शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

उजनीतून शेतकरी नेत्यांना बाहेर काढण्याचा प्रशासनाचा मनसुबा यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:23 IST

कुरुल : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी आणि शेतकऱ्यांचे भविष्य असलेल्या उजनी धरणातील पाणी सांडपाणी अशी शब्दचलाखी करून पुणे ...

कुरुल : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी आणि शेतकऱ्यांचे भविष्य असलेल्या उजनी धरणातील पाणी सांडपाणी अशी शब्दचलाखी करून पुणे जिल्ह्यातील इंदापूरला वळविण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला आहे. या पाणीचोरीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी उजनी जलाशयात जलसमाधी घेण्याचा आक्रमक पवित्रा घेऊन उजनी जलाशयात उड्या मारल्या. पालकमंत्र्यांबरोबर बैठक लावा आणि तसे लेखीपत्र द्या, असा आक्रमक पवित्रा शेतकरी नेत्यांनी घेतल्याने निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी पत्र पाठवून ७ मे रोजी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांची नियोजन भवन, सोलापूर येथे बैठक लावली असल्याचे लेखी दिले. मात्र ही नियोजित बैठक लांबवून शेतकरी संघटनेच्या नेत्यांना पाण्याच्या बाहेर काढण्याचे प्रशासनाचे डावपेच यशस्वी झाले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याचा निर्णय जलसंपदा विभागामार्फत घेतला आहे. यामुळे आपल्या हक्काच्या पाण्यावर गदा येईल म्हणून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याचा उद्रेक म्हणून उजनी जलाशयात पालकमंत्री भरणे यांचा पुतळा बुडविला.

दरम्यान, उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना करून जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. १ मे रोजी शेतकरी नेत्यांनी जलाशयात उड्या मारल्या. आंदोलक जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी पत्रावर ठाम होते. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी लेखी पत्र देऊन पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी या पाणीप्रश्नावर बैठक लावली असल्याचे सांगून संघटनेची बोळवण केली. दरम्यान, ७ मे रोजीच्या बैठकीप्रश्नी ६ मे रोजी चौकशी केली असता नियोजित बैठक रद्द झाली असून, तहसीलदारांना याबाबत कळविले असल्याचे सांगण्यात आले. मात्र ज्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आंदोलने केले, त्यांना गुरुवारी सायंकाळी ६ पर्यंत बैठक रद्द करण्यात आल्याबाबत कुठलीही कल्पना देण्यात आली नव्हती. म्हणजे त्यादिवशी केवळ आंदोलकांना उजनी जलाशयातून बाहेर काढण्यासाठीच ते पत्र दिले असल्याची चर्चा आता रंगली आहे.

पालकमंत्री व जलसंपदा विभागाने कितीही प्रयत्न केले तरी आम्ही हा निर्णय बद्दलल्यावरच आंदोलन थांबवू, असे उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे सचिव माउली हळणवर यांनी सांगितले.

-----

..तर तीव्र पडसाद उमटतील

आंदोलनाची धार कमी करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आडून बारामतीकरांनी टाकलेला हा डाव आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्ह्यातच बैठकीला येणे सोईचे असताना जाणीवपूर्वक बैठक पुणे येथे ठेवण्यात आली आहे. ही नियोजित बैठक लांबवणे म्हणजे निव्वळ वेळकाढूपणा आहे. आता सोमवारी ठरल्याप्रमाणे पुणे येथे उद्याची बैठक न झाल्यास याचे सोलापूर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांनी दिला आहे.