शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

आषाढीला उजनीचे पाणी नाही

By admin | Updated: June 27, 2014 01:14 IST

उजनी वजा २२ वर : गुरसाळे बंधाऱ्यातून चंद्रभागेत सोडणार पाणी

पंढरपूर : उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने लाभक्षेत्रात पाणीटंचाई निर्माण होत आहे. अशात उजनी धरणाची पाणी पातळी वजा २२ टक्के इतकी खाली गेल्याने आषाढी यात्रेसाठी उजनी धरणातून पाणी सोडणे शक्य नसल्याचे चित्र आहे. वारीसाठी गुरसाळे बंधाऱ्यातून चंद्रभागा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे कमी पाण्यातच वारकऱ्यांना चंद्रभागेत स्नान उरकावे लागणार आहे.गेल्या महिन्यात १९ मे रोजी उजनी धरणातून भीमानदी पात्रात पाणी सोडण्यात आले होते. या पाण्याने भीमा नदीवरील बंधाऱ्यात पाणी साठविण्यात आले आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुरसाळे, पंढरपूर बंधाराही भरून घेण्यात आला असून वारीसाठी गरज भासली तर गुरसाळे बंधाऱ्यातून पाणी सोडले जाईल, असे विभागाचे कार्यकारी अभियंता सर्जेराव शिंदे यांनी सांगितले.पंढरपूर पंचायत समितीच्या वतीने यात्रा काळात उजनी धरणातून आणि नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी पत्र देऊन करण्यात आली आहे. ते पत्र आपण कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठविल्याचे शिंदे म्हणाले. उजनी धरणाखालील आलेगाव बंधारा सोडला तर भीमा नदीवरील अरळी बंधाऱ्यापर्यंतचे १४ बंधारे पाण्याने परिपूर्ण भरले आहेत. रोहिणी, मृग, आर्द्रासह सर्व नक्षत्रे कोरडी गेली आहेत. उन्हाची तीव्रता वाढली असून पाण्याअभावी पिके धोक्यात येण्याची भीती वाढल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. अशी परिस्थिती असताना उजनीतून पाणी सोडणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांबरोबरच वारकऱ्यांचे पाण्याविना हालच होणार आहेत. उजनी धरणावर विविध शहरांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून असून शासन पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देते. पावसाने ओढ दिल्याने विहिरी, बोअर आटू लागले असून ५०० फुटांपर्यंत बोअर खोल गेले तरी पाणी लागेना, इतकी पाणी पातळी खोल गेल्याने शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.--------------------------पाणीटंचाई भासणारपंढरपूर बंधाऱ्यातून पंढरपूर, सांगोला या शहरांसाठी पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय सोलापूरच्या पाण्याची भिस्तही उजनीवरच आहे. पंढरपूर बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर त्यात वरच्या बाजूला असलेल्या गुरसाळे बंधाऱ्यातून पाणी सोडले जाते. आता गुरसाळे बंधाऱ्यातूनच पाणी सोडण्यात येणार असल्याने भविष्यात पाऊस लांबल्यानंतर पाणीपुरवठा योजनेला पाणी नसण्याची अधिक शक्यता आहे. --------------------------------उजनी धरण मायनस २२ टक्क्यांवर गेल्याने वारीसाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडणे सध्या अशक्य आहे. गुरसाळे बंधाऱ्यात सध्या मुबलक पाण्याचा साठा असल्याने त्यातील पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे चंद्रभागेत वारकऱ्यांसाठी स्नानासाठी पाणी येणार आहे.- सर्जेराव शिंदेअभियंता, भीमा पाटबंधारा, पंढरपूर विभाग