शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

आण्णा हजारे यांचा पंतप्रधान मोदी विरुद्ध वचनभ्रष्टतेचा आरोप,  येत्या २३ मार्चपासून रामलीला मैदानावर जनांदोलन करणार, आण्णा हजारे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 11:27 IST

निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे ठोस आश्वासन दिले होते त्याबरोबरच भ्रष्टाचार निर्मूलन करू व लोकपालची नियुक्ती करू असे आश्वासन देऊनही मोदींनी नागरिकांना व शेतकºयांना दिलेली आश्वासने पाळली नसल्यामुळे आमचा भ्रमनिरास झाला.

ठळक मुद्देमोदींनी नागरिकांना व शेतकºयांना दिलेली आश्वासने पाळली नसल्यामुळे आमचा भ्रमनिरास झाला : अण्णा हजारे पंतप्रधान मोदींना याविषयी मी ३२ वेळा पत्रे लिहिली पण आजपावेतो एकाही पत्राला उत्तर देण्याचे सौजन्य दाखवले नाही : अण्णा हजारे तेव्हा आमच्यापुढे जनांदोलनाशिवाय पर्याय नसल्यामुळे केंद्र सरकारला धडा शिकविण्यासाठी येत्या २३ मार्चला दिल्लीच्या रामलिला मैदानावर आंदोलन छेडण्यात येईल : अण्णा हजारे

आॅनलाइन लोकमत सोलापूरआळंद दि २९ : लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना भ्रष्टाचार निर्मूलनाचे व शेतकºयांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले होते, पण गेल्या साडेतीन वर्षात मोदींनी काहीच केले नसल्यामुळे हे वचन भ्रष्ट सरकार असल्याचा आरोप जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कलबुरगी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना केला. शेतकºयांच्या समस्येकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हैदराबाद कर्नाटक रयत संघटनेच्यावतीने कलबुरगी येथील शरणबसवेश्वर संस्थान मैदानावर अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नवी दिल्लीच्या कृषी संशोधन संस्थेचे निवृत्त संचालक डॉ.एस.ए.पाटील कलबुरगीच्या श्रीगुरू विद्यापीठाचे अध्यक्ष बसवराज दिग्गावी, जेष्ठ पत्रकार श्रीनिवास शिरनूरकर यांनीही आपल्या भाषणात शेतकºयांच्या प्रश्नावर व प्रशासनातील भ्रष्टाचारावर आपली परखड मते मांडली. हैदराबाद कर्नाटक रयत संघटनेचे अध्यक्ष दयानंद पाटील हे अध्यक्षपदी होते. दयानंद पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविकात संघटनेचे धर्मेंद्र उद्देष सादर केले.  यावेळी बोलताना अण्णा पुढे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे ठोस आश्वासन दिले होते त्याबरोबरच भ्रष्टाचार निर्मूलन करू व लोकपालची नियुक्ती करू असे आश्वासन देऊनही मोदींनी नागरिकांना व शेतकºयांना दिलेली आश्वासने पाळली नसल्यामुळे आमचा भ्रमनिरास झाला असून पंतप्रधान मोदींना याविषयी मी ३२ वेळा पत्रे लिहिली पण आजपावेतो एकाही पत्राला उत्तर देण्याचे सौजन्य दाखवले नाही तेव्हा आमच्यापुढे जनांदोलनाशिवाय पर्याय नसल्यामुळे केंद्र सरकारला धडा शिकविण्यासाठी येत्या २३ मार्चला दिल्लीच्या रामलिला मैदानावर आंदोलन छेडण्यात येईल. शेतकरी आत्महत्येविषयी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की,बँका व सावकारी जबर कर्जाच्या दबावामुळे गेल्या १२ वर्षात एकूण २२ लाख शेतकºयांनी आत्महत्त्या केल्या आहेत पण माझी शेतकºयांना विनंती आहे की,यापुढे त्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबू नये. राज्या राज्यात कृषीमुल्य आयोग कार्यरत आहेत पण या आयोगाच्या शिफारशीला केंद्र सरकार पन्नास टक्के कात्री लावते हे अन्याकारक आहे असे स्पष्ट करत अण्णा पूढे म्हणाले की, उद्योगपतींना धार्जिणे असलेल्या या केंद्र सरकारला शेतकºयांविषयी अजिबात काळजी नाही. कर्नाटकातील विद्द्यमान महादायी योजनेविषयी चाललेल्या वादविवादावर बोलताना अण्णा म्हणाले की, यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असून प्रश्न सोडविण्याची प्रामाणिक इच्छा असल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. अनेक राज्यांना पाणी वाटपाच्या समस्येने ग्रासले असून नेते असे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यामध्ये राजकीय लाभाचा विचार करून प्रश्र्न लोंबकळत ठेवतात हे लोकशाहीमध्ये अत्यंत लाजीरवाणे आहे. या शेतकरी मेळाव्यास मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते. विजयपूर ज्ञानयोगाश्रमाचे श्री सिद्धेश्वर स्वामी यांचे यावेळी सानिध्य लाभले होते. 

टॅग्स :Solapurसोलापूरanna hazareअण्णा हजारे