शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

सोलापुरातील भिमाई वस्ती ; मानवमुक्तीच्या लढ्याची सुरुवात मिलिंद नगरातून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 10:59 IST

थोरला राजवाडा : बाबासाहेबांनी फुंकले चळवळीचे रणशिंग

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या लढ्याची सुरुवात सोलापूरच्या भूमीतून दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भूमिहीनांचा लढा उभा केला सोलापूर शहरातील मिलिंद नगर या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू

संताजी शिंदे । 

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या लढ्याची सुरुवात सोलापूरच्या भूमीतून सर्वप्रथम बुधवार पेठ, मिलिंद नगर येथील थोरला राजवाड्यातून झाली.  बाबासाहेबांच्या तत्कालीन चाहत्यांनी महार वतनदार परिषद आघाडीचे रामचंद्र सरवदे व त्यांच्या सहकाºयांनी नगराध्यक्षाला सोबत घेऊन चळवळीचे रणशिंग फुंकले. 

आंबेडकरी चळवळीच्या एकंदरीत जडणघडणीत अशिक्षित लोकांना आपल्या बोली भाषेत साहित्य, नाटक व जलशातून परिवर्तन करण्यास सुरुवात केली. त्यावेळचे अंध कवी साहित्यिक एन.टी. बनसोडे यांनी मोलाची कामगिरी केली. नगरपालिकेचे तत्कालीन पहिले नगरसेवक मोहनदास बाबरे हे होते. जसजशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची व्याप्ती वाढत गेली, त्याप्रमाणे दुसºया पिढीतील नेत्यांमध्ये आर.एस. रणशृंगारे, एल.एन. आबुटे, तुकाराम (बुवा) इंगळे, विष्णू बाबरे, मल्हारी सोनकांबळे, भीमराव सरवदे आदी लोकांचा समावेश होता. या मंडळींनी बाबासाहेबांच्या हयातीमध्ये चळवळीतील सामाजिक व राजकीय लढे लढले आहेत. बाबासाहेबांच्या हयातीमध्ये चळवळीतील शेड्युल कास्ट फेडरेशन, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. 

याच कालावधीत राजकीय क्षेत्रात काम करणारी तरुण पिढी आली. त्यामध्ये बी.एस. तळभंडारे, एम.के. कांबळे, सुभानजी बनसोडे यांचा उदय झाला. दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भूमिहीनांचा लढा उभा केला होता, यामध्ये राहीबाई निकंबे यांनी महिलांचे नेतृत्व केले होते.

कालांतराने दलित पँथरची चळवळ सुरू झाली, त्यात राजा तळभंडारे, विनायक बनसोडे, बब्रुवान साळवे यांनी तीव्रता वाढवली. त्यानंतरची चळवळ अतिशय वेगवान करण्यासाठी राजाभाऊ इंगळे, राजाभाऊ सरवदे, कुमार तळभंडारे, भीमराव बाबरे, राहुल सरवदे, यल्लेश्वर सरवदे, भारत सुतकर, सुनील आबुटे, सुबोध वाघमोडे, सुधाकर सरवदे, राम सरवदे, मोहन बनसोडे आदींनी पँथरचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. यापैकी काही लोक आजही त्याच ताकदीने  निळे निशाण घेऊन आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्याचे काम करीत आहेत. 

शहराकडे चला...- डॉ. बाबासाहेबांनी शहराकडे चला असा नारा दिला होता, त्याला प्रतिसाद म्हणून शहरालगत असणाºया दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ आदी भागातील लोक सोलापुरात वास्तव्याला आले होते. याच काळात बुधवार पेठ, मिलिंद नगर येथे वास्तव्य झाले. अशाच पद्धतीने राजकारणाच्या काळात मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बसवकल्याण आदी भागातून लोक स्थलांतरीत झाले. लोकवस्ती वाढल्याने सोलापूर शहरातील मिलिंद नगर या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू होत गेले. आज या बुधवार पेठ, मिलिंद नगरला चळवळीची राजधानी म्हणून ओळखले जाते. 

टॅग्स :Solapurसोलापूर