शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सोलापूरात पीक कर्जाच्या वाटपामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांची आघाडी, जिल्हा मध्यवर्ती बँक मागे

By admin | Updated: June 30, 2017 12:52 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३० : एकीकडे कर्जमाफीच्या घोषणेमुळे कर्जबाकी भरण्यासाठी शेतकरी व नव्याने कर्ज देण्यासाठी बँका उदासीन असतानाच खरिपासाठी आतापर्यंत जिल्हाभरातील बँकांनी ४०४ कोटी रुपये इतके कर्ज वाटप केले आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांचा वाटा मोठा आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच बँकांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे १५९० कोटी ४३ लाख रुपये इतके उद्दिष्ट आहे. मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने खरीप पेरणीला वेग आला आहे. मागील वर्षी जून अखेरला पावसाने सुरुवात केली होती त्यामुळे खरीप पेरणीचे क्षेत्र सरासरीच्या तिप्पट झाले होते. यावर्षी चार जूनपासूनच जिल्ह्णात पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. अशा परिस्थितीत पेरणीसाठी बँकांकडून जुने कर्ज भरणे व नव्याने कर्ज मागणे तसेच अनेक शेतकरी प्रथमच पीक कर्ज घेत आहेत. पाऊस चांगला असल्याने बँकांनीही शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी सकारात्मकता दर्शवली असल्याचे कर्ज वाटपाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट दिसत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयीकृत बँका तसेच ग्रामीण बँकेने आतापर्यंत ४०४ कोटी रुपये इतके पीक कर्ज वाटप केले आहे. कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँका पुढे आहेत.---------------------कर्ज वाटपाचा वेग मंदावला- जिल्हा मध्यवर्ती बँकेने १४ हजार ७५० शेतकऱ्यांना १०५ कोटी ९१ लाख रुपये वाटप केले असून, मागील वर्षी याच कालावधीत १९१ कोटी ७८ लाख रुपये वाटप केले होते.- ग्रामीण बँकेने ७१५ शेतकऱ्यांना ९ कोटी ३६ लाख रुपयांचे वाटप केले असून मागील वर्षी याच कालावधीत १२ कोटी ९२ लाख रुपये कर्ज वाटले होते.- राष्ट्रीयीकृत बँकांनी १८ हजार ७६९ शेतकऱ्यांना २८८ कोटी ४४ लाख रुपये इतक्या कर्जाचे वाटप केले असून मागील वर्षी याच कालावधीपर्यंत २३१ कोटी ७८ लाख रुपये वाटप केले ़- २७ जूनपर्यंत एकूण ४०४ कोटी कर्ज वाटप झाले असून, मागील वर्षी याच कालावधीपर्यंत ४३६ कोटी ४८ लाख रुपयांचे वाटप झाले होते.----------------------जिल्हा बँक शून्यावरच...कर्जदार शेतकऱ्यांना तर कर्ज दिलेच पाहिजे शिवाय नव्या सभासदांनाही कर्ज देणे बंधनकारक आहे. जिल्हा बँकेने मात्र नव्या एकाही शेतकऱ्यांना कर्ज दिले नाही. ग्रामीण बँकेने २२ तर राष्ट्रीयीकृत बँकांनी २५ शेतकऱ्यांना नव्याने कर्ज दिले आहे. मागील वर्षीपेक्षा ८६ कोटी कर्जाचे वाटप कमी करणाऱ्या जिल्हा बँकेने नव्याने एकाही शेतकऱ्यांना कर्ज दिले नाही.------------------आमच्याकडे पैसे नाहीत हे आम्ही सांगत आहोत. कारखानदार, शिक्षण संस्थांप्रमाणेच शेतकऱ्यांनीही घेतलेले कर्ज भरण्यासाठी पाठ फिरविल्याने इच्छा असूनही कर्ज देऊ शकत नाही.- राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक