शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

बँकेतच पैसं न्हायतं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 19:11 IST

गयाबाई. वय वर्षे ७६. मूल-बाळ नाही. तरुणपणातच नवºयानं सोडून दिलेली गयाबाई. माहेरातच बापाघरी आयुष्य काढलेलं. आयुष्यभर कष्ट करून पैसा ...

गयाबाई. वय वर्षे ७६. मूल-बाळ नाही. तरुणपणातच नवºयानं सोडून दिलेली गयाबाई. माहेरातच बापाघरी आयुष्य काढलेलं. आयुष्यभर कष्ट करून पैसा कमावलेला. घाम गाळून पै-पै गठुड्यात साठवलेलं. लेकरू-बाळ नाही म्हटल्यावर, पुतण्यावरच जीव लावला. कुणीतरी वेळेला पडेल म्हणून तिने तो आधार शोधला होता.

पुतण्याही तिचा आधार झाला होता. त्याच्यावर खूप जीव आणि तितकाच विश्वासही. घासातला घास काढून ठेवावा. पैशातला पैसा त्याच्यासाठी द्यावा. गठुड्यात साठलेलं पैसं काय करायचं म्हणून, या पुतण्याच्याच ओळखीनं बँकेत ठेवलेलं. डीसीसी बँकेत निराधारचे सहाशे रुपये, कधी पाचशे रुपये मिळायचे. ते पण साठवून ठेवलेले. हिश्श्याची ज्वारी मिळायची. ती विकायची. त्यातून साठलेले पैसेही असायचे. एकट्या जीवाला लागतंय किती आणि एक माणूस खातो किती?

पुतण्यावर जीव. पुतण्याचा त्याच्या मित्रावर विश्वास. मित्र पतसंस्थेचा संचालक. केली एफडी त्याच्या पतसंस्थेत. महिने गेले. वर्षे गेली. पैशाचे दामदुप्पट व्हायचे. ते पुन्हा फिरवून तिथेच एफडी करायचे. जीव जाळायचा. मोह टाळायचा. मिळालेला कमी-अधिक पैसा त्यात घालून पुन्हा एफडी. त्याला हातच लावायचा नाही.

हात लावायची गरजही नव्हती. बघता बघता ही रक्कम दीड लाख रुपये झाली होती. पतसंस्थेत आपले दीड लाख रुपये आहेत, एवढ्या गोष्टीनं गयाबाईचा जीव सुखावून जायचा. साठवलेला पैसाच उपयोगी येतो. आपल्या आयुष्याची शिदोरी आपण जमा करून ठेवलीय. काय अडचण आली, काही दुखलं-खुपलं तर तेवढाच एक आधार. ऐनवेळेला कोण दारात उभं राहू देतंय. त्या एफडीचं गयाबाईला खूप सुख वाटायचं. खूप आधार वाटायचा. वय वाढत होतं. म्हातारपण वाकडं दाखवत होतं. पण वाकेल ती म्हातारी कसली. 

पैशाला अजिबात हात लावायचा नाही. आपलाच हाय त्यो पैसा, असं म्हणायची. एकदा दुपारची दारात आली. दादा, ये दादा. मला जरा गाडीवर बँकेत घेऊन चल की. मी विचार केला, हिला आता गाडीवर बाजारात कशाला जायचंय? म्हातारी चालत कुठंही जाती. आता हिला एवढं काय तातडीचं काम पडलं? म्हणून विचारलं, कशाला जायचंय बाजारात? कायम जाती तशी जा की चालत.आवाज वाढवूनच म्हटली, आरं, गुडगं गेलं की मातीत. तुला माहीत न्हाय होय. महिनाभर उंबºयाच्या बाहीर पाऊल ठिवायला ईना. तिथल्या तिथं कसंतरी बस-ऊठ करती. मग आता बाजारात कशाला जायचंय? मी विचारलं.

कापºया आवाजात गयावया करतच गयाबाई म्हणाली, आरं, दोन दिवस झालं, परभ्या दवाखान्यात अ‍ॅडमिट हाय.मी म्हणालो, का? काय झालं त्याला? आरं, गाडीला धडकून पडला. कंबरडं मोडलंय. नीट करायचाय. पैसा न्हाई. बँकेत पैसे हायतं. चार दिवस झालं निरोप दितीया बँकेत. कोणच खाईना बघ. आज जावू याच बघ. चल, मला गाडीवर सोडून ई.मी म्हटलं, आगं, तुझा गुडघा बाद झालाय. तुला नीट उभं राहता येत नाही. त्यात तू गाडीवर बसणार. घसरली, पडली तर काय करायचं. कामात काम वाढणार. तुला गाडीवर नीट बसायला पण यायचं नाही. दुसरी गोष्ट तू अशी दुपारची माझ्या कामाच्या वेळी आलीस. मला काम सोडून जायचं म्हणजे अवघड वाटतंय. असं करतो, रिक्षा सांगतो. त्यात बसून तू बँकेत जा. 

आरं रिक्षाला पैसं कुठूनं आणायचं. कोण आणायचं रिक्षा. चल, माज्यासाठी. लय नड हाय. दवाखान्यात पैसं पाठवायचं हायतं. माझा लय जीव हाय रं त्याच्यावर. त्ये लेकरू नीट झालं तर बरं. त्याच्यासाठी नगं का पैसं द्यायला. इलाजासाठी पैसं कमी पडत्यात म्हणत होती त्याची बायको. त्याचा जीव चाललाय. त्याच्यासाठी माझा जीव चाललाय. बँकेत पैसं ठिवून काय काडी लावायची हाय? चल बाबा लवकर!

विचार केला. म्हटलं गाडीवर न्यायचं तर अवघडच आहे. ही म्हातारी नीट बसणार नाही हे नक्की. रिक्षानेच पाठवायला हवं. पाठवायला तर हवंच हवं. विचार केला. गेले साठ-सत्तर रुपये तर काय हरकत आहे. - इंद्रजित घुले(लेखक हे कवी आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूर