शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
4
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
5
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचे मृतदेह सापडले, परिसरात खळबळ!
6
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
7
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
8
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
9
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
10
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
11
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
12
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
13
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
14
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
15
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
16
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
17
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
18
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
19
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
20
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी

‘कल्याणक्रांती’ आंदोलनाची मुहूर्तमेढ; महात्मा बसवेश्वरांच्या वास्तव्याने सोलापूर जिल्हा पुनीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 14:53 IST

सोलापूर : महात्मा बसवेश्वरांचा समतावादी मार्ग हा फक्त भारतच नव्हे; तर संपूर्ण जगापर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या या समताधिष्ठित कार्याचा ...

सोलापूर : महात्मा बसवेश्वरांचा समतावादी मार्ग हा फक्त भारतच नव्हे; तर संपूर्ण जगापर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या या समताधिष्ठित कार्याचा साक्षीदार हा सोलापूर जिल्हा असून त्यांच्या पदस्पर्शाने हा जिल्हा पुनीत झाला आहे.

महात्मा बसवण्णा यांचे चरित्र समजून देण्यातही सोलापूरचे योगदान महत्त्वाचे आहे. सोन्नलगीचे नायक शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी आपल्या अनेक वचनांत बसवण्णांची थोरवी गायली आहे. संतश्रेष्ठ नामदेव रायांच्या अभंगातून इतर संतांच्या चरित्राची ओळख व्हावी त्याप्रमाणे सिद्धरामेश्वरांच्या वचनांतून बसवण्णांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि समकालीन शरणांचे यथार्थ दर्शन घडते.

डॉ. जयदेवीताई लिगाडे, शशिकलाताई मडकी, स्वरूपाताई बिराजदार या तीन पिढ्यांच्या सोलापूर कन्यांनी बसवण्णांच्या वचनांचा मराठीत जागर केला. शिवाय बसवण्णा आणि सिद्धरामेश्वर यांचा परस्पर अनुबंधावरही मुबलक काम केले आहे. भगवानदास तिवारी, डॉ. इरेश स्वामी, सिंधूताई काडादी, चन्नवीर भद्रेश्वरमठ यांच्यासह अनेक लेखक-अनुवादकांनी बसव साहित्याच्या प्रसार व प्रचारात योगदान दिल्याचे दिसून येते. मंगळवेढ्याशी संबंधित असलेले बंगळुरूस्थित शिवकुमार पावटे यांनी बसवण्णा आणि मंगळवेढा या विषयावर स्वतंत्र संशोधन केले आहे.

मंगळवेढ्यातील वास्तव्याचा ग्रंथात उल्लेख

बाराव्या शतकात बसवण्णांनी उभारलेल्या समग्र ‘कल्याणक्रांती’ आंदोलनाची मुहूर्तमेढ मंगळवेढ्यात झाली. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा ही बसवण्णांची खऱ्या अर्थाने कर्मभूमी आहे. कलचुरी राजघराण्यातील बिज्जळ राजांची मंगळवेढा ही राजधानी होती. महात्मा बसवेश्वरांनी मंगळवेढ्यामध्ये राज्य सेवा केली. मंगळवेढ्यातील वास्तव्याबाबत हरिहर कवी रचित बसवराज देवर रगळे या चरित्रग्रंथात तीन प्रसंग सविस्तरपणे रेखाटण्यात आली आहेत.

 

महात्मा बसवेश्वर हे माणसाच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्याचे महत्त्वाचे काम केले. समाधिष्ठित समाज निर्मितीसाठी त्यांनी भेदाभेद टाळणे, स्त्रियांना समान दर्जा देणे याबाबतचे कार्य केले. परमेश्वर हा आपल्या मनात असून त्याला पाहण्याची दृष्टी त्यांनी सर्वांनाच दिली. त्यांचे विचार व कार्य हे आजही कालसुसंगत आहे.

- सिंधूताई काडादी, अध्यक्षा, बसव केंद्र

 

महात्मा बसवेश्वर यांचे मंगळवेढातील वास्तव्य हे ८ ते १२ वर्षांचे असावे. मंगळवेढ्यामध्येच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण झाली. कलचुरी राजघराण्यातील बिज्जळ राजांची मंगळवेढा ही राजधानी होती. बसवण्णांनी मंगळवेढ्यात राज्य सेवा सुरू केली. त्यानंतर राजा बिज्जळांनी आपली राजधानी मंगळवेढ्याहून कल्याणला आणली. येथे बसवण्णांकडे प्रधानमंत्रीपद देण्यात आले.

- चन्नवीर भद्रेश्वरमठ, बसव साहित्याचे अभ्यासक

टॅग्स :Solapurसोलापूर