शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

अक्कलकोट तालुक्यात ५५०० शेतकऱ्यांची वीज तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:22 IST

अक्कलकोट : शेती पंपाच्या थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणने वीज पुरवठा बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. तीन दिवसांत ...

अक्कलकोट : शेती पंपाच्या थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणने वीज पुरवठा बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. तीन दिवसांत तब्बल ५ हजार ५२० शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. परिणमी मागील तीन दिवसांपासून अक्कलकोट येथील कार्यालयात थकबाकी भरण्यासाठी शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.

मागील अनेक वर्षांपासून शेती पंपाची थकबाकी वसूल झालेली नाही. शेतकऱ्यांनीसुद्धा वीज बिल माफी मिळेल या आशेने अनेकांनी थकबाकी भरलेली नाही. ही थकबाकी सर्वसामान्यांबाबत आता ती लाखाच्या घरात पोहोचली आहे. शेतकऱ्यांना सोयीचे ठरावे म्हणून शासनाने दोन महिन्यांपूर्वी कृषी धोरण २०२० या योजनेखाली पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक बिलात सूट देण्याची योजना आणली. त्याकडे शेतकऱ्यांनी फारसे गांभीर्याने पाहिले नाही. त्यात राज्य सरकार कधी वीज तोडू नका म्हणून सांगते तर कधी सर्वांना वीज बिल भरावे लागेल म्हणत आहे. या विसंगती मुळे शेतकरी, अधिकारी, कर्मचारी सारेच बुचकळ्यात पडले होते. अचानकपणे १३ मार्चपासून सरसकट डीपी बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील केळी, ऊस, गहू, हरभरा, भाजीपाला ही पिके वाळू लागली आहेत. यंदा कोरोना, अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे नियोजन कोलमडले आहे. थोडाफार असलेला ऊस साखर कारखान्याना पाठवून दिला असून त्याचे अद्याप बिल मिळाले नाही. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी दुष्काळात तेरावा महिना अनुभवत असल्याच्या प्रतिक्रिया नंदकुमार चव्हाण (चुंगी), प्रशांत म्हेत्रे (सलगर), गंगाधर बिराजदार (रामपूर), आंदप्पा कळके (अक्कलकोट) यांनी नोंदवल्या आहेत. ५ एचपी कनेक्शन असताना साडेसात एचपीचे बिल आल्याचे नंदकुमार चव्हाण यांनी सांगितले.

--

४६० रोहित्रांचा वीज पुरवठा खंडित

तडवळ, गुद्देवाडी, अंकलगे, कोर्सेगाव, दुधनी, मैंदर्गी, चप्पळगाव, चुंगी, मोटयाळ, कुरनुर, किणी, वागदरी, घोसळगाव, नागणसूर, तोळणूर, जेऊर, शिरवळ या भागातील तब्बल ४६० रोहित्रांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. अशा शेतकऱ्यांची संख्या ५ हजार ५२० आहे.

--

कृषिपंपाची थकबाकी वसूल मोहीम तीव्र करण्यात आली आहे. १ ते १५ मार्च २१ या काळात ७६१ शेतकऱ्यांनी १ कोटी ३६ लाख रुपये वीज बिल भरणा केला आहे. ज्यांनी बिल भरले आहे त्यांची जोडणी करून दिली जात आहे. यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांना मोबाइलद्वारे नोटीस देण्यात आली आहे.

- संजीवकुमार म्हेत्रे

उपमुख्य कार्यकारी अधिकारी

---

१६ अक्कलकोट

विजेची थकबाकी भरण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे.