शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

सोलापुरातील भिमाई वस्ती ; मानवमुक्तीच्या लढ्याची सुरुवात मिलिंद नगरातून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 10:59 IST

थोरला राजवाडा : बाबासाहेबांनी फुंकले चळवळीचे रणशिंग

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या लढ्याची सुरुवात सोलापूरच्या भूमीतून दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भूमिहीनांचा लढा उभा केला सोलापूर शहरातील मिलिंद नगर या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू

संताजी शिंदे । 

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या लढ्याची सुरुवात सोलापूरच्या भूमीतून सर्वप्रथम बुधवार पेठ, मिलिंद नगर येथील थोरला राजवाड्यातून झाली.  बाबासाहेबांच्या तत्कालीन चाहत्यांनी महार वतनदार परिषद आघाडीचे रामचंद्र सरवदे व त्यांच्या सहकाºयांनी नगराध्यक्षाला सोबत घेऊन चळवळीचे रणशिंग फुंकले. 

आंबेडकरी चळवळीच्या एकंदरीत जडणघडणीत अशिक्षित लोकांना आपल्या बोली भाषेत साहित्य, नाटक व जलशातून परिवर्तन करण्यास सुरुवात केली. त्यावेळचे अंध कवी साहित्यिक एन.टी. बनसोडे यांनी मोलाची कामगिरी केली. नगरपालिकेचे तत्कालीन पहिले नगरसेवक मोहनदास बाबरे हे होते. जसजशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची व्याप्ती वाढत गेली, त्याप्रमाणे दुसºया पिढीतील नेत्यांमध्ये आर.एस. रणशृंगारे, एल.एन. आबुटे, तुकाराम (बुवा) इंगळे, विष्णू बाबरे, मल्हारी सोनकांबळे, भीमराव सरवदे आदी लोकांचा समावेश होता. या मंडळींनी बाबासाहेबांच्या हयातीमध्ये चळवळीतील सामाजिक व राजकीय लढे लढले आहेत. बाबासाहेबांच्या हयातीमध्ये चळवळीतील शेड्युल कास्ट फेडरेशन, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. 

याच कालावधीत राजकीय क्षेत्रात काम करणारी तरुण पिढी आली. त्यामध्ये बी.एस. तळभंडारे, एम.के. कांबळे, सुभानजी बनसोडे यांचा उदय झाला. दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भूमिहीनांचा लढा उभा केला होता, यामध्ये राहीबाई निकंबे यांनी महिलांचे नेतृत्व केले होते.

कालांतराने दलित पँथरची चळवळ सुरू झाली, त्यात राजा तळभंडारे, विनायक बनसोडे, बब्रुवान साळवे यांनी तीव्रता वाढवली. त्यानंतरची चळवळ अतिशय वेगवान करण्यासाठी राजाभाऊ इंगळे, राजाभाऊ सरवदे, कुमार तळभंडारे, भीमराव बाबरे, राहुल सरवदे, यल्लेश्वर सरवदे, भारत सुतकर, सुनील आबुटे, सुबोध वाघमोडे, सुधाकर सरवदे, राम सरवदे, मोहन बनसोडे आदींनी पँथरचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. यापैकी काही लोक आजही त्याच ताकदीने  निळे निशाण घेऊन आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्याचे काम करीत आहेत. 

शहराकडे चला...- डॉ. बाबासाहेबांनी शहराकडे चला असा नारा दिला होता, त्याला प्रतिसाद म्हणून शहरालगत असणाºया दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ आदी भागातील लोक सोलापुरात वास्तव्याला आले होते. याच काळात बुधवार पेठ, मिलिंद नगर येथे वास्तव्य झाले. अशाच पद्धतीने राजकारणाच्या काळात मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बसवकल्याण आदी भागातून लोक स्थलांतरीत झाले. लोकवस्ती वाढल्याने सोलापूर शहरातील मिलिंद नगर या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू होत गेले. आज या बुधवार पेठ, मिलिंद नगरला चळवळीची राजधानी म्हणून ओळखले जाते. 

टॅग्स :Solapurसोलापूर