शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

किर्ती भराडियाचा आणखी एक विक्रम; अरबी समुद्रात पार केले ३९ किलोमीटरचे अंतर

By शीतलकुमार कांबळे | Updated: February 22, 2023 17:05 IST

शीतलकुमार कांबळे, सोलापूर : मुंबई येथील अरबी समुद्रात रात्रीच्या काळोख्या अंधारात न थांबता धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया ...

शीतलकुमार कांबळे, सोलापूर: मुंबई येथील अरबी समुद्रात रात्रीच्या काळोख्या अंधारात न थांबता धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे ३९ किलोमीटरचे अंतर कीर्ती भराडियाने (वय १७) पार केले. २१ फेब्रुवारी रोजी न थांबता ७ तास ५४ मिनिटात पोहून अंतर कापत तीने आणखी एक विक्रम केला. मंगळवार, २१ फेब्रुवारी रोजी धरमतर जेट्टी येथून पहाटे २ वाजून २० मिनिटाने पोहण्यास सुरुवात केली होती. सकाळी १० वाजून १४ मिनिटाला गेट वे ऑफ इंडिया येथे पोहोचली. किर्तीने सुरुवातीचे २८ किलोमीटर अंतर ४ तासात पूर्ण केले होते. परंतु, पाण्याच्या उलट प्रवाहामुळे उर्वरित ११ किलोमीटर पार करण्यास ३ तास ५४ मिनिटांचा वेळ लागला.

किर्तीच्या संरक्षणासाठी दोन बोटी तिच्यासोबत होत्या. त्यामध्ये द्वारकादास भराडिया, वडील नंदकिशोर भराडिया, आई चित्रा भराडिया, आदित्य, अभिजित, अविनाश, श्रेया, विवेक, प्रशिक्षक शेटे, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू रुपाली रेपाळे, स्वीमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सुबोध सुळे, नीरज काटकूर हे पूर्णवेळ उपस्थित होते. श्रीलंका ते भारत (रामेश्वरम) पर्यंत न थांबता पोहणे हे किर्तीचे पुढील ध्येय आहे.

अंधारातही धाडसाने कापले अंतर

रात्रीच्या अंधारात समुद्रात पोहणे ही बाब साधारण नसून याकरिता प्रचंड धाडसाची आवश्यकता असते. कीर्तीने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने हे धाडस दाखविले आणि यशस्वीरीत्या पूर्ण केले. या काळात कीर्तीने रात्रीचा काळोख अंधार,पाण्याचा उलट प्रवाह,खारे अस्वच्छ पाणी,ऑईल मिश्रित पाणी, मासे अशा अनेक अडचणींचा सामना करत अंतर न थांबता पोहून पूर्ण केले.

टॅग्स :Solapurसोलापूर