शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

सोलापूर जिल्ह्यात कर्ज वाटपासाठी बँकांनी हात आखडला, रब्बीसाठी अवघे १०८ कोटी वाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 11:38 IST

कर्जमाफीच्या चक्रात अडकलेल्या जिल्ह्यातील बँकांनी रब्बी हंगामासाठी कर्ज वाटपात हात आखडता घेतला असून, दोन महिन्यांत अवघे १०८ कोटी एक लाख रुपये कर्ज वाटले आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांत कर्ज वाटपाची टक्केवारी अवघी ४.५२ इतकीचजिल्हा बँकेने मागील वर्षी रब्बीसाठी तीन कोटी ११ लाख रुपये म्हणजे यावर्षीच्या चौपट कर्ज वाटले होते.मागील वर्षी यावर्षीपेक्षा अधिक म्हणजे २३१ कोटी ५७ लाख रुपये इतके कर्ज वाटप केले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ५ : कर्जमाफीच्या चक्रात अडकलेल्या जिल्ह्यातील बँकांनी रब्बी हंगामासाठी कर्ज वाटपात हात आखडता घेतला असून, दोन महिन्यांत अवघे १०८ कोटी एक लाख रुपये कर्ज वाटले आहे.सोलापूर जिल्हा हा प्रामुख्याने रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे रब्बी हंगामात बँकांकडून कर्जाची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. याच कालावधीत मागील वर्षीचे कर्ज भरणे व नव्याने कर्ज घेण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर केली जाते. रब्बीसाठी कर्ज वाटपाला आॅक्टोबरपासून सुरुवात होते. आॅक्टोबरपासून नव्याने कर्ज वाटपाला सुरुवात होत असली तरी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप केले जाते. यावर्षी कर्जमाफीमुळे कर्ज घेणारे भरण्यासाठी बँकांकडे फिरकत नाहीत व नव्याने कर्जवाटपही केले जात नाही. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने आतापर्यंत १०१ शेतकºयांना ७८ लाख रुपये इतके कर्ज वाटले आहे. ग्रामीण बँकेला ९४ कोटी ३२ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, बँकेने आतापर्यंत २०२ शेतकºयांना दोन कोटी ४५ लाख रुपये इतके कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील सर्वच राष्टÑीयीकृत बँकांना रब्बी हंगामासाठी १८१५ कोटी १६                 लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षात ५१६१ शेतकºयांना १०४ कोटी  ७८ लाख रुपये इतके कर्ज वाटप केले आहे.---------------------बँकांकडून पारखून कर्ज वाटप - २००७-०८ मध्ये केंद्र सरकारने केलेल्या कर्जमाफीनंतर राज्य शासनाने यावर्षी कर्जमाफी केली आहे. काही ठराविक शेतकरी वगळता बहुतेक शेतकरी दोन्ही वेळच्या कर्जमाफीच्या यादीत आहेत. कर्ज घेतल्यानंतर पुन्हा कर्जमाफीची वाट पाहणारे व बँकांशी नियमित व्यवहार करणारे शेतकरी अशा दोन प्रकारच्या शेतकºयांची यादी बँकांकडे आहे. थकबाकीमुळे बँका मोठ्या प्रमाणावर अडचणीत आल्याने आता बँका पारखून कर्ज देत आहेत.------------------- दोन महिन्यांत कर्ज वाटपाची टक्केवारी अवघी ४.५२ इतकीच- सर्व बँकांना रब्बीसाठी २३८९ कोटी ४८ लाख रुपये इतके कर्ज वाटप करावयाचे असून, प्रत्यक्षात १०८ कोटी एक लाख रुपयेच कर्ज वाटले आहे.- मागील वर्षी यावर्षीपेक्षा अधिक म्हणजे २३१ कोटी ५७ लाख रुपये इतके कर्ज वाटप केले होते.- जिल्हा बँकेने मागील वर्षी रब्बीसाठी तीन कोटी ११ लाख रुपये म्हणजे यावर्षीच्या चौपट कर्ज वाटले होते.

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँक