शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

सोलापुरातील भिमाई वस्ती ; मानवमुक्तीच्या लढ्याची सुरुवात मिलिंद नगरातून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 10:59 IST

थोरला राजवाडा : बाबासाहेबांनी फुंकले चळवळीचे रणशिंग

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या लढ्याची सुरुवात सोलापूरच्या भूमीतून दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भूमिहीनांचा लढा उभा केला सोलापूर शहरातील मिलिंद नगर या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू

संताजी शिंदे । 

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या लढ्याची सुरुवात सोलापूरच्या भूमीतून सर्वप्रथम बुधवार पेठ, मिलिंद नगर येथील थोरला राजवाड्यातून झाली.  बाबासाहेबांच्या तत्कालीन चाहत्यांनी महार वतनदार परिषद आघाडीचे रामचंद्र सरवदे व त्यांच्या सहकाºयांनी नगराध्यक्षाला सोबत घेऊन चळवळीचे रणशिंग फुंकले. 

आंबेडकरी चळवळीच्या एकंदरीत जडणघडणीत अशिक्षित लोकांना आपल्या बोली भाषेत साहित्य, नाटक व जलशातून परिवर्तन करण्यास सुरुवात केली. त्यावेळचे अंध कवी साहित्यिक एन.टी. बनसोडे यांनी मोलाची कामगिरी केली. नगरपालिकेचे तत्कालीन पहिले नगरसेवक मोहनदास बाबरे हे होते. जसजशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची व्याप्ती वाढत गेली, त्याप्रमाणे दुसºया पिढीतील नेत्यांमध्ये आर.एस. रणशृंगारे, एल.एन. आबुटे, तुकाराम (बुवा) इंगळे, विष्णू बाबरे, मल्हारी सोनकांबळे, भीमराव सरवदे आदी लोकांचा समावेश होता. या मंडळींनी बाबासाहेबांच्या हयातीमध्ये चळवळीतील सामाजिक व राजकीय लढे लढले आहेत. बाबासाहेबांच्या हयातीमध्ये चळवळीतील शेड्युल कास्ट फेडरेशन, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. 

याच कालावधीत राजकीय क्षेत्रात काम करणारी तरुण पिढी आली. त्यामध्ये बी.एस. तळभंडारे, एम.के. कांबळे, सुभानजी बनसोडे यांचा उदय झाला. दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भूमिहीनांचा लढा उभा केला होता, यामध्ये राहीबाई निकंबे यांनी महिलांचे नेतृत्व केले होते.

कालांतराने दलित पँथरची चळवळ सुरू झाली, त्यात राजा तळभंडारे, विनायक बनसोडे, बब्रुवान साळवे यांनी तीव्रता वाढवली. त्यानंतरची चळवळ अतिशय वेगवान करण्यासाठी राजाभाऊ इंगळे, राजाभाऊ सरवदे, कुमार तळभंडारे, भीमराव बाबरे, राहुल सरवदे, यल्लेश्वर सरवदे, भारत सुतकर, सुनील आबुटे, सुबोध वाघमोडे, सुधाकर सरवदे, राम सरवदे, मोहन बनसोडे आदींनी पँथरचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. यापैकी काही लोक आजही त्याच ताकदीने  निळे निशाण घेऊन आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्याचे काम करीत आहेत. 

शहराकडे चला...- डॉ. बाबासाहेबांनी शहराकडे चला असा नारा दिला होता, त्याला प्रतिसाद म्हणून शहरालगत असणाºया दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ आदी भागातील लोक सोलापुरात वास्तव्याला आले होते. याच काळात बुधवार पेठ, मिलिंद नगर येथे वास्तव्य झाले. अशाच पद्धतीने राजकारणाच्या काळात मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बसवकल्याण आदी भागातून लोक स्थलांतरीत झाले. लोकवस्ती वाढल्याने सोलापूर शहरातील मिलिंद नगर या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू होत गेले. आज या बुधवार पेठ, मिलिंद नगरला चळवळीची राजधानी म्हणून ओळखले जाते. 

टॅग्स :Solapurसोलापूर