शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

सोलापूरातील प्राणीप्रेम : २४ तास झाडावर राहूनही मांजरी परतली पुन्हा स्वगृही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 15:56 IST

एकवेळ माणूस विसरेल; जनावराला जीव लावला तर जनावर कधीच विसरत नाही, असे प्राण्यांबद्दल सहृदयी कौतुक आपल्याला कुठेही ऐकायला मिळते. याची प्रचिती एका मांजरीने दिली.

ठळक मुद्देमांजरीने जीव वाचविण्यासाठी २४ तास नारळाच्या झाडावर काढलेकारच्या चेसीला लटकत पाच कि.मी.चा प्रवासजनावराला जीव लावला तर जनावर कधीच विसरत नाही

बाळासाहेब बोचरेसोलापूर दि ३१ : एकवेळ माणूस विसरेल; जनावराला जीव लावला तर जनावर कधीच विसरत नाही, असे प्राण्यांबद्दल सहृदयी कौतुक आपल्याला कुठेही ऐकायला मिळते. याची प्रचिती सोमवारी एका मांजरीने दिली.  घरापासून सहा किलोमीटर सोडून दिलेल्या मांजरीने जीव वाचविण्यासाठी २४ तास नारळाच्या झाडावर काढले आणि ज्यांनी सोडून दिले त्याच्या घरी सुखरुप परतली. योगायोग म्हणजे रविवारी जागतिक मांजरी दिन होता. सोलापुरातील विजय अय्यर यांची कन्या प्रिया यांना प्राण्यांचा चांगलाच लळा. युनायटेड किंगडममधील  एडिनबर्ग विद्यापीठाची पीएच़डी़ मिळविलेल्या  प्रिया यांच्या  दारात अडीच वर्षांपूर्वी एक मांजरीचे पिल्लू आले.  त्यांनी त्याला जवळ केले; पण कुत्र्यांनी जखमी केल्याने ते पिल्लू मेले, असे त्यांनी गृहीत धरले. तथापि तब्बल १५ दिवसांनी ते पिल्लू परत प्रिया यांच्याकडे आले.  त्याला प्रियांनी जीव लावला, तिला डमरू असे नाव दिले.  गेल्या अडीच वर्षांत एकाची पाच मिळून घरात सहा मांजरे झाली. प्रिया या नोकरीसाठी पुण्याला जाणार असल्याने व प्रियाचे वडील आजारी असल्याने पुढे स्वच्छतेचा आणि देखभालीचा प्रश्न आल्याने प्रियांनी सर्व मांजरांना सोरेगाव येथील शेतात सोडण्याचा निर्णय घेतला.  त्या दिवशी जागतिक मांजरी दिन आहे हे प्रियांच्या ध्यानीमनी नव्हते. शेतात सर्वजण रमतील असा त्यांनी विचार केला. रविवारी त्यांनी साडेतीनशे रूपये भाडे देऊन एक पिंजरा आणला.  पिंजºयात चार मांजरांना तर दुसºया दोन मांजरांना हातात धरुन चारचाकी गाडीतून नेले. तथापि डमरू अचानक हातातून पळाली. तिच्यामागे तीन-चार कुत्री लागल्याने ती घाबरुन नारळाच्या झाडावर जाऊन बसली. रात्री ११ वाजले तरी ती खाली न येता गुपचूप बसून राहिली. ती मेली की जिवंत याचीही कल्पना येईना. दुसºया दिवशी दुपारी काही प्राणिमित्र आणि अग्निशामक दलाच्या मदतीने तिला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला असता तिने थेट झाडावरुन प्रियाच्या अंगावर झेप घेतली. दरम्यान, कुत्री आल्याने ती उसात पळून गेली. ती सापडेना तेव्हा  प्रियांना आपले काही तरी चुकत असल्याचा भास झाला. त्यांनी पाच पिल्लांना गाडीत घातले आणि परतीला निघाल्या. मात्र त्यांचे लक्ष मागे होते. -------------------------कारच्या चेसीला लटकत पाच कि.मी.चा प्रवासपाच मांजरासह परतत असताना अशोकनगर येथे प्रिया यांना मांजरी पडल्याचा आवाज आला. त्यांनी मागे पाहिले तेव्हा त्यांची डमरू एका मालवाहू वाहनाच्या आश्रयाला पळताना दिसली. आपली डमरू आपल्या गाडीला लटकून कधी सोबत आली याची कुणालाच कल्पना नव्हती.  प्रिया त्या वाहनाखाली शिरल्या आणि  खाली जाऊन डमरूला बाहेर काढले आणि छातीला कवटाळले तेव्हा कुठे भेदरलेली डमरू शांत झाली. डमरुला पाहून प्रियाचे डोळे भरुन आले . त्यांनी तिला आपल्या  गाडीत बसविले आणि घरी आणले. सुमारे ३० तासांनंतर ती घरी आल्याने तेव्हा कुठे सहाही मांजरांचा जीव भांड्यात पडला आणि सर्व जण पुन्हा खेळायला लागले.