शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

उजनीतून शेतकरी नेत्यांना बाहेर काढण्याचा प्रशासनाचा मनसुबा यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:23 IST

कुरुल : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी आणि शेतकऱ्यांचे भविष्य असलेल्या उजनी धरणातील पाणी सांडपाणी अशी शब्दचलाखी करून पुणे ...

कुरुल : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी आणि शेतकऱ्यांचे भविष्य असलेल्या उजनी धरणातील पाणी सांडपाणी अशी शब्दचलाखी करून पुणे जिल्ह्यातील इंदापूरला वळविण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला आहे. या पाणीचोरीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी उजनी जलाशयात जलसमाधी घेण्याचा आक्रमक पवित्रा घेऊन उजनी जलाशयात उड्या मारल्या. पालकमंत्र्यांबरोबर बैठक लावा आणि तसे लेखीपत्र द्या, असा आक्रमक पवित्रा शेतकरी नेत्यांनी घेतल्याने निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी पत्र पाठवून ७ मे रोजी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांची नियोजन भवन, सोलापूर येथे बैठक लावली असल्याचे लेखी दिले. मात्र ही नियोजित बैठक लांबवून शेतकरी संघटनेच्या नेत्यांना पाण्याच्या बाहेर काढण्याचे प्रशासनाचे डावपेच यशस्वी झाले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याचा निर्णय जलसंपदा विभागामार्फत घेतला आहे. यामुळे आपल्या हक्काच्या पाण्यावर गदा येईल म्हणून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याचा उद्रेक म्हणून उजनी जलाशयात पालकमंत्री भरणे यांचा पुतळा बुडविला.

दरम्यान, उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना करून जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. १ मे रोजी शेतकरी नेत्यांनी जलाशयात उड्या मारल्या. आंदोलक जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी पत्रावर ठाम होते. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी लेखी पत्र देऊन पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी या पाणीप्रश्नावर बैठक लावली असल्याचे सांगून संघटनेची बोळवण केली. दरम्यान, ७ मे रोजीच्या बैठकीप्रश्नी ६ मे रोजी चौकशी केली असता नियोजित बैठक रद्द झाली असून, तहसीलदारांना याबाबत कळविले असल्याचे सांगण्यात आले. मात्र ज्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आंदोलने केले, त्यांना गुरुवारी सायंकाळी ६ पर्यंत बैठक रद्द करण्यात आल्याबाबत कुठलीही कल्पना देण्यात आली नव्हती. म्हणजे त्यादिवशी केवळ आंदोलकांना उजनी जलाशयातून बाहेर काढण्यासाठीच ते पत्र दिले असल्याची चर्चा आता रंगली आहे.

पालकमंत्री व जलसंपदा विभागाने कितीही प्रयत्न केले तरी आम्ही हा निर्णय बद्दलल्यावरच आंदोलन थांबवू, असे उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे सचिव माउली हळणवर यांनी सांगितले.

-----

..तर तीव्र पडसाद उमटतील

आंदोलनाची धार कमी करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आडून बारामतीकरांनी टाकलेला हा डाव आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्ह्यातच बैठकीला येणे सोईचे असताना जाणीवपूर्वक बैठक पुणे येथे ठेवण्यात आली आहे. ही नियोजित बैठक लांबवणे म्हणजे निव्वळ वेळकाढूपणा आहे. आता सोमवारी ठरल्याप्रमाणे पुणे येथे उद्याची बैठक न झाल्यास याचे सोलापूर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांनी दिला आहे.