शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

अपघात टाळायचाय... सर्कल करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:27 IST

कुरुल : सोलापूर ते कोल्हापूर या सध्या चालू असलेल्या चारपदरी महामार्गावर वाहतूक सुरळीतपणे चालावी, कामती भागातील ऊस वाहन धारकांना, ...

कुरुल : सोलापूर ते कोल्हापूर या सध्या चालू असलेल्या चारपदरी महामार्गावर वाहतूक सुरळीतपणे चालावी, कामती भागातील ऊस वाहन धारकांना, तसेच लहान-मोठ्या वाहन चालकांना वाहन चालवणे सोयीचे व्हावे म्हणून कामती बुद्रुक येथील भोसले - टेळे वस्ती या ठिकाणी सर्कल किंवा क्रॉसिंग पॉईंट बनविण्यात यावा, यासाठी कामती बुद्रुक येथे सोमवारी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी विपत यांनी, या मागणीच्या पार्श्वभूमीवर समिती नेमून त्यानंतर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.

सोलापूर - कोल्हापूर या नवीन महामार्गावर मोहोळवरून आलेली सर्व वाहतूक तसेच स्थानिक वाहने ब्रीजखालून न जाता ती वाहने कामती येथून टेळे - भोसले वस्तीजवळ सर्कल अथवा क्रॉसिंग पॉईंट करावा, ही मागणी गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याकडे लेखी व तोंडी स्वरूपात अनेकदा केली होती.

----

यावेळी कामतीचे सरपंच रामराव भोसले, पंचायत समिती सदस्या सुनीता भोसले, नागेश व्हनकळसे, महादेव गोडसे, हर्षल देशमुख, प्रवीण भोसले, गोरख खराडे, बाळकृष्ण कुलकर्णी, प्रकाश पारवे, संजय कस्तुरे, नितीन खराडे, सुनील गायकवाड, संजय वाघमोडे, रामचंद्र खराडे, समाधान भोसले, दत्तात्रय भोसले, दयानंद भोसले, शंकर खराडे, विजय पवार, विनोद भोसले, छत्रगुण गुरव, माऊली भोसले, शंकर खराडे, नजीर बागवान, अंकुश टेळे, मारुती टेळे, दादा खराडे, किरण नकाते आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवून नंतर वाहतूक सुरळीत चालू केली .

------

सोलापूर - कोल्हापूर महामार्गावर कामती बु. येथे सर्कल करण्यासाठी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महामार्ग प्राधिकरणचे अनिल विपत यांना निवेदन देताना शैला गोडसे, प्रभाकर देशमुख, रामराव भोसले, दीपक माळी, बाळासाहेब दुबे पाटील, अशोक भोसले, सुनीता भोसले आदी दिसत आहेत.

----

काय आहे आंदोलकांचे म्हणणे...

- यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी, हे सर्कल न झाल्यास वाहतुकीला अडचण निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांनी, आठ दिवसात सर्कलचे काम न झाल्यास भागातील जनतेसाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा दूध संघाचे संचालक दीपक माळी यांनी, रस्ते बनविणाऱ्या अधिकाऱ्यांनी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर स्टॉप बनविले असल्याने त्याचा गावाला कोणताही फायदा होणार नसल्याचे सांगून, हायवेशेजारील गावांच्या सरपंचांना विश्वासात घेऊन काम करायला हवे, असे मत यावेळी व्यक्त केले.

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अशोक भोसले, सिद्धाराम म्हमाणे, बाळासाहेब डुबे - पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.