शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

'अमृतातेही पैजासी जिंके' आणि 'श्रवणीची होती जिभा' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 13:07 IST

आणि तोचि हा मी आता। श्रीव्यासांची पदे पाहता पाहता।

ज्ञानेश्वर महाराज 'ज्ञानेश्वरी'मध्ये दोन गोष्टींसाठी खूप हळवे होतात. एक म्हणजे गीतेचे मोठेपण, तर दुसरी गोष्ट म्हणजे सदगुरू आणि महर्षी व्यास यांच्याविषयीचा कृतज्ञताभाव. ज्ञानदेवांनी अठराव्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या प्रयोजनामागील निवृत्तीनाथांच्या कृपाशीवार्दाचे वर्णन केले आहे. सामान्य माणसांच्या प्रतिभेला ब्रह्मरसाचा आस्वाद घडावा आणि तोही आनंदसाम्राज्याचा अधिकारी व्हावा यासाठी तू गीतार्थ सांग, अशी आज्ञा निवृत्तीनाथांनी केली.मग आतार्चेनि ओरसे।गीतार्थग्रंथनमिषे।वर्षला शांतरसे।तो हा ग्रंथु।। सामान्यातल्या सामान्यांना आणि स्त्री-शूद्र, तसेच पीडितांनाही गीतेचा अर्थ सांगण्याच्या निमित्ताने निवृत्तीनाथांनी जी शांतरसाची वृष्टी केली, तोच हा ग्रंथ होय. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ शांतरसप्रधान आहे. इथे ज्ञानेश्वरीमध्ये 'जेथे शांताचिया घरा...' शांतरसाच्याच घरी इतर नवरस पाहुणचाराला आले आहेत. ज्ञानदेव म्हणतात, माझे साहित्य कसे असावे -नवरसी भरवी सागरू।करवी उचित रत्नांचे आगरू।भावाथार्चे गिरिवरू।निपजती माये।।साहित्य सोनियाचे खाणी।उघडू दे देशियेचिये क्षोणी।नवरसांचे सागर भरवीत, साहित्य सोनियाचिया खाणी उघडवीत, विवेकवल्लीची लावणी करीत, विश्वैक्यधाम्याचा प्रसाद चंद्रमा म्हणून प्रतिभेचे पूर्णत्व घेऊन ज्ञानेश्वरी प्रगटली. ज्ञानेश्वर स्वत: निवृत्तीनाथांप्रमाणेच महर्षी व्यासांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतात.आणि तोचि हा मी आता।श्रीव्यासांची पदे पाहता पाहता।व्यासांचे जगावर मोठे उपकार की, त्यांनी श्रीकृष्णार्जुन संवादाला ग्रंथाचा आकार दिला आणि व्यासांच्या पाऊलांचा मागोवा घेऊनच मी तो ग्रंथविचार मराठियांच्या श्रवणपथाला आणला. माज्या मराठी भाषेचे मोठेपण मी काय सांगू?माझा मराठाचि बोलु कौतुके।परि अमृतातेही पैजासी जिंके।ऐसी अक्षरे रसिके।मेळवीन।। अमृतालाही पैजेनी जिंकणारी अक्षरे, अशी अमृतवाणी ज्ञानदेवांच्या प्रत्येक शब्दाशब्दातून व्यक्त झाली आणि ब्रह्मविद्याच शब्दरूप झाली. गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांनी म्हटले आहे, 'अमृतातेही पैजासी जिंके' आणि 'श्रवणीची होती जिभा' ही प्रतिज्ञाच ज्ञानदेवांनी खरी करून दाखवली. ज्ञानेश्वरीत कर्म आहे; पण कमार्ची कटकट नाही. ज्ञान आहे; पण ज्ञानाचा रुक्षपणा नाही. भक्ती आहे; पण ती भोळ्या अज्ञानाची नाही. ज्ञानदेवांनी तत्त्वज्ञानाला प्रेमाची माधुरी आणली आणि भक्तीला ज्ञानाचा डोळा दिला. 'गीतार्थ महाटिया केला लोकायया' असे जरी असले तरी ज्ञानेश्वरी हा स्वत:ही स्वयंपूर्ण ग्रंथ आहे. गीतेच्या एकेका श्लोकावर किती तरी ओव्या ज्ञानदेवांनी लिहिल्या आहेत. उदाहरण द्यायचे तर तेराव्या अध्यायातील 'अध्यात्मज्ञान नित्यत्वं' या गीतेच्या एका श्लोकावर ज्ञानदेवांनी २४९ ओव्या लिहिल्या आहेत. ज्ञानदेव नेवासे येथील खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगत होते. सच्चिदानंदबाबा लिहून घेत होते आणि समोर बसलेल्या सामान्य शेतकरी, कष्टकरी, खेडुतांना ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगत हाते. सामान्यांच्याही प्रतिभेला समजेपर्यंत दृष्टान्त द्यावेत हे ज्ञानेश्वरीचे मोठेपण आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक