शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आण्णा हजारे यांचा पंतप्रधान मोदी विरुद्ध वचनभ्रष्टतेचा आरोप,  येत्या २३ मार्चपासून रामलीला मैदानावर जनांदोलन करणार, आण्णा हजारे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 11:27 IST

निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे ठोस आश्वासन दिले होते त्याबरोबरच भ्रष्टाचार निर्मूलन करू व लोकपालची नियुक्ती करू असे आश्वासन देऊनही मोदींनी नागरिकांना व शेतकºयांना दिलेली आश्वासने पाळली नसल्यामुळे आमचा भ्रमनिरास झाला.

ठळक मुद्देमोदींनी नागरिकांना व शेतकºयांना दिलेली आश्वासने पाळली नसल्यामुळे आमचा भ्रमनिरास झाला : अण्णा हजारे पंतप्रधान मोदींना याविषयी मी ३२ वेळा पत्रे लिहिली पण आजपावेतो एकाही पत्राला उत्तर देण्याचे सौजन्य दाखवले नाही : अण्णा हजारे तेव्हा आमच्यापुढे जनांदोलनाशिवाय पर्याय नसल्यामुळे केंद्र सरकारला धडा शिकविण्यासाठी येत्या २३ मार्चला दिल्लीच्या रामलिला मैदानावर आंदोलन छेडण्यात येईल : अण्णा हजारे

आॅनलाइन लोकमत सोलापूरआळंद दि २९ : लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना भ्रष्टाचार निर्मूलनाचे व शेतकºयांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले होते, पण गेल्या साडेतीन वर्षात मोदींनी काहीच केले नसल्यामुळे हे वचन भ्रष्ट सरकार असल्याचा आरोप जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कलबुरगी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना केला. शेतकºयांच्या समस्येकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हैदराबाद कर्नाटक रयत संघटनेच्यावतीने कलबुरगी येथील शरणबसवेश्वर संस्थान मैदानावर अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नवी दिल्लीच्या कृषी संशोधन संस्थेचे निवृत्त संचालक डॉ.एस.ए.पाटील कलबुरगीच्या श्रीगुरू विद्यापीठाचे अध्यक्ष बसवराज दिग्गावी, जेष्ठ पत्रकार श्रीनिवास शिरनूरकर यांनीही आपल्या भाषणात शेतकºयांच्या प्रश्नावर व प्रशासनातील भ्रष्टाचारावर आपली परखड मते मांडली. हैदराबाद कर्नाटक रयत संघटनेचे अध्यक्ष दयानंद पाटील हे अध्यक्षपदी होते. दयानंद पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविकात संघटनेचे धर्मेंद्र उद्देष सादर केले.  यावेळी बोलताना अण्णा पुढे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे ठोस आश्वासन दिले होते त्याबरोबरच भ्रष्टाचार निर्मूलन करू व लोकपालची नियुक्ती करू असे आश्वासन देऊनही मोदींनी नागरिकांना व शेतकºयांना दिलेली आश्वासने पाळली नसल्यामुळे आमचा भ्रमनिरास झाला असून पंतप्रधान मोदींना याविषयी मी ३२ वेळा पत्रे लिहिली पण आजपावेतो एकाही पत्राला उत्तर देण्याचे सौजन्य दाखवले नाही तेव्हा आमच्यापुढे जनांदोलनाशिवाय पर्याय नसल्यामुळे केंद्र सरकारला धडा शिकविण्यासाठी येत्या २३ मार्चला दिल्लीच्या रामलिला मैदानावर आंदोलन छेडण्यात येईल. शेतकरी आत्महत्येविषयी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की,बँका व सावकारी जबर कर्जाच्या दबावामुळे गेल्या १२ वर्षात एकूण २२ लाख शेतकºयांनी आत्महत्त्या केल्या आहेत पण माझी शेतकºयांना विनंती आहे की,यापुढे त्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबू नये. राज्या राज्यात कृषीमुल्य आयोग कार्यरत आहेत पण या आयोगाच्या शिफारशीला केंद्र सरकार पन्नास टक्के कात्री लावते हे अन्याकारक आहे असे स्पष्ट करत अण्णा पूढे म्हणाले की, उद्योगपतींना धार्जिणे असलेल्या या केंद्र सरकारला शेतकºयांविषयी अजिबात काळजी नाही. कर्नाटकातील विद्द्यमान महादायी योजनेविषयी चाललेल्या वादविवादावर बोलताना अण्णा म्हणाले की, यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असून प्रश्न सोडविण्याची प्रामाणिक इच्छा असल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. अनेक राज्यांना पाणी वाटपाच्या समस्येने ग्रासले असून नेते असे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यामध्ये राजकीय लाभाचा विचार करून प्रश्र्न लोंबकळत ठेवतात हे लोकशाहीमध्ये अत्यंत लाजीरवाणे आहे. या शेतकरी मेळाव्यास मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते. विजयपूर ज्ञानयोगाश्रमाचे श्री सिद्धेश्वर स्वामी यांचे यावेळी सानिध्य लाभले होते. 

टॅग्स :Solapurसोलापूरanna hazareअण्णा हजारे