शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

दुसऱ्या वर्षीही आषाढी वारीचा भगवंत रथोत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:17 IST

प्रतिवर्षी आषाढी एकादशीचा उपवास वारकरी पंढरपुरात करून, मराठवाडा व विदर्भातील अनेक वारकऱ्यांच्या दिंड्या या बार्शी भगवंत नगरीत येऊन भगवंताचे ...

प्रतिवर्षी आषाढी एकादशीचा उपवास वारकरी पंढरपुरात करून, मराठवाडा व विदर्भातील अनेक वारकऱ्यांच्या दिंड्या या बार्शी भगवंत नगरीत येऊन भगवंताचे दर्शन करून पुढे जाण्याची आजपर्यंतची प्रथा आहे, परंतु कोरोना महामारीमुळे यंदा दुसऱ्या वर्षीही या दिंड्यांना आपापल्या गावीच थांबावे लागले आहे. काही दिंड्या भगवंताचे दर्शन घेऊन पंढरीकडे प्रयाण करतात, तर काही दिंड्या विठ्ठलाच्या दर्शनानंतर बार्शीत भगवंत दर्शनाला येतात. कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी आता या दिंड्यांना बार्शीत व पंढरपुरातही जाता येणार नाही.

दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने भगवंत मंदिरासह बार्शीत भाविकांची मोठी गर्दी होत असते. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे बार्शीकरांना हे अनुभवता आले नाही, यंदाच्या वर्षीही कोरोनामुळे गर्दी होऊ नये, यासाठी शासनाच्या निर्णयानुसार दिंड्यांची वारी रद्द झाली आहे. आषाढी एकादशी दिवशी भगवंत रथोत्सवही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. तोही या वर्षी रद्द करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

---