शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

‘कल्याणक्रांती’ आंदोलनाची मुहूर्तमेढ; महात्मा बसवेश्वरांच्या वास्तव्याने सोलापूर जिल्हा पुनीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 14:53 IST

सोलापूर : महात्मा बसवेश्वरांचा समतावादी मार्ग हा फक्त भारतच नव्हे; तर संपूर्ण जगापर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या या समताधिष्ठित कार्याचा ...

सोलापूर : महात्मा बसवेश्वरांचा समतावादी मार्ग हा फक्त भारतच नव्हे; तर संपूर्ण जगापर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या या समताधिष्ठित कार्याचा साक्षीदार हा सोलापूर जिल्हा असून त्यांच्या पदस्पर्शाने हा जिल्हा पुनीत झाला आहे.

महात्मा बसवण्णा यांचे चरित्र समजून देण्यातही सोलापूरचे योगदान महत्त्वाचे आहे. सोन्नलगीचे नायक शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी आपल्या अनेक वचनांत बसवण्णांची थोरवी गायली आहे. संतश्रेष्ठ नामदेव रायांच्या अभंगातून इतर संतांच्या चरित्राची ओळख व्हावी त्याप्रमाणे सिद्धरामेश्वरांच्या वचनांतून बसवण्णांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि समकालीन शरणांचे यथार्थ दर्शन घडते.

डॉ. जयदेवीताई लिगाडे, शशिकलाताई मडकी, स्वरूपाताई बिराजदार या तीन पिढ्यांच्या सोलापूर कन्यांनी बसवण्णांच्या वचनांचा मराठीत जागर केला. शिवाय बसवण्णा आणि सिद्धरामेश्वर यांचा परस्पर अनुबंधावरही मुबलक काम केले आहे. भगवानदास तिवारी, डॉ. इरेश स्वामी, सिंधूताई काडादी, चन्नवीर भद्रेश्वरमठ यांच्यासह अनेक लेखक-अनुवादकांनी बसव साहित्याच्या प्रसार व प्रचारात योगदान दिल्याचे दिसून येते. मंगळवेढ्याशी संबंधित असलेले बंगळुरूस्थित शिवकुमार पावटे यांनी बसवण्णा आणि मंगळवेढा या विषयावर स्वतंत्र संशोधन केले आहे.

मंगळवेढ्यातील वास्तव्याचा ग्रंथात उल्लेख

बाराव्या शतकात बसवण्णांनी उभारलेल्या समग्र ‘कल्याणक्रांती’ आंदोलनाची मुहूर्तमेढ मंगळवेढ्यात झाली. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा ही बसवण्णांची खऱ्या अर्थाने कर्मभूमी आहे. कलचुरी राजघराण्यातील बिज्जळ राजांची मंगळवेढा ही राजधानी होती. महात्मा बसवेश्वरांनी मंगळवेढ्यामध्ये राज्य सेवा केली. मंगळवेढ्यातील वास्तव्याबाबत हरिहर कवी रचित बसवराज देवर रगळे या चरित्रग्रंथात तीन प्रसंग सविस्तरपणे रेखाटण्यात आली आहेत.

 

महात्मा बसवेश्वर हे माणसाच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्याचे महत्त्वाचे काम केले. समाधिष्ठित समाज निर्मितीसाठी त्यांनी भेदाभेद टाळणे, स्त्रियांना समान दर्जा देणे याबाबतचे कार्य केले. परमेश्वर हा आपल्या मनात असून त्याला पाहण्याची दृष्टी त्यांनी सर्वांनाच दिली. त्यांचे विचार व कार्य हे आजही कालसुसंगत आहे.

- सिंधूताई काडादी, अध्यक्षा, बसव केंद्र

 

महात्मा बसवेश्वर यांचे मंगळवेढातील वास्तव्य हे ८ ते १२ वर्षांचे असावे. मंगळवेढ्यामध्येच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण झाली. कलचुरी राजघराण्यातील बिज्जळ राजांची मंगळवेढा ही राजधानी होती. बसवण्णांनी मंगळवेढ्यात राज्य सेवा सुरू केली. त्यानंतर राजा बिज्जळांनी आपली राजधानी मंगळवेढ्याहून कल्याणला आणली. येथे बसवण्णांकडे प्रधानमंत्रीपद देण्यात आले.

- चन्नवीर भद्रेश्वरमठ, बसव साहित्याचे अभ्यासक

टॅग्स :Solapurसोलापूर