शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

अन् इगोनं केला घोटाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 12:37 IST

खºया विजयी भावना प्रेम, माया, आपुलकी याच आहेत. त्यांनीच जर राज्य केलं तरच सगळं सुरळीत, व्यवस्थित राहील. नाहीतर विनाश अटळ आहे !!!

बरं का मंडळी, एकदा मेंदूला आला खूप कंटाळा ! काहीतरी वेगळं करूया; नेहमीच्या रुटीनने फार बोअर झालंय. काय करावं बरं ? मग त्याने ठरवलं, आपण एक शर्यत लावू या भावनांची !!! सगळ्या भावनांना त्याने एकत्र बोलावलं. माया, प्रेम, वात्सल्य, अनुकंपा, राग, क्रोध, मत्सर, संताप, आत्मसन्मान.. किती किती म्हणून सांगाव्या ? सगळ्या भावना एकत्र जमल्या. का बरं बोलावलं आम्हाला ? मेंदूने उत्तर दिलं मी तुमची एक शर्यत लावणार आहे, स्पर्धा घेणार आहे.   सगळ्यात जास्त शक्तीशाली कोण बनवते माणसाला ? हे पाहायचं आहे मला ! पाहूया कोण जिंकतं ते सगळ्या भावना गोंधळल्या, हा कसला प्रश्न ? ही कसली स्पर्धा ? पण प्रयत्न तर करायलाच हवा, सगळ्याजणी तयारीला लागल्या. स्पर्धा सुरू झाली .. जिंकणार कोण ? तुमचा काय अंदाज, मंडळी ??

मेंदूचा अंदाज बरोबर होता. जिंकलं तर प्रेम, माया, क्षमा, कृतज्ञताच जिंकणार !!! पण..पण, घडलं वेगळंच! प्रेम सगळ्यांना समजावत, बरोबर घेऊन निघालं स्पर्धा जिंकायला. इकडे आत्मसन्मानाच्या मनात वेगळंच चाललं होतं. त्याने प्रेमाला दिला डच्चू ; आणि स्वत:ला जरा फुगवलं, स्वत:चं रूप बदलवलं  गर्वामध्ये!!! आणि एकटाच निघाला स्पर्धा जिंकायला. कोणत्याही परिस्थितीत त्याला जिंकायचंच होतं. त्याने मग राग, द्वेष, मत्सर यांना मदतीला घेतलं, आणि माणसाला एवढा आभास घडवला शक्तीमान, सर्वश्रेष्ठ असल्याचा, की बस्स ! माणूस एकदम खूश !!! इगो सगळ्यात सर्वश्रेष्ठ, इगोने शर्यत जिंकली. निकाल जाहीर झाला. मग काय ? इगोची ताकद खूपच वाढली. तो बाकी सगळ्या भावनांवर कुरघोडी करू लागला. त्याने आपले   साथीदार, मंत्रिमंडळ निवडले. राग, असूया, मत्सर, भीती, क्रौर्य असे सगळेजण सामील झाले त्याच्या मंत्रिमंडळात !

आणि मग झालं काय ? माणूस स्वत:ला परिपूर्ण, सर्वश्रेष्ठ समजू लागला. मीच काय तो जगात सर्वात शहाणा ! मी म्हणेल ते सगळ्यांनी ऐकलंच पाहिजे, मानलंच पाहिजे असा हट्ट, अट्टाहास सुरू झाला. सल्लागार मंडळ तर होतंच ! जे ऐकत नाहीत, त्यांच्यावर राग, क्रोध, मत्सर सैन्याचा वापर सुरू झाला. भीतीने बाकीच्यांवर दमदाटी करायला सुरू केलं. बाकीचे लोक सुरुवातीला घाबरले. इगोचं  ऐकायला लागले. काहीजण लाच खाऊन गप्प बसले. प्रेम, माया, क्षमा, समभाव, आपुलकी वगैरेंना इगोनं तडीपार केले. तुमची काहीच गरज नाहीये. चलेजाव ! बिचाºया सगळ्याजणी आधी कोपºयात दडून बसल्या. आणि नंतर काढता पाय घेतला. 

इकडे माणसाच्या शरीरात ही या ईगोने हाहाकार माजवला. सगळीकडे कायमच युद्ध परिस्थिती निर्माण करून टाकली. सगळी नको असलेली संप्रेरकं २४ तास ड्यूटीवर राहू लागली. स्नायू सारखेच सतर्क राहू लागले; साखरेने रक्तातच बस्तान बसवले. हृदय धावून धावून थकायला लागले. बाप रे ! सगळी यंत्रणा कोलमडायला लागली. माणूस थकायला लागला. नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, मुलं तर केव्हाच सोडून गेली होती. मदतीची गरज आता भासू लागली. पण बोलावू कुणाला? कसं ? कारण प्रेम, माया, आपुलकी केव्हाचेच निघून गेले होते. गोळ्या, औषधं आली मदतीला ; पण ती ही मदत पुरेनाशी झाली. काय करू ? कसं करू ? 

मेंदूला पश्चाताप झाला. का म्हणून असली स्पर्धा घेतली आपण ? का बरं या इगोला विजेता घोषित केलं आपण ? ते काही नाही आता मलाच मार्ग काढावा लागणार!  काहीतरी करावंच लागेल! त्याने पुन्हा सगळ्या भावनांना एकत्र बोलावलं. मार्ग सुचवायला सांगितलं. सगळ्या भावना पुन्हा एकत्र आल्या. काय करावं ? शेवटी प्रेमाने, आपुलकीने पुढाकार घेतला. क्षमा, कृतज्ञता मदतीला सरसावल्या. इगोला समजावलं. त्यालाही चूक समजली होतीच स्वत:ची ! त्यानेही स्वत:ला पूर्वपदावर आणलं. बराच वेळ गेला या सगळ्यामध्ये. भरपूर पडझड झाली शरीराची, नात्यांची पण, सगळं संपण्यापूर्वी सावरलं गेलं ; हे चांगलं झालं आणि मेंदूने पुन्हा निकाल जाहीर केला खºया विजयी भावना प्रेम, माया, आपुलकी याच आहेत. त्यांनीच जर राज्य केलं तरच सगळं सुरळीत, व्यवस्थित राहील. नाहीतर विनाश अटळ आहे !!!- प्रा. तात्यासाहेब काटकर,(लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत) 

टॅग्स :Solapurसोलापूर