शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भाऊसाहेब गेले जेवायला अन् चहाला..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 13:03 IST

Lokmat Sting Operation; दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय : अर्ध्या तासाची सुटी गेली दीड तासावर

ठळक मुद्दे- सोलापुरातील शासकीय कार्यालयांचे दुपारी जेवणानंतरचे स्टिंग आॅपरेशन- अधिकारी व कर्मचाºयांकडून कामाच्या वेळा पाळल्या जात नसल्याचे आले दिसून- शासकीय कामासाठी येणाºया नागरिकांनी गैरसोय

सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय आहे. जेवणासाठी दुपारी अर्ध्या तासाची सुटी असताना सुमारे दीड तास कर्मचारी कार्यालयाबाहेर असल्याचे दिसून आले. खुर्ची रिकामी दिसल्यानंतर नागरिकांनी शिपायाकडे संबंधित कर्मचाºयांची विचारणा केली असता भाऊसाहेब आताच जेवायला गेले.. आताच चहा प्यायला गेले.. असे उत्तर देण्यात येत आहे. 

राज्य शासनाने दुपारच्या जेवणासाठी शासकीय कर्मचाºयांना अर्धा तास वेळ निश्चित केला आहे. या वेळेशिवाय कर्मचाºयांनी कार्यालयाबाहेर जाऊ नये, असे आदेश दिले आहेत. असे असतानाही या आदेशाची कोणतीच अंमलबजावणी तहसील कार्यालयातील कर्मचाºयांकडून होत नसल्याची माहिती येथे कामानिमित्त आलेले ज्येष्ठ नागरिक तुकाराम पाटील यांनी दिली.

अर्ध्या तासाची सुटी दीड तासावर गेली तरीही कर्मचारी आपल्या टेबलावर येत नसल्याने अनेक नागरिकांनी यावेळी रिकाम्या खुर्चीसमोरच उभे राहून त्यांची प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून आले. तहसील कार्यालयातील कर्मचाºयांचा हा प्रकार नेहमीचाच असल्याची माहिती यावेळी नागरिकांकडून देण्यात आली. 

तहसील कार्यालयात तलाठी व मंडल अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष आहे. गावात नसलेला तलाठी या कक्षात तरी असेल या आशेने काही शेतकरी तहसील कार्यालयात आले होते. मात्र या कक्षातही भाऊसाहेब दिसत नसल्याने अनेक शेतकरी यावेळी तलाठी भाऊसाहेबांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र दिसून आले. 

टॅग्स :Solapurसोलापूर