शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वडिलांनंतर अनुभव हाच माझा सर्वात मोठा गुरू : अंकुश शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 12:20 IST

गुरूपोर्णिमा विशेष; सोलापूर शहर पोलीस आयुक्तांचा ‘लोकमत’ शी संवाद

ठळक मुद्देआजवर मी इथपर्यंत परिस्थितीनुसार माझ्या अनुभवावर घडत आलो - अंकुश शिंदेआयुष्याच्या प्रत्येक वळणावर गुरुची गरज भासते. सध्याच्या बदलत्या काळात तंत्रज्ञानामुळे माहिती सहज उपलब्ध होते - अंकुश शिंदेआयुष्याचे धडे घेत असताना माझ्या तीन गुरूंनी मला शिकवलं, घडवलं आहे, ज्याचा हिशोब मांडता येणार नाही - अंकुश शिंदे

संताजी शिंदेसोलापूर : आयुष्य खूप सुंदर आहे, ते कसे जगायचे हे आपल्या हातात आहे. चांगल्या गोष्टीचं अनुकरण केलं की त्याचे परिणाम खूप चांगले होतात. जीवनातील माझे पहिले गुरू माझे वडील, त्यानंतर त्यांचे मित्र आणि शालेय जीवनातील शिक्षक होय. शालेय जीवनानंतर मात्र माझे अनुभव हाच माझा सर्वात मोठा गुरू ठरला असे मत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

मी मूळचा आंबाजोगाई तालुक्यातील (बीड जिल्हा) होळे या गावचा रहिवासी आहे. माझे वडील मूळचे शेतकरी होते. त्यांचे जेमतेम शिक्षण हे फक्त ४ थी पर्यंत झालेले. शिक्षण ४ थीपर्यंत झाले तरी त्यांना खूप चांगले ज्ञान होते. कोणावर अन्याय होणार नाही अन् अन्याय सहन करायचा नाही हा त्यांचा मूळ स्वभाव होता. जेव्हा मी लहानाचा मोठा होऊ लागलो, जग काय असतं हे मी डोळ्यानं पाहू लागलो तेव्हा वडील हे माझे मार्गदर्शक होते. चांगल्या, वाईट गोष्टींबद्दल ते नेहमी मला सांगत होते. काय केलं पाहिजे, काय नाही याचं मार्गदर्शन ते माझ्या ज्या त्या वयात माझ्या बुद्धीला समजेल अशा पद्धतीने सांगत असत. वडिलांनी केलेल्या मार्गदर्शनामुळं मी आजूबाजूचा परिसर समजून घेऊ लागलो. कुठं कसं वागायचं अन् कसं बोलायचं याचा अंदाज घेत मी लहानाचा मोठा झालो. 

दरम्यान, गावात राहणाºया माझ्या वडिलांचे जिवलग मित्र विठ्ठल कांबळे यांच्या सहवासात आलो. मी विठ्ठल कांबळे यांच्या घरचा सदस्य झालो. आठवड्यातील चार दिवस त्यांच्या घरी मुक्कामी राहात होतो. दरम्यानच्या काळात विठ्ठल कांबळे यांनी मला सामाजिक समतेबद्दल मार्गदर्शन केलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने मी प्रभावीत झालो. बाबासाहेबांसारखी व्यक्ती बिकट परिस्थितीमधून जर शून्यातून स्वत:चं विश्व निर्माण करीत असेल तर आपण स्वत:च अस्तित्व का निर्माण करू शकत नाही हा प्रश्न मला पडला. त्यांची प्रेरणा घेऊन मी शिक्षण घेतलं. गावातील होळेश्वर विद्यालयात शिक्षण घेत असताना मला मापारी गुरुजी हे शिक्षक लाभले. वाढत्या वयात मनाला पडणारे प्रश्न आणि जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होत होती तेव्हा पुस्तकी ज्ञानाबरोबर बाह्य गोष्टींची माहिती माझे गुरुजी मला करून देत होते. तीन गुरूंच्या सान्निध्यातून मी खूप शिकलो. त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर मी माझ्या जीवनाचा प्रवास सुरू केला. आजवर मी इथपर्यंत परिस्थितीनुसार माझ्या अनुभवावर घडत आलो. सध्या अनुभव हाच माझा सर्वात मोठा गुरू आहे असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले.

गुरूनं दिलेले धडे आत्मसात करता आले पाहिजेतआयुष्याच्या प्रत्येक वळणावर गुरुची गरज भासते. सध्याच्या बदलत्या काळात तंत्रज्ञानामुळे माहिती सहज उपलब्ध होते. शालेय तसंच कॉलेजचं शिक्षण आॅनलाईन पद्धतीनं घेणं शक्य झालंय. त्यामुळे तरुणाईनं तंत्रज्ञानालाच आपला मार्गदर्शक मानलं आहे. पण तंत्रज्ञान हे तुमच्या चुकांची जाणीव करून देऊ शकणार नाही. त्यासाठी उत्तम मार्गदर्शकच हवा. तंत्रज्ञान विकसित झालं असलं तरी गुरूचं ज्ञान हे कायम मोलाचं असतं. गुरू माझ्यावरील संस्कारांचे शिल्पकार आहेत. आयुष्याचे धडे घेत असताना माझ्या तीन गुरूंनी मला शिकवलं, घडवलं आहे, ज्याचा हिशोब मांडता येणार नाही. गुरूनं शिकवलेले धडे तुम्हाला आत्मसात करता आले पाहिजेत असा संदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिला. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसGuru Purnimaगुरु पौर्णिमा