शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

सोशल ‘डिस्टन्स’ पाळले जात नसल्यानेच बँक कर्मचारी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 18:45 IST

दुर्लक्षितच ठेवणार का ?: युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनचा सवाल

ठळक मुद्देअत्यावश्यक सेवा देणाºया इतर विभागातील कर्मचाºयांना पन्नास लाख रुपये विमा कवच दिले जाते बँक कर्मचाºयांचा याबाबतीत विचारही केला गेला नाही, ही बाब दुजाभावाची आहेकिमान स्थानिक राजकीय नेत्यांनी याचा विचार करून बँक कर्मचाºयांना न्याय द्यावा

सोलापूर: आर्थिक व्यवहार करण्यासाठी किंवा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी बँकेत येणारे ग्राहक फिजिकल डिस्टन्सचे भान ठेवत नसल्यामुळे बँक कर्मचाºयांचा जीव धोक्यात आला असून, आजवर २१ कर्मचारी कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. ही स्थिती पाहता बँक कर्मचारी नेहमी दुर्लक्षितच राहणार का? असा सवाल युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनचे जिल्हा समन्वयक सुहास मार्डीकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना उपस्थित केला आहे.

कोरोना महामारीच्या काळात बँक सेवा अत्यावश्यक असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. कर्मचाºयांना योग्य ती सुविधा व सुरक्षा देण्याची ग्वाहीही देण्यात आली; पण हे सर्व कागदावरच राहिले. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रेड झोन घोषित करण्यात येत आहेत. तेथील शाखा तात्पुरत्या बंद ठेवल्या; पण तेथेही सेवा दिली जात आहे, ही गंभीर बाब आहे. 

सरकारी योजना राबविण्यासाठी बँकांवर दबाव येत आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोनमधील बँकाही सुरू कराव्याच लागत आहेत. याचा परिणाम मात्र बँक कर्मचाºयांना भोगावा लागत असून, आजवर राज्यातील साठ कर्मचाºयांना कोरोनाची बाधा झाली आहे. शिवाय २१ बँक कर्मचाºयांना जीव गमवावा लागला आहे, हे वेदनादायी असून, याचा मात्र साधा विचारही केला जात नाही, याबाबत फोरमने खंत व्यक्त केली आहे.

ग्राहक बँकेत अनेक कामांसाठी येत असतात. कुणाला पैसे काढायचे असतात किंवा भरायचे असतात. कुणाला कर्ज प्रकरणाची चौकशी करायची असते, तर कोणी सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी बँकेच्या शाखेत येतो. अशावेळी लोक फिजिकल डिस्टन्सचे भान ठेवत नाहीत. या प्रकारच्या वर्तनामुळे कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संपूर्ण बँक सील करून सर्व कर्मचाºयांना क्वारंटाईन केले जाते आणि शासन यासाठी बँकेलाच जबाबदार धरते, ही दुर्दैवाची बाब आहे, असे मार्डीकर यांनी नमूद केले आहे.

मुंबईमध्ये लोकल ट्रेनची सेवा सुरू झाली. मात्र, त्यामध्ये अत्यावश्यक सेवा देणाºया कर्मचाºयांनाच प्रवास करता येतो, असा आदेश शासनातर्फे काढण्यात आला. यावेळी मात्र अत्यावश्यक सेवेत बँक कर्मचारी येत नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे, हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

विम्याचे कवच नाही - अत्यावश्यक सेवा देणाºया इतर विभागातील कर्मचाºयांना पन्नास लाख रुपये विमा कवच दिले जाते; पण बँक कर्मचाºयांचा याबाबतीत विचारही केला गेला नाही. ही बाब दुजाभावाची आहे. आमचे कर्मचारीही जीव धोक्यात घालून ग्राहकांना सेवा देत असतात, पण सरकारला आमच्याविषयी अजिबात सहानुभूती दिसत नाही. किमान स्थानिक राजकीय नेत्यांनी याचा विचार करून बँक कर्मचाºयांना न्याय द्यावा, इतकीच माफक अपेक्षा आहे, असे सुहास मार्डीकर यांनी नमूद केले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्रcorona virusकोरोना वायरस बातम्या