शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अन् इगोनं केला घोटाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 12:37 IST

खºया विजयी भावना प्रेम, माया, आपुलकी याच आहेत. त्यांनीच जर राज्य केलं तरच सगळं सुरळीत, व्यवस्थित राहील. नाहीतर विनाश अटळ आहे !!!

बरं का मंडळी, एकदा मेंदूला आला खूप कंटाळा ! काहीतरी वेगळं करूया; नेहमीच्या रुटीनने फार बोअर झालंय. काय करावं बरं ? मग त्याने ठरवलं, आपण एक शर्यत लावू या भावनांची !!! सगळ्या भावनांना त्याने एकत्र बोलावलं. माया, प्रेम, वात्सल्य, अनुकंपा, राग, क्रोध, मत्सर, संताप, आत्मसन्मान.. किती किती म्हणून सांगाव्या ? सगळ्या भावना एकत्र जमल्या. का बरं बोलावलं आम्हाला ? मेंदूने उत्तर दिलं मी तुमची एक शर्यत लावणार आहे, स्पर्धा घेणार आहे.   सगळ्यात जास्त शक्तीशाली कोण बनवते माणसाला ? हे पाहायचं आहे मला ! पाहूया कोण जिंकतं ते सगळ्या भावना गोंधळल्या, हा कसला प्रश्न ? ही कसली स्पर्धा ? पण प्रयत्न तर करायलाच हवा, सगळ्याजणी तयारीला लागल्या. स्पर्धा सुरू झाली .. जिंकणार कोण ? तुमचा काय अंदाज, मंडळी ??

मेंदूचा अंदाज बरोबर होता. जिंकलं तर प्रेम, माया, क्षमा, कृतज्ञताच जिंकणार !!! पण..पण, घडलं वेगळंच! प्रेम सगळ्यांना समजावत, बरोबर घेऊन निघालं स्पर्धा जिंकायला. इकडे आत्मसन्मानाच्या मनात वेगळंच चाललं होतं. त्याने प्रेमाला दिला डच्चू ; आणि स्वत:ला जरा फुगवलं, स्वत:चं रूप बदलवलं  गर्वामध्ये!!! आणि एकटाच निघाला स्पर्धा जिंकायला. कोणत्याही परिस्थितीत त्याला जिंकायचंच होतं. त्याने मग राग, द्वेष, मत्सर यांना मदतीला घेतलं, आणि माणसाला एवढा आभास घडवला शक्तीमान, सर्वश्रेष्ठ असल्याचा, की बस्स ! माणूस एकदम खूश !!! इगो सगळ्यात सर्वश्रेष्ठ, इगोने शर्यत जिंकली. निकाल जाहीर झाला. मग काय ? इगोची ताकद खूपच वाढली. तो बाकी सगळ्या भावनांवर कुरघोडी करू लागला. त्याने आपले   साथीदार, मंत्रिमंडळ निवडले. राग, असूया, मत्सर, भीती, क्रौर्य असे सगळेजण सामील झाले त्याच्या मंत्रिमंडळात !

आणि मग झालं काय ? माणूस स्वत:ला परिपूर्ण, सर्वश्रेष्ठ समजू लागला. मीच काय तो जगात सर्वात शहाणा ! मी म्हणेल ते सगळ्यांनी ऐकलंच पाहिजे, मानलंच पाहिजे असा हट्ट, अट्टाहास सुरू झाला. सल्लागार मंडळ तर होतंच ! जे ऐकत नाहीत, त्यांच्यावर राग, क्रोध, मत्सर सैन्याचा वापर सुरू झाला. भीतीने बाकीच्यांवर दमदाटी करायला सुरू केलं. बाकीचे लोक सुरुवातीला घाबरले. इगोचं  ऐकायला लागले. काहीजण लाच खाऊन गप्प बसले. प्रेम, माया, क्षमा, समभाव, आपुलकी वगैरेंना इगोनं तडीपार केले. तुमची काहीच गरज नाहीये. चलेजाव ! बिचाºया सगळ्याजणी आधी कोपºयात दडून बसल्या. आणि नंतर काढता पाय घेतला. 

इकडे माणसाच्या शरीरात ही या ईगोने हाहाकार माजवला. सगळीकडे कायमच युद्ध परिस्थिती निर्माण करून टाकली. सगळी नको असलेली संप्रेरकं २४ तास ड्यूटीवर राहू लागली. स्नायू सारखेच सतर्क राहू लागले; साखरेने रक्तातच बस्तान बसवले. हृदय धावून धावून थकायला लागले. बाप रे ! सगळी यंत्रणा कोलमडायला लागली. माणूस थकायला लागला. नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, मुलं तर केव्हाच सोडून गेली होती. मदतीची गरज आता भासू लागली. पण बोलावू कुणाला? कसं ? कारण प्रेम, माया, आपुलकी केव्हाचेच निघून गेले होते. गोळ्या, औषधं आली मदतीला ; पण ती ही मदत पुरेनाशी झाली. काय करू ? कसं करू ? 

मेंदूला पश्चाताप झाला. का म्हणून असली स्पर्धा घेतली आपण ? का बरं या इगोला विजेता घोषित केलं आपण ? ते काही नाही आता मलाच मार्ग काढावा लागणार!  काहीतरी करावंच लागेल! त्याने पुन्हा सगळ्या भावनांना एकत्र बोलावलं. मार्ग सुचवायला सांगितलं. सगळ्या भावना पुन्हा एकत्र आल्या. काय करावं ? शेवटी प्रेमाने, आपुलकीने पुढाकार घेतला. क्षमा, कृतज्ञता मदतीला सरसावल्या. इगोला समजावलं. त्यालाही चूक समजली होतीच स्वत:ची ! त्यानेही स्वत:ला पूर्वपदावर आणलं. बराच वेळ गेला या सगळ्यामध्ये. भरपूर पडझड झाली शरीराची, नात्यांची पण, सगळं संपण्यापूर्वी सावरलं गेलं ; हे चांगलं झालं आणि मेंदूने पुन्हा निकाल जाहीर केला खºया विजयी भावना प्रेम, माया, आपुलकी याच आहेत. त्यांनीच जर राज्य केलं तरच सगळं सुरळीत, व्यवस्थित राहील. नाहीतर विनाश अटळ आहे !!!- प्रा. तात्यासाहेब काटकर,(लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत) 

टॅग्स :Solapurसोलापूर