शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

अपघात टाळायचाय... सर्कल करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:27 IST

कुरुल : सोलापूर ते कोल्हापूर या सध्या चालू असलेल्या चारपदरी महामार्गावर वाहतूक सुरळीतपणे चालावी, कामती भागातील ऊस वाहन धारकांना, ...

कुरुल : सोलापूर ते कोल्हापूर या सध्या चालू असलेल्या चारपदरी महामार्गावर वाहतूक सुरळीतपणे चालावी, कामती भागातील ऊस वाहन धारकांना, तसेच लहान-मोठ्या वाहन चालकांना वाहन चालवणे सोयीचे व्हावे म्हणून कामती बुद्रुक येथील भोसले - टेळे वस्ती या ठिकाणी सर्कल किंवा क्रॉसिंग पॉईंट बनविण्यात यावा, यासाठी कामती बुद्रुक येथे सोमवारी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी विपत यांनी, या मागणीच्या पार्श्वभूमीवर समिती नेमून त्यानंतर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.

सोलापूर - कोल्हापूर या नवीन महामार्गावर मोहोळवरून आलेली सर्व वाहतूक तसेच स्थानिक वाहने ब्रीजखालून न जाता ती वाहने कामती येथून टेळे - भोसले वस्तीजवळ सर्कल अथवा क्रॉसिंग पॉईंट करावा, ही मागणी गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याकडे लेखी व तोंडी स्वरूपात अनेकदा केली होती.

----

यावेळी कामतीचे सरपंच रामराव भोसले, पंचायत समिती सदस्या सुनीता भोसले, नागेश व्हनकळसे, महादेव गोडसे, हर्षल देशमुख, प्रवीण भोसले, गोरख खराडे, बाळकृष्ण कुलकर्णी, प्रकाश पारवे, संजय कस्तुरे, नितीन खराडे, सुनील गायकवाड, संजय वाघमोडे, रामचंद्र खराडे, समाधान भोसले, दत्तात्रय भोसले, दयानंद भोसले, शंकर खराडे, विजय पवार, विनोद भोसले, छत्रगुण गुरव, माऊली भोसले, शंकर खराडे, नजीर बागवान, अंकुश टेळे, मारुती टेळे, दादा खराडे, किरण नकाते आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवून नंतर वाहतूक सुरळीत चालू केली .

------

सोलापूर - कोल्हापूर महामार्गावर कामती बु. येथे सर्कल करण्यासाठी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महामार्ग प्राधिकरणचे अनिल विपत यांना निवेदन देताना शैला गोडसे, प्रभाकर देशमुख, रामराव भोसले, दीपक माळी, बाळासाहेब दुबे पाटील, अशोक भोसले, सुनीता भोसले आदी दिसत आहेत.

----

काय आहे आंदोलकांचे म्हणणे...

- यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी, हे सर्कल न झाल्यास वाहतुकीला अडचण निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांनी, आठ दिवसात सर्कलचे काम न झाल्यास भागातील जनतेसाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा दूध संघाचे संचालक दीपक माळी यांनी, रस्ते बनविणाऱ्या अधिकाऱ्यांनी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर स्टॉप बनविले असल्याने त्याचा गावाला कोणताही फायदा होणार नसल्याचे सांगून, हायवेशेजारील गावांच्या सरपंचांना विश्वासात घेऊन काम करायला हवे, असे मत यावेळी व्यक्त केले.

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अशोक भोसले, सिद्धाराम म्हमाणे, बाळासाहेब डुबे - पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.