शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

बार्शी गाव मोठ्ठ; पण कर भरण्यात मागं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:20 IST

बार्शी: सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी अन्‌ ‘अ’ दर्जाची नगरपालिका असलेल्या बार्शी नगरपालिका प्रशासनाकडून मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर थकबाकीदारांना घरपट्टी ...

बार्शी: सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी अन्‌ ‘अ’ दर्जाची नगरपालिका असलेल्या बार्शी नगरपालिका प्रशासनाकडून मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर थकबाकीदारांना घरपट्टी आणि नळपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, अद्यापही बार्शीकरांकडून पालिकेचे सुुमारे २४ कोटींची थकबाकी वसूल होणे बाकी आहे़ यासाठी पालिकेने १३ पथकांची नियुक्ती केली आहे. मार्चच्या पाहिल्या आठवड्यात पाच दिवसात ४८ लाख रुपये वसूल झाले आहेत.

ज्या नागरिकांची थकबाकी, बाकी आहे अशांनी तत्काळ आपली बाकी भरली नाही तर नळ पाणी पुरवठा खंडित करण्याची तसेच गाळे सील करण्याची कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी दिला आहे. या थकबाकीदारांच्या यादीत अनेक धनदांडग्या लाेकांचीच संख्या जास्त आहे. बार्शी नगरपालिका प्रशासनाकडील आकडेवाडीनुसार ५० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची संख्या तब्बल १,६६१ एवढी असून यांच्याकडून १७ कोटी ११ लाख ८३ हजार ९०० रुपये येणे बाकी आहे. तर, २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्यांची संख्या २,२१६ असून, त्यांच्याकडून ७ कोटी ७९ लाख ३१ हजार ३०० रुपये एवढी रक्कम येणे बाकी आहे.

एकंदरीत एकूण रकमेची बेरीज केल्यास, जवळपास २५ कोटी रुपयांच्या घरात थकबाकी येणे बाकी आहे. गेल्या पाच दिवसांपासून या वसुलीसाठी पालिकेने चार जणांचे एक असे १३ पथके नियुक्त केली आहेत. ही पथके करवसुली निरीक्षक व्ही़ एस़ पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली घरोघरी तसेच दुकानी जाऊन वसुुलीचे काम करीत आहेत़ मुख्याधिकारी दगडे पाटील या वसुलीकडे लक्ष ठेवून आहेत़

---

असा आहे थकीत बिलाचा तपशील

एकूण मागणी आहे ४६ कोटी ५५ लाख. तर एकूण वसुुलीची मागणी ही ४६ कोटी ५५ लाख एवढी आह़े त्यात ३३ कोटी ही मूळ रक्कम आहे. त्यावरील व्याजाची रक्कम ही १३ कोटी एवढी झाली आहे़ यामध्ये यावर्षीच्या १६ कोटी चालू बाकीचाही समावेश आहे़ तर २९ कोटी रुपयांत थकबाकी आणि व्याज याचा समावेश आहे़ आतापर्यंत यातील ३ कोटी २० लाख रुपये जमा झाले आहेत़ बार्शी तहसील कार्यालयाकडे ११ लाख रुपये, पंचायत समितीकडे २ लाख तर आयटीआय कॉलेजकडेही ७० हजार एवढी थकबाकी आहे़ ज्यांच्याकडे बाकी किंवा थकबाकी आहे अशांना पैसे भरण्यासाठी केवळ २४ दिवस शिल्लक आहेत़ कारवाई टाळण्यााठी चालू वर्षाचा कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे़

-----

मोबाईल टॉवरचेही बिल थकले

शहरातील काही जागा मालकांकडे मोबाईल कंपन्यांचे टॉवर बसविण्यात आले आहे. या टॉवर कंपन्यांकडून ते मासिक भाडेही घेतात. मात्र, त्यांच्याकडून घरपट्टी आणि थकबाकी भरण्यात येत नाही. त्यामुळे, या जागा मालकांनीही लवकरात लवकर थकबाकी भरावी, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराच दगडे पाटील यांनी दिला आहे.