शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

दुसऱ्या वर्षीही आषाढी वारीचा भगवंत रथोत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:17 IST

प्रतिवर्षी आषाढी एकादशीचा उपवास वारकरी पंढरपुरात करून, मराठवाडा व विदर्भातील अनेक वारकऱ्यांच्या दिंड्या या बार्शी भगवंत नगरीत येऊन भगवंताचे ...

प्रतिवर्षी आषाढी एकादशीचा उपवास वारकरी पंढरपुरात करून, मराठवाडा व विदर्भातील अनेक वारकऱ्यांच्या दिंड्या या बार्शी भगवंत नगरीत येऊन भगवंताचे दर्शन करून पुढे जाण्याची आजपर्यंतची प्रथा आहे, परंतु कोरोना महामारीमुळे यंदा दुसऱ्या वर्षीही या दिंड्यांना आपापल्या गावीच थांबावे लागले आहे. काही दिंड्या भगवंताचे दर्शन घेऊन पंढरीकडे प्रयाण करतात, तर काही दिंड्या विठ्ठलाच्या दर्शनानंतर बार्शीत भगवंत दर्शनाला येतात. कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी आता या दिंड्यांना बार्शीत व पंढरपुरातही जाता येणार नाही.

दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने भगवंत मंदिरासह बार्शीत भाविकांची मोठी गर्दी होत असते. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे बार्शीकरांना हे अनुभवता आले नाही, यंदाच्या वर्षीही कोरोनामुळे गर्दी होऊ नये, यासाठी शासनाच्या निर्णयानुसार दिंड्यांची वारी रद्द झाली आहे. आषाढी एकादशी दिवशी भगवंत रथोत्सवही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. तोही या वर्षी रद्द करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

---