शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
4
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
5
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
6
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
7
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
8
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
9
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
10
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
11
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
12
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
13
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
14
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
15
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
16
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
17
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
18
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
19
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
20
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी

पंढरपुरातील आषाढी वारीचा निर्णय ३० मे नंतर होणार; उपमुख्यमंत्र्यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 18:05 IST

४६ दिवसांचा कालावधी; तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय होणार, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली चर्चा

पंढरपूर : आषाढी एकादशी यात्रेसाठी ४६ दिवसांचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये 'कोरोना'चा प्रादुर्भाव कशा पद्धतीचा असेल, याचा अंदाज लावता येणार नाही. यामुळे आषाढी यात्रेचा निर्णय ३० मे रोजी घेण्याबाबतची चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीमध्ये झाली आहे.

आषाढी यात्रेच्या नियोजनासंदर्भात मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे, सातारा व सोलापूर आदी जिल्ह्यातील प्रशासन व महाराज मंडळ यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.

या बैठकीमध्ये आषाढी यात्रेसाठी मानाच्या प्रमुख पालख्या पंढरपुरात आल्या पाहिजेत,  प्रातिनिधिक स्वरूपात आषाढी यात्रा व्हावी, यात्रेसाठी मानाच्या प्रमुख पालख्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहावे, परंतु  शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे यात्रा व्हावी असे मत मंदिर समितीचे सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज यांनी मांडले.

त्याचबरोबर आषाढी यात्रा संदर्भात निर्णय घेताना पंढरपुरातील नागरिकांचा विचार करावा अशी सूचना नगराध्यक्षा साधना भोसले यांनी केली.

या बैठकीमध्ये काही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. यासाठी मे महिन्याअखेर पुन्हा अशाच पद्धतीची बैठक घेतली जाणार आहे. तत्कालीन परिस्थिती पाहून आषाढी यात्रेचे नियोजन करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर