शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

बस्त्याची बार्शी...भांड्यांची सरशी; कोकणातला कच्चामाल रेल्वेनं कुर्डूवाडीत, तिथून बैलगाडीनं बार्शीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 11:57 IST

विविध व्हरायटींची ग्राहकांना भुरळ : कारखानदारांनी केले मार्केटिंग

ठळक मुद्देकारखानदारी आणि दुकान चालविताना येणाºया अडचणींमुळे नवीन पिढी आता इतर व्यवसायाकडे वळली अलीकडे तांब्या-पितळेच्या भांड्यांचे आरोग्याच्या बाबतीमध्ये महत्त्व व आयुर्वेदाचे महत्त्व वाढले

बार्शी : बार्शी शहरात एकूण २२ दुकाने आहेत. प्रत्येक भांडे दुकानदाराला आपल्या दुकानांमध्ये किमान १०० ते १५० प्रकारची भांडी ठेवावी लागतात़ त्यामध्ये चमच्यापासून पाणी तापविण्याच्या बंबापर्यंतचा समावेश असतो़ सध्याच्या ग्राहकांना व्हरायटी हवी असते, ती येथे पाहायला मिळते़ त्यामुळेच आजही बार्शीत भांडे खरेदीसाठी ग्राहकांचा ओढा आहे़ शिवाय बार्शीच्या कारखानदारांनीही त्याचे चांगलेच मार्केटिंग केल्याचे दिसून येते.

राजाभाऊ यवणकर यांच्या दुकान आणि कारखान्याची १२५ वर्षांची परंपरा आहे. पंचाहत्तरी ओलांडलेले राजाभाऊ म्हणाले, ४०-५० वर्षांपूर्वी कच्चामाल हा रेल्वेने रत्नागिरीहून कुर्डूवाडी येथे यायचा आणि तेथून बैलगाडीने बार्शी येथे आणला जायचा़ त्यावेळी लोखंडी घागरी, पाट्या अन् तवे अशा वस्तू बनविल्या जायच्या. मात्र नंतर पितळी घागरी, हांडे बनवायला सुरुवात केली. 

उसाच्या रसापासून गूळ बनविण्यासाठी, हळकुंड उकळून हळद बनविण्यासाठी लागणारी मोठी कढई आम्ही बनवायचो. इंदापूरपासून बीडपर्यंत त्यांना ग्राहकांची मागणी होती. आमच्या कढया इतक्या प्रसिद्ध होत्या की त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी एका दौºयानिमित्त आल्यानंतर पाहिल्या व असा कारखाना सांगली भागात सुरू करा, असे वडिलांना सांगितले, असेही त्यांनी सांगितले़ बार्शीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये मिलिंद पाठक यांचा अ‍ॅल्युमिनियमची भांडी बनविण्याचा कारखाना आहे़ या कारखान्यात ताट, डबे, चरवी, कढई या प्रकारची भांडी तयार होतात.

अडचणीमुळे नवी पिढी अन्य व्यवसायाकडे वळलीअलीकडच्या काळात कारखानदारी अडचणीत आली आहे, असे सांगत यवणकरांनी फॅक्टरी अ‍ॅक्ट फार जाचक आहे़ दहापेक्षा अधिक कामगार कारखान्यात ठेवल्यानंतर ईएसआय व पीएफ भरण्यापासून अनेक कायद्यांचे पालन करावे लागते़ कामगारांचे हित पाहिले पाहिजे, पण नियमात शिथिलतेचीही गरज आहे़ कारखानदारी आणि दुकान चालविताना येणाºया अडचणींमुळे नवीन पिढी आता इतर व्यवसायाकडे वळल्याचे राजाभाऊ यवणकर यांनी सांगितले.

म्हणूनच तांब्याच्या भांड्यांच्या मागणीत वाढबार्शीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये विभुते यांचा तांब्या-पितळेची भांडी बनविण्याचा खूप जुना कारखाना आहे़ कारखान्याची माहिती सांगताना तिसºया पिढीतील कुमार विभुते यांनी बाजारात नवे ट्रेंड येतात़ अलीकडे तांब्या-पितळेच्या भांड्यांचे आरोग्याच्या बाबतीमध्ये महत्त्व व आयुर्वेदाचे महत्त्व वाढले आहे़ त्यामुळे या भांड्यांमधून अन्न सेवन करणे व पाणी पिणे याला ग्राहक पसंती देऊ लागले आहेत़ या कारखान्यामध्ये तांब्या-पितळेची घागर व हंडा बनविले जातात़ पूर्वी पुणे व भंडारा येथून कारखान्यासाठी लागणारा कच्चामाल येत असे, त्यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरbarshi-acबार्शीMarketबाजार