शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

वीज कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल

By admin | Updated: June 14, 2014 01:46 IST

नातेपुतेतील प्रकार; विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू प्रकरण

नातेपुते : कुरभावी (ता. माळशिरस) येथील शेतकरी संजय गोविंद रूपनवर (वय ४0) शेतातील तार बदलण्यासाठी गेले असता, तुटलेल्या तारेचा शॉक बसून जागीच मृत्यू झाला. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी संतप्त ग्रामस्थांनी वीज कंपनी कार्यालयावर हल्लाबोल करीत तोडफोड केली. कुरभावीत चार महिन्यांपासून विजेची वेळ सकाळी साडेआठ ते दुपारी एकपर्यंत व दुपारी ते ३ ते साडेतीनपर्यंत होती. आठ दिवस संजय रूपनवर यांच्या शेतामध्ये लाईटची तार तुटून पडली होती. याबाबत संजय रूपनवर यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत वारंवार तक्रारी केल्या; मात्र वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना या तुटलेल्या तारेतील वीज प्रवाहाचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान ते बराच वेळ घरीच न आल्याने शोधाशोध केली असता, शोधणाऱ्यांना मृतावस्थेत ते आढळले. याबाबत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगूनही कोणीच लक्ष दिले नाही तर अधिकारी कोल्हे यांना सांगताच मी ढाब्यावर जेवण करीत आहे, असे सांगून थोड्या वेळाने येत असल्याचे सांगितले. दरम्यान, संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मृतदेह घेऊन वीज कंपनीचे कार्यालय गाठले आणि कर्मचाऱ्यांना विनंती करूनही काहीच उपयोग होत नसल्याने हल्लाबोल करीत कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. तत्काळ घटनास्थळी अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील यांनी धाव घेऊन ग्रामस्थांना कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.-----------------------------कारवाईचा प्रस्तावहा सगळा प्रकार घडल्यानंतर कार्यकारी अभियंता चटलवार यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन सहायक अभियंता कोल्हे व दुय्यम अभियंता बडवे व वायरमन जाधव यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठवू असे सांगितले. ----------------------------------वीज कंपनीकडून मदतमयत शेतकरी संजय रूपनवर यांच्या कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून २0 हजार रूपये तर नंतर दोन लाख मदत जाहीर करण्यात आली. रूपनवरच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.