शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

बँकेतच पैसं न्हायतं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 19:11 IST

गयाबाई. वय वर्षे ७६. मूल-बाळ नाही. तरुणपणातच नवºयानं सोडून दिलेली गयाबाई. माहेरातच बापाघरी आयुष्य काढलेलं. आयुष्यभर कष्ट करून पैसा ...

गयाबाई. वय वर्षे ७६. मूल-बाळ नाही. तरुणपणातच नवºयानं सोडून दिलेली गयाबाई. माहेरातच बापाघरी आयुष्य काढलेलं. आयुष्यभर कष्ट करून पैसा कमावलेला. घाम गाळून पै-पै गठुड्यात साठवलेलं. लेकरू-बाळ नाही म्हटल्यावर, पुतण्यावरच जीव लावला. कुणीतरी वेळेला पडेल म्हणून तिने तो आधार शोधला होता.

पुतण्याही तिचा आधार झाला होता. त्याच्यावर खूप जीव आणि तितकाच विश्वासही. घासातला घास काढून ठेवावा. पैशातला पैसा त्याच्यासाठी द्यावा. गठुड्यात साठलेलं पैसं काय करायचं म्हणून, या पुतण्याच्याच ओळखीनं बँकेत ठेवलेलं. डीसीसी बँकेत निराधारचे सहाशे रुपये, कधी पाचशे रुपये मिळायचे. ते पण साठवून ठेवलेले. हिश्श्याची ज्वारी मिळायची. ती विकायची. त्यातून साठलेले पैसेही असायचे. एकट्या जीवाला लागतंय किती आणि एक माणूस खातो किती?

पुतण्यावर जीव. पुतण्याचा त्याच्या मित्रावर विश्वास. मित्र पतसंस्थेचा संचालक. केली एफडी त्याच्या पतसंस्थेत. महिने गेले. वर्षे गेली. पैशाचे दामदुप्पट व्हायचे. ते पुन्हा फिरवून तिथेच एफडी करायचे. जीव जाळायचा. मोह टाळायचा. मिळालेला कमी-अधिक पैसा त्यात घालून पुन्हा एफडी. त्याला हातच लावायचा नाही.

हात लावायची गरजही नव्हती. बघता बघता ही रक्कम दीड लाख रुपये झाली होती. पतसंस्थेत आपले दीड लाख रुपये आहेत, एवढ्या गोष्टीनं गयाबाईचा जीव सुखावून जायचा. साठवलेला पैसाच उपयोगी येतो. आपल्या आयुष्याची शिदोरी आपण जमा करून ठेवलीय. काय अडचण आली, काही दुखलं-खुपलं तर तेवढाच एक आधार. ऐनवेळेला कोण दारात उभं राहू देतंय. त्या एफडीचं गयाबाईला खूप सुख वाटायचं. खूप आधार वाटायचा. वय वाढत होतं. म्हातारपण वाकडं दाखवत होतं. पण वाकेल ती म्हातारी कसली. 

पैशाला अजिबात हात लावायचा नाही. आपलाच हाय त्यो पैसा, असं म्हणायची. एकदा दुपारची दारात आली. दादा, ये दादा. मला जरा गाडीवर बँकेत घेऊन चल की. मी विचार केला, हिला आता गाडीवर बाजारात कशाला जायचंय? म्हातारी चालत कुठंही जाती. आता हिला एवढं काय तातडीचं काम पडलं? म्हणून विचारलं, कशाला जायचंय बाजारात? कायम जाती तशी जा की चालत.आवाज वाढवूनच म्हटली, आरं, गुडगं गेलं की मातीत. तुला माहीत न्हाय होय. महिनाभर उंबºयाच्या बाहीर पाऊल ठिवायला ईना. तिथल्या तिथं कसंतरी बस-ऊठ करती. मग आता बाजारात कशाला जायचंय? मी विचारलं.

कापºया आवाजात गयावया करतच गयाबाई म्हणाली, आरं, दोन दिवस झालं, परभ्या दवाखान्यात अ‍ॅडमिट हाय.मी म्हणालो, का? काय झालं त्याला? आरं, गाडीला धडकून पडला. कंबरडं मोडलंय. नीट करायचाय. पैसा न्हाई. बँकेत पैसे हायतं. चार दिवस झालं निरोप दितीया बँकेत. कोणच खाईना बघ. आज जावू याच बघ. चल, मला गाडीवर सोडून ई.मी म्हटलं, आगं, तुझा गुडघा बाद झालाय. तुला नीट उभं राहता येत नाही. त्यात तू गाडीवर बसणार. घसरली, पडली तर काय करायचं. कामात काम वाढणार. तुला गाडीवर नीट बसायला पण यायचं नाही. दुसरी गोष्ट तू अशी दुपारची माझ्या कामाच्या वेळी आलीस. मला काम सोडून जायचं म्हणजे अवघड वाटतंय. असं करतो, रिक्षा सांगतो. त्यात बसून तू बँकेत जा. 

आरं रिक्षाला पैसं कुठूनं आणायचं. कोण आणायचं रिक्षा. चल, माज्यासाठी. लय नड हाय. दवाखान्यात पैसं पाठवायचं हायतं. माझा लय जीव हाय रं त्याच्यावर. त्ये लेकरू नीट झालं तर बरं. त्याच्यासाठी नगं का पैसं द्यायला. इलाजासाठी पैसं कमी पडत्यात म्हणत होती त्याची बायको. त्याचा जीव चाललाय. त्याच्यासाठी माझा जीव चाललाय. बँकेत पैसं ठिवून काय काडी लावायची हाय? चल बाबा लवकर!

विचार केला. म्हटलं गाडीवर न्यायचं तर अवघडच आहे. ही म्हातारी नीट बसणार नाही हे नक्की. रिक्षानेच पाठवायला हवं. पाठवायला तर हवंच हवं. विचार केला. गेले साठ-सत्तर रुपये तर काय हरकत आहे. - इंद्रजित घुले(लेखक हे कवी आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूर