सार्वजनिक नळावरचा ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?’ महाराजांनी विचारताच नारद उत्तरले, ‘केवळ आपल्यालाच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राला हा प्रश्न पडलाय महाऽऽराज. मी समक्ष जाऊनच शोध घेतो. आज्ञा असावी. ? ? ? ? ? ? ? ?’

वीणा झंकारत नारद भूतलावर पोहोचले. सुरुवातीला त्यांना ‘पटोले नाना’ भेटले. ते कुणाशीतरी मोबाईलवरून बोलत होते, ‘हे बघ, मला वर्षा बंगला सूट होईल की दुसरा याचा निर्णय उद्या घेतो. तोपर्यंत दोन-तीन लाल दिव्यांच्या नव्या कोऱ्या गाड्या आजच बुक करून ठेव. एक मुंबईत, तर दुसरी भंडाऱ्यात फिरण्यासाठी ? ते आपल्या राजू पीएसोबत ‘भावी सीएम’पदाची चर्चा करताहेत, हे मुनींच्या लक्षात आलं.

‘काय हो नानाभाऊऽऽ तुमची तयारी तर भलतीच जोरात दिसतेय. मग सध्याचे सीएम कुठं जाणार ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?’ नारदांनी खोदून विचारताच ‘नाना ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?’ नेहमीप्रमाणं जोरात बोलले, ते पीएम्‌ना विचारा. चला जाऊ द्या मला विदर्भाच्या दौऱ्यावर. ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?’

नाना निघाले, पाठमोरे झाले. त्यांची पाठ जरा मोठी वाटली. नारदांनी विचारताच एका कार्यकर्त्यानं हळूच सांगितलं, ‘आजकाल नाना शर्टाच्या आत चिलखत घालून फिरताहेत. आश्चर्याने मुनी दादरमध्ये गेले. तिथं ‘रौतांचे संजयराव ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?’ भेटले. ‘तुमचे पॉलिटिकल पार्टनर नाना म्हणत होते की, सीएमबद्दल पीएमना विचार, हा काय प्रकार ? त्या दोघांचं काय दिल्लीत ठरलं-बिरलं की काय ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?’

डोकं खाजवत ‘संजयराव’ हळूच कुजबुजले, ‘आजकाल उद्धोंच्या मनात काय चाललंय, हे आम्हालाही कळेनासे झालंय. माझेपण आडाखे चुकू लागलेत.’

नारद गालातल्या गालात हसत म्हणाले, ‘कदाचित थोरले काका बारामतीकरांपर्यंत या हालचाली पोहोचू नये म्हणून तुमच्यापासूनही गुप्त ठेवल्या जात असाव्यात...पण काय हो...दिल्लीच्या भेटीत गिफ्ट दिले म्हणे नमोंनी खास’ यावर ‘रौतां’नी बोलायला टाळलं; मात्र ‘प्रतापराव’ घाईघाईनं बोलले, ‘होय...होय...तेच चिलखत घालून आमचे नेते फिरताहेत सर्वत्र. माझ्या लेटरमध्येही लिहिलंय की तसं !

पुन्हा पाठीवरच्या चिलखताचा विषय कानावर पडताच मुनी चमकले. त्यांनी थेट ‘बारामती’ची वाट धरली. ‘गोविंद बागे’जवळ ‘प्रशांत किशोर’चा कार ड्रायव्हर भेटला, ‘अभी इसके आगे हमारे साब का हेड ऑफिस इसी गाँव मे होगाऽऽ’ त्याचं पुटपुटणं कानावर पडलं. बंगल्यात मिटिंग सुरू होती. एका स्टील कंपनीचे अधिकारी ‘पीपीटी’ सादर करत होते. खासगी साखर कारखान्यांच्या साखळी निर्मितीनंतर ‘अजितदादां’नी आता स्टील फॅक्टरीतही लक्ष घातलं की काय ? असं उगाच मुनींना वाटून गेलं. तो ऑफिसर शेवटी बोलला, ‘कितीही होऊ देत आमचं भक्कम चिलखत हण्ड्रेड परसेंट सेफ राहतं...!

स्पीच संपलं. साऱ्यांच्या नजरा ‘थोरल्या काकां’कडं वळल्या. त्यांनी मूकपणेच संमती दिली. डील झालं. डझनभर चिलखतांची ऑर्डर दिली गेली. ‘काका’ निघाले. ‘दादा’ही त्यांच्या ‘पाठी’मागं निघाले. मात्र झाकत त्यांचा हात धरून ‘काकां’नी आपल्यासोबत घेतलं. मुनी गोंधळले. तेव्हा मिश्कील हसत ‘काका’ हळूच बोलले, ‘मला खंजिरांची भीती नाही वाटत, विरोधकांचीही नाही वाटत. फक्त आपल्याच माणसांपासून मी नेहमी सावध असतो. पहाटे झोपेतही !’

अगाऽऽगाऽऽ मुनींच्या डोक्यात प्रकाश पडला. ते तत्काळ इंद्र दरबारात पोहोचले, ‘महाऽऽराज भूतलावर राज्य केवळ चिलखतांचंच, दहशत केवळ खंजिरांचीच. प्रत्येकालाच वाटतंय की आपल्या पाठीत खंजीर खुपसला जाणार.