शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रिमझिम पावसात कर्मचाऱ्याचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:28 IST

दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम रिमझिम पावसात आपल्या रोजीरोटीसाठी कोरोना कालावधीत काम करूनही उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. आमचे प्रश्न ...

दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम रिमझिम पावसात आपल्या रोजीरोटीसाठी कोरोना कालावधीत काम करूनही उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. आमचे प्रश्न सोडवा या मागणीसाठी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून पंचायत समितीच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी कर्मचाऱ्यांना बोलावून तुमचे प्रश्न १५ दिवसांत मार्गी लावू, असे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात १० ऑगस्ट २०२० च्या परिपत्रकानुसार सुधारित वेतन मिळावे, किमान वेतन व महागाई भत्ता यातील फरकाची रक्कम मिळावी, सर्व कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळावा, ग्रामपंचायत कर्मचारीसंदर्भातील सेवा पुस्तके व इतर सर्व रजिस्टर माहितीसह अद्ययावत करावीत, अशी मागणी केली होती.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष दत्ता पाटील, शिवाजी भालेराव, मनोज कांबळे, ज्ञानेश्वर खजूरकर, मनोहर कांबळे, दादासाहेब वाघमारे, श्रीमंत जाधव, तुकाराम क्षीरसागर, विठ्ठल राठोड, आकाश होमकर गैबी साहेब मुल्ला आदींची उपस्थिती होती.

----

उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांचे बहुतांशी प्रश्न ग्रामपंचायत स्तरावरच सुटणारे आहेत. यासाठी तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेची लवकरात लवकर बैठक बोलावू. त्यांचे प्रश्न १५ दिवसांत मार्गी लावू.

-गणेश मोरे, गटविकास अधिकारी

----

पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसलेले ग्रामपंचायत कर्मचारी.