शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

१५ कोटींचा जीएसटी थकविल्याप्रकरणी ‘विठ्ठल’ची सर्व खाती सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:23 IST

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने साखर विकली. मात्र, त्या बदल्यात वस्तू व सेवा कर भरला नाही. त्यामुळे जीएसटी विभागाने ही ...

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने साखर विकली. मात्र, त्या बदल्यात वस्तू व सेवा कर भरला नाही. त्यामुळे जीएसटी विभागाने ही कारवाई केली आहे. याबाबत जीएसटी कार्यालयाने अधिकृत साखर कारखान्यासह बँकांना रितसर नोटीसा काढून जोपर्यंत जीएसटीचा परतावा भरला जात नाही तोपर्यंत कारखान्याच्या सर्व खात्यांवरील व्यवहार तात्पुरते बंद ठेवण्याच्या सूचना बँक व्यवस्थापनाला दिल्या आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संचालक कामगार प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.

कच्चा माल विकत घेताना भरावी लागलेली जीएसटी व पुन्हा माल विक्री झाल्यानंतर आलेल्या नफ्यातून भरावा लागणारा फरक २०१९-२० मध्ये भरला नसल्याचे जीएसटी विभागाच्या लक्षात आले. ही रक्कम जवळपास १५ कोटींपेक्षा जास्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आता ही रक्कम भरल्याशिवाय कारखान्याची कोणतीही खाती सुरू करता येणार नसल्याचे नोटीसीत सांगण्यात आले आहे.

कारखान्याकडे मागील हंगामातील विविध बँकासह शेतकऱ्यांची शेकडो कोटींची देणी थकीत आहेत. चालू गळीत हंगामातील २० डिसेंबरनंतर गाळप झालेल्या ऊसाची वाहतूक, कामगार व इतर आशी जवळपास ७० कोटी रुपयांची देणी थकीत आहेत. त्या रकमा शेतकऱ्यांना त्वरित देण्यात याव्यात यासाठी कारखान्याचे विद्यमान संचालक युवराज पाटील यांनी साखर आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या थकीत रकमा देण्यासाठी कारखाना प्रशासन धडपड करीत असताना जीएसटी थकविल्याप्रकरणी झालेल्या या कारवाईमुळे नवीन अडचणी निर्माण झाल्या आहेत.

याविषयी अध्यक्ष भगीरथ भालके यांच्याशी संपर्क साधला असता ते मुबंईमध्ये आहेत, असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. तर आम्हांला कोणत्याही कामात विश्वासात घेतले जात नाही. ठरावीक संचालकांची कोअर कमिटी बोलवून महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. कारखान्यावर झालेल्या या कारवाईबाबत आपणाला काहीही माहिती नाही. मात्र, कारखान्यात सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. याबाबत आपण साखर आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी माझ्यासह काही संचालकांची धडपड सुरू असल्याचे संचालक युवराज पाटील म्हणाले.

व्यापाऱ्यांनाही आल्या नोटीसा

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला ज्या व्यापाऱ्यांनी कच्चा माल पुरविला त्यांनी जीएसटीचे कामकाज व्यवस्थित केले असले तरीही ज्यांना माल पुरवठा केला आहे (विठ्ठल कारखान्याने जीएसटी भरला नाही) तो परतावा व्यापाऱ्यांना भरावा लागतो, असा नियम आहे. त्यामुळे कारखान्याने जीएसटीचा परतावा न भरल्यास त्याचा भुर्दंड या लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना सहन करावा लागणार आहे. तशा नोटीसाच त्यांना जीएसटी विभागाने काढल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे.

कोट ::::::::::::::::::::::

याबाबत आपणाला अधिकृतपणे काहीही माहिती नाही. गेल्या १५ दिवसांपासून कारखान्याचे एमडी त्याठिकाणी नाहीत. त्यामुळे याबाबत कारवाई झाली असल्यास त्यांच्याकडून माहिती घेऊ. मात्र मला याची कल्पना कोणीही दिली नाही.

- लक्ष्मण पवार

उपाध्यक्ष, विठ्ठल सहकारी साखर कारखाना