शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकोटच्या सेंद्रिय गुळाने देशासह आॅस्ट्रेलिया, जर्मन, इंग्लंडमध्ये खाल्ला ‘भाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 19:53 IST

शिवानंद फुलारी  अक्कलकोट : सांगवी बु।। (ता. अक्कलकोट) येथील सेवानिवृत्त शिक्षक सोमेश्वर गुरव हे सेंद्रिय शेतीद्वारे गूळ निर्मिती करीत ...

ठळक मुद्देसेवानिवृत्त शिक्षक गुरव यांनी अचलेर (ता. उमरगा) येथे तब्बल ३३ वर्षे नोकरी करून वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झालेदरवर्षी किमान पाच एकर उसाची लागवड करून सेंद्रिय पद्धतीने ते जोपासत आहेत.

शिवानंद फुलारी अक्कलकोट : सांगवी बु।। (ता. अक्कलकोट) येथील सेवानिवृत्त शिक्षक सोमेश्वर गुरव हे सेंद्रिय शेतीद्वारे गूळ निर्मिती करीत असून, हा सेंद्रिय गूळ अक्कलकोट येथील डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्या माध्यमातून शिवपुरी संस्थानकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. त्यांच्याच माध्यमातून डोंबिवली, खारघर, पुणे, मंगळवेढा, सोलापूर, बार्शीसह परदेशात आॅस्ट्रेलिया, जर्मन, इंग्लंड या देशात विकला जात आहे. तेथील बाजारपेठेत मोठी मागणी असून, प्रतिकिलो ८० रुपये दरही मिळत आहे. तालुक्यात विषमुक्त शेतीचा नवा पायंडा घालणाºया  गुरव यांचा आदर्श इतर शेतकरी घेत आहेत.

सेवानिवृत्त शिक्षक गुरव यांनी अचलेर (ता. उमरगा) येथे तब्बल ३३ वर्षे नोकरी करून वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासूनच ते सेंद्रिय शेतीचा छंद बाळगून होते. ते १० वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत आहेत. दरवर्षी किमान पाच एकर उसाची लागवड करून सेंद्रिय पद्धतीने ते जोपासत आहेत.

गूळ बनविण्यासाठी स्वतंत्र गूळघर बनविण्यात आले असून, गूळ तयार करण्यासाठी मनुष्यबळ व रोजचा खर्च असला तरी, सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची पत टिकून राहते. विषमुक्त शेतीमुळे रासायनिक खते हद्दपार होऊन हल्ली वाढत असलेल्या कॅन्सरसारखे जीवघेणे आजार बळावणार नाहीत. तालुक्यात आतापर्यंत १० ते १५ शेतकरी अशा शेतीचा प्रयोग करीत असून, त्यांना यशही येत आहे. सेवानिवृत्त शिक्षक गुरव यांना उच्चशिक्षित मुलगा राहुल याचेही चांगले सहकार्य मिळत आहे.

प्रक्रिया अन् काळजी- रासायनिक खत किंवा औषधांचा वापर न करता सेंद्रिय पद्धत अवलंबण्यासाठी जीवामृतसारखी प्रक्रिया ते करीत आहेत. उसाला शेण खत, गांडूळ खत, पतंजली खत, जीवामृत याचा वापर करण्यात येत असून, याला भरपूर खर्च होत असला तरी रासायनिक अंश यात मिसळला जाणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. 

दहा वर्षांपूर्वी सेंद्रिय शेती व त्याचे फायदे जाणून घेतले. त्यानंतर यात उतरण्याचा निर्णय घेतला. सलग तीन वर्षे रासायनिक खतांचा वापर बंद केल्यानंतर खºया अर्थाने सेंद्रिय शेतीला सुरुवात झाली. सध्या दोन एकर गाळप झाले असून, आणखीन २ एकर ऊस गाळपास लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. सेंद्रिय शेतीचा मार्ग शेतकºयांनी अवलंबवावा.-सोमेश्वर गुरव, सेवानिवृत्त शिक्षक, सांगवी बु।।

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसाय