शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

आषाढीला उजनीचे पाणी नाही

By admin | Updated: June 27, 2014 01:14 IST

उजनी वजा २२ वर : गुरसाळे बंधाऱ्यातून चंद्रभागेत सोडणार पाणी

पंढरपूर : उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने लाभक्षेत्रात पाणीटंचाई निर्माण होत आहे. अशात उजनी धरणाची पाणी पातळी वजा २२ टक्के इतकी खाली गेल्याने आषाढी यात्रेसाठी उजनी धरणातून पाणी सोडणे शक्य नसल्याचे चित्र आहे. वारीसाठी गुरसाळे बंधाऱ्यातून चंद्रभागा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे कमी पाण्यातच वारकऱ्यांना चंद्रभागेत स्नान उरकावे लागणार आहे.गेल्या महिन्यात १९ मे रोजी उजनी धरणातून भीमानदी पात्रात पाणी सोडण्यात आले होते. या पाण्याने भीमा नदीवरील बंधाऱ्यात पाणी साठविण्यात आले आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुरसाळे, पंढरपूर बंधाराही भरून घेण्यात आला असून वारीसाठी गरज भासली तर गुरसाळे बंधाऱ्यातून पाणी सोडले जाईल, असे विभागाचे कार्यकारी अभियंता सर्जेराव शिंदे यांनी सांगितले.पंढरपूर पंचायत समितीच्या वतीने यात्रा काळात उजनी धरणातून आणि नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी पत्र देऊन करण्यात आली आहे. ते पत्र आपण कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठविल्याचे शिंदे म्हणाले. उजनी धरणाखालील आलेगाव बंधारा सोडला तर भीमा नदीवरील अरळी बंधाऱ्यापर्यंतचे १४ बंधारे पाण्याने परिपूर्ण भरले आहेत. रोहिणी, मृग, आर्द्रासह सर्व नक्षत्रे कोरडी गेली आहेत. उन्हाची तीव्रता वाढली असून पाण्याअभावी पिके धोक्यात येण्याची भीती वाढल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. अशी परिस्थिती असताना उजनीतून पाणी सोडणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांबरोबरच वारकऱ्यांचे पाण्याविना हालच होणार आहेत. उजनी धरणावर विविध शहरांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून असून शासन पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देते. पावसाने ओढ दिल्याने विहिरी, बोअर आटू लागले असून ५०० फुटांपर्यंत बोअर खोल गेले तरी पाणी लागेना, इतकी पाणी पातळी खोल गेल्याने शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.--------------------------पाणीटंचाई भासणारपंढरपूर बंधाऱ्यातून पंढरपूर, सांगोला या शहरांसाठी पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय सोलापूरच्या पाण्याची भिस्तही उजनीवरच आहे. पंढरपूर बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर त्यात वरच्या बाजूला असलेल्या गुरसाळे बंधाऱ्यातून पाणी सोडले जाते. आता गुरसाळे बंधाऱ्यातूनच पाणी सोडण्यात येणार असल्याने भविष्यात पाऊस लांबल्यानंतर पाणीपुरवठा योजनेला पाणी नसण्याची अधिक शक्यता आहे. --------------------------------उजनी धरण मायनस २२ टक्क्यांवर गेल्याने वारीसाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडणे सध्या अशक्य आहे. गुरसाळे बंधाऱ्यात सध्या मुबलक पाण्याचा साठा असल्याने त्यातील पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे चंद्रभागेत वारकऱ्यांसाठी स्नानासाठी पाणी येणार आहे.- सर्जेराव शिंदेअभियंता, भीमा पाटबंधारा, पंढरपूर विभाग