शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

सोलापुरातील भिमाई वस्ती ; मानवमुक्तीच्या लढ्याची सुरुवात मिलिंद नगरातून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 10:59 IST

थोरला राजवाडा : बाबासाहेबांनी फुंकले चळवळीचे रणशिंग

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या लढ्याची सुरुवात सोलापूरच्या भूमीतून दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भूमिहीनांचा लढा उभा केला सोलापूर शहरातील मिलिंद नगर या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू

संताजी शिंदे । 

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या लढ्याची सुरुवात सोलापूरच्या भूमीतून सर्वप्रथम बुधवार पेठ, मिलिंद नगर येथील थोरला राजवाड्यातून झाली.  बाबासाहेबांच्या तत्कालीन चाहत्यांनी महार वतनदार परिषद आघाडीचे रामचंद्र सरवदे व त्यांच्या सहकाºयांनी नगराध्यक्षाला सोबत घेऊन चळवळीचे रणशिंग फुंकले. 

आंबेडकरी चळवळीच्या एकंदरीत जडणघडणीत अशिक्षित लोकांना आपल्या बोली भाषेत साहित्य, नाटक व जलशातून परिवर्तन करण्यास सुरुवात केली. त्यावेळचे अंध कवी साहित्यिक एन.टी. बनसोडे यांनी मोलाची कामगिरी केली. नगरपालिकेचे तत्कालीन पहिले नगरसेवक मोहनदास बाबरे हे होते. जसजशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची व्याप्ती वाढत गेली, त्याप्रमाणे दुसºया पिढीतील नेत्यांमध्ये आर.एस. रणशृंगारे, एल.एन. आबुटे, तुकाराम (बुवा) इंगळे, विष्णू बाबरे, मल्हारी सोनकांबळे, भीमराव सरवदे आदी लोकांचा समावेश होता. या मंडळींनी बाबासाहेबांच्या हयातीमध्ये चळवळीतील सामाजिक व राजकीय लढे लढले आहेत. बाबासाहेबांच्या हयातीमध्ये चळवळीतील शेड्युल कास्ट फेडरेशन, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. 

याच कालावधीत राजकीय क्षेत्रात काम करणारी तरुण पिढी आली. त्यामध्ये बी.एस. तळभंडारे, एम.के. कांबळे, सुभानजी बनसोडे यांचा उदय झाला. दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भूमिहीनांचा लढा उभा केला होता, यामध्ये राहीबाई निकंबे यांनी महिलांचे नेतृत्व केले होते.

कालांतराने दलित पँथरची चळवळ सुरू झाली, त्यात राजा तळभंडारे, विनायक बनसोडे, बब्रुवान साळवे यांनी तीव्रता वाढवली. त्यानंतरची चळवळ अतिशय वेगवान करण्यासाठी राजाभाऊ इंगळे, राजाभाऊ सरवदे, कुमार तळभंडारे, भीमराव बाबरे, राहुल सरवदे, यल्लेश्वर सरवदे, भारत सुतकर, सुनील आबुटे, सुबोध वाघमोडे, सुधाकर सरवदे, राम सरवदे, मोहन बनसोडे आदींनी पँथरचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. यापैकी काही लोक आजही त्याच ताकदीने  निळे निशाण घेऊन आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्याचे काम करीत आहेत. 

शहराकडे चला...- डॉ. बाबासाहेबांनी शहराकडे चला असा नारा दिला होता, त्याला प्रतिसाद म्हणून शहरालगत असणाºया दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ आदी भागातील लोक सोलापुरात वास्तव्याला आले होते. याच काळात बुधवार पेठ, मिलिंद नगर येथे वास्तव्य झाले. अशाच पद्धतीने राजकारणाच्या काळात मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बसवकल्याण आदी भागातून लोक स्थलांतरीत झाले. लोकवस्ती वाढल्याने सोलापूर शहरातील मिलिंद नगर या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू होत गेले. आज या बुधवार पेठ, मिलिंद नगरला चळवळीची राजधानी म्हणून ओळखले जाते. 

टॅग्स :Solapurसोलापूर