शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मंद्रुपमध्ये अतिरिक्त तहसिल कार्यालय, तत्वत मान्यता : सहकारमंत्र्यांनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 17:04 IST

दक्षिण सोलापूर तालुक्यात मंद्रुप येथे अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिल्याची राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़

ठळक मुद्देमंद्रुप तालुकानिर्मितीचे पाऊल़़प्रशासकीय कामांचे विकेंद्रीकरण़़ होणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरदक्षिण सोलापूर दि २१ : दक्षिण सोलापूर तालुक्यात मंद्रुप येथे अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिल्याची राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़ यासंबंधी प्रस्ताव लवकरच महसुल विभागाकडे सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मंद्रुप येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली़ वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील जनतेची अतिरिक्त तहसिल कार्यालयाची अनेक वर्षापासून मागणी आहे़ यासंदर्भात एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली़ या भेटीत मुख्यमंत्र्यांनी इस्लामपूर येथे अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू करण्यास तत्वत: मान्यता देण्याचे जाहीर केले, याचवेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही मंद्रुप येथे अशा अतिरिक्त तहसिल कार्यालयाची मागणी अनेक वर्षापासून होत असल्याचे निदर्शनास आणून देताच मुख्यमंत्र्यांनी इस्लामपूर आणि मंद्रुप येथे अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू करण्यासाठी तत्वत: मान्यता दिल्याचे जाहीर केले़मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक भूमिकेनंतर मंद्रुपचा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्या आहेत़ महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तातडीने प्रस्ताव पाठवून तो मंजूर करून घेऊ अशी माहिती देशमुख यांनी मंद्रुप येथे बोलताना दिली़----------------------तालुकानिर्मितीचे पाऊल़़मंद्रुप तालुका निर्मितीची मागणी अनेक वर्षापासून आहे, पण मंद्रुपमध्ये कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत़ शासकीय इमारतींची वानवा आहे़ त्यामुळे प्रशासकीय कार्यालय सुरू करताना अडचणी येत आहेत़ मंद्रुपमध्ये अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू करून तालुका निर्मितीचे पहिले पाऊल सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी टाकल्याचे मानले जाते़----------------------प्रशासकीय कामांचे विकेंद्रीकरण़़मंद्रुप येथे अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू झाल्यास प्रशासकीय कामांचे विकेंद्रीकरण होईल़ नायब तहसिलदारासह काही कर्मचारी या कार्यालयातून दाखले देणे, विविध शासकीय योजनांसाठी अर्ज स्वीकृती आदी कामे केल्याने परिसरातील जनतेची सोय होणार आहे़