शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यात कर्ज वाटपासाठी बँकांनी हात आखडला, रब्बीसाठी अवघे १०८ कोटी वाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 11:38 IST

कर्जमाफीच्या चक्रात अडकलेल्या जिल्ह्यातील बँकांनी रब्बी हंगामासाठी कर्ज वाटपात हात आखडता घेतला असून, दोन महिन्यांत अवघे १०८ कोटी एक लाख रुपये कर्ज वाटले आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांत कर्ज वाटपाची टक्केवारी अवघी ४.५२ इतकीचजिल्हा बँकेने मागील वर्षी रब्बीसाठी तीन कोटी ११ लाख रुपये म्हणजे यावर्षीच्या चौपट कर्ज वाटले होते.मागील वर्षी यावर्षीपेक्षा अधिक म्हणजे २३१ कोटी ५७ लाख रुपये इतके कर्ज वाटप केले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ५ : कर्जमाफीच्या चक्रात अडकलेल्या जिल्ह्यातील बँकांनी रब्बी हंगामासाठी कर्ज वाटपात हात आखडता घेतला असून, दोन महिन्यांत अवघे १०८ कोटी एक लाख रुपये कर्ज वाटले आहे.सोलापूर जिल्हा हा प्रामुख्याने रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे रब्बी हंगामात बँकांकडून कर्जाची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. याच कालावधीत मागील वर्षीचे कर्ज भरणे व नव्याने कर्ज घेण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर केली जाते. रब्बीसाठी कर्ज वाटपाला आॅक्टोबरपासून सुरुवात होते. आॅक्टोबरपासून नव्याने कर्ज वाटपाला सुरुवात होत असली तरी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप केले जाते. यावर्षी कर्जमाफीमुळे कर्ज घेणारे भरण्यासाठी बँकांकडे फिरकत नाहीत व नव्याने कर्जवाटपही केले जात नाही. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने आतापर्यंत १०१ शेतकºयांना ७८ लाख रुपये इतके कर्ज वाटले आहे. ग्रामीण बँकेला ९४ कोटी ३२ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, बँकेने आतापर्यंत २०२ शेतकºयांना दोन कोटी ४५ लाख रुपये इतके कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील सर्वच राष्टÑीयीकृत बँकांना रब्बी हंगामासाठी १८१५ कोटी १६                 लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षात ५१६१ शेतकºयांना १०४ कोटी  ७८ लाख रुपये इतके कर्ज वाटप केले आहे.---------------------बँकांकडून पारखून कर्ज वाटप - २००७-०८ मध्ये केंद्र सरकारने केलेल्या कर्जमाफीनंतर राज्य शासनाने यावर्षी कर्जमाफी केली आहे. काही ठराविक शेतकरी वगळता बहुतेक शेतकरी दोन्ही वेळच्या कर्जमाफीच्या यादीत आहेत. कर्ज घेतल्यानंतर पुन्हा कर्जमाफीची वाट पाहणारे व बँकांशी नियमित व्यवहार करणारे शेतकरी अशा दोन प्रकारच्या शेतकºयांची यादी बँकांकडे आहे. थकबाकीमुळे बँका मोठ्या प्रमाणावर अडचणीत आल्याने आता बँका पारखून कर्ज देत आहेत.------------------- दोन महिन्यांत कर्ज वाटपाची टक्केवारी अवघी ४.५२ इतकीच- सर्व बँकांना रब्बीसाठी २३८९ कोटी ४८ लाख रुपये इतके कर्ज वाटप करावयाचे असून, प्रत्यक्षात १०८ कोटी एक लाख रुपयेच कर्ज वाटले आहे.- मागील वर्षी यावर्षीपेक्षा अधिक म्हणजे २३१ कोटी ५७ लाख रुपये इतके कर्ज वाटप केले होते.- जिल्हा बँकेने मागील वर्षी रब्बीसाठी तीन कोटी ११ लाख रुपये म्हणजे यावर्षीच्या चौपट कर्ज वाटले होते.

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँक