शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुंबईत कौतुक.. गावात गोंधळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:16 IST

सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील ७०० लोकसंख्या असणाऱ्या घाटणे गावच्या ग्रामपंचायतीत सात सदस्य आहेत. सद्य:स्थितीला गावात मोजकीच कुटुंबे राहत ...

सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील ७०० लोकसंख्या असणाऱ्या घाटणे गावच्या ग्रामपंचायतीत सात सदस्य आहेत. सद्य:स्थितीला गावात मोजकीच कुटुंबे राहत असून, इतर सर्व कुटुंबे कोरोना महामारीच्या भीतीने वाड्या-वस्त्यांवर राहत आहेत. गावात या दुसऱ्या लाटेत कोरोना महामारीचे सहा रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी एक रुग्ण मयत झाला असून, उर्वरित पाच रुग्ण बरे झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर गावचे युवा सरपंच ऋतुराज देशमुख यांनी गाव कोरोनामुक्त केल्याचा रिपोर्ट वरपर्यंत पोहोचविला गेला. गावात विविध वेगवेगळे उपक्रम राबवीत, गावातील सर्वांचे लसीकरण करण्यात आले आहे. सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. गावात घरोघरी सॅनिटायझरचा वापर केला असून, संपूर्ण गाव फवारणी करण्यात आली आहे. अशाप्रकारे काळजी घेऊन गाव कोरोनामुक्त केल्याचेही ऋतुराज देशमुख यांनी सांगितले.

३० मे रोजी या युवा सरपंचांच्या कामाची दखल घेत खुद्द मुख्यमंत्र्यांनी ऋतुराज देशमुख यांचे कौतुक केले होते.

गावातील काही नागरिकांनी सरपंचांनी संपूर्ण गावात कुठल्याही प्रकारची अद्याप फवारणी केलेली नाही, आणलेले सॅनिटायझर ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच आहे. मास्कचे वाटप केले नाही. याशिवाय लस नोंदणीसाठी ग्रामपंचायतीच्या कार्यालयांमध्ये माझ्याकडे येऊन नोंद केली तरच लस दिली जाईल, अशी भूमिका घेऊन गावात काम केल्याचा आरोप एका गटाने केला. यावेळी दस्तुरखुद्द युवा सरपंच समोर उपस्थित होते. त्यांनी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी प्रचंड गोंधळ निर्माण झाला.

केवळ खोटी माहिती देऊन स्टंटबाजी केल्याच्या आरोपामुळे घाटणे गाव चर्चेत आले आहे

----

मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलेय म्हटल्यानंतर विरोध हा होणारच. विरोधक आहेत, सर्वच सोबत असतील असे नाही. गावात येऊन चौकशी करा.

- रुतुराज देशमुख

सरपंच, घाटणे

---

सरपंचांनी गावात फवारणी केलेली नाही. सॅनिटायझर व मास्कचे वाटप त्यांना मानणाऱ्या लोकांनाच केले आहे. याशिवाय लसीकरणाच्या नोंदणीसाठी माझ्याकडे येऊन ग्रामपंचायतीमध्ये जे नोंद करतील, त्यांनाच लस मिळणार आहे, अशी भूमिका सरपंचांनी मांडली होती.

- खेलू माने, ग्रामपंचायत सदस्य, घाटणे

---

फोटो : ३१ घाटणे

युवा सरपंचांसमोर सर्वसामान्यांनी कोरोना निर्मूलनाच्या कार्याबाबत प्रश्न केले. यावेळी काही वेळ गोंधळ उडाला.