शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

मोठी बातमी; पंढरपुरातील पंतप्रधान आवास योजनेच्या ८९२ घरांची लॉटरी सोडत रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 17:21 IST

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे : उच्चस्तरीय चौकशी नंतरच काम सुरू करावे 

पंढरपूर : पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाच्या कामाबाबत  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह विविध संघटनांनी तक्रार केल्या होता. यामुळे या कामास स्थगिती देण्याचे आदेश नगर विकास ऊर्जा आदिवासी विकास  उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहेत. यामुळे या प्रकल्पातील ८९२ घरांची लॉटरी सोडत रद्द करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. 

भीमा नदीच्या पूररेषेत सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाच्या कामाबाबत  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह विविध संघटनांनी तक्रार केल्या होता. या कामास स्थगिती देण्याचे आदेश नगर विकास ऊर्जा आदिवासी विकास  उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहेत. 

शहरातील गोरगरीब जनतेची राहण्याची सोय व्हावी. यासाठी पंढरपूर नगरपरिषदेने पंतप्रधान आवास योजनेचे काम सुरू केले आहे. या प्रकल्पांतर्गत २००० घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र हा प्रकल्प पूररेषेत बांधला जातोय. मागील वर्षी आलेल्या पुरा दरम्यान पुराचे पाणी त्या प्रकल्पामध्ये होते. त्यामुळे त्या दरम्यान प्रकल्प बंद करण्यात आला होता. त्याच बरोबर कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दिल्या होत्या. शेतजमीन व दलदलीचा भाग, काळी माती असलेल्या ठिकाणी प्रकल्पाचे काम होत आहे. त्या ठिकाणी राहण्यास येणाऱ्या २ हजार कुटुंबाच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

यामुळे या प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी करावी. तसेच पूररेषेत प्रकल्प सुरू करणाऱ्या नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. यामुळे हे काम थांबवावे. हा प्रकल्प दुसऱ्या योग्य ठिकाणी उभारला जावा. अशी मागणी राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी चे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, पंढरपूर शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी नगर विकास ऊर्जा आदिवासी विकास  उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत त्यांनी या प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी करावी चौकशी अहवाल येण्यापर्यंत योजनेस स्थगिती द्यावी असे आदेश संबंधित विभागाला दिले आहे. हे पत्र जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे आले आहे. 

यामुळे पंढरपूर पंतप्रधान आवास योजनेच्या कामात स्थगिती असल्याने ६९२ घरांची लॉटरी सोडत रद्द करण्यात आली असल्याचे अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे यांनी सांगितले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूर