शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

वकील दाम्पत्य हत्येच्या निषेधार्थ बार्शीत वकील संघांचे कामबंद आंदोलन

By काशिनाथ वाघमारे | Updated: January 29, 2024 18:12 IST

बार्शी वकील संघाने सोमवारी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला.

काशिनाथ वाघमारे, सोलापूर : नगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकिली व्यावसाय करणारे राजाराम आढाव व त्यांची पत्नी मनीषा या दाम्पत्याचे अपहरण करून हत्या केल्याच्या निषेधार्थ बार्शी वकील संघाने सोमवारी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला.

बार्शी वकील संघाचे अध्यक्ष काका गुंड यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. नगर जिल्ह्यातील आढाव दाम्पत्याची पक्षकाराने हत्या केल्याच्या निषेधार्थ व यापूर्वी वकिलांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध म्हणून न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा ठराव केला. त्या घटनेची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात यावी, हा खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील नेमण्यात यावा व वकील सुरक्षा कायदा लवकरात लवकर लागू करण्यात यावा, या मागणीचे निवेदन निवासी तहसीलदार बदे व संजीवन मुंढे यांना देण्यात आले. निवेदन देताना वकील प्रोटेक्शन कायदा लागू झालाच पाहिजे, आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे , वकील एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देत निवेदन सादर केले.

यावेळी विकास जाधव, पद्माकर काटमोरे, महेश जगताप, संभाजी गलांडे, किशोर करडे, आर. यू. वैद्य, गणेश हांडे, श्याम झाल्टे, अविनाश गायकवाड, राजू शेख, राहुल झाल्टे, अक्षय पाटील, घोगरे, हांडे यांच्यासह वकील संघाच्या ५० सदस्यांच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन लक्ष वेधले.

टॅग्स :barshi-acबार्शी