शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने मोहोळ येथील नवरदेवांचे सोलापुरात अनोखे आंदोलन

By appasaheb.patil | Updated: December 21, 2022 15:09 IST

राज्यामध्ये दिवसेंदिवस मुलींची संख्या कमी होत चालल्यामुळे तरुण मुलांच्या लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे.

सोलापूर :

राज्यामध्ये दिवसेंदिवस मुलींची संख्या कमी होत चालल्यामुळे तरुण मुलांच्या लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. अनेक तरुण लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. मुलांची लग्न न झाल्यामुळे आईबापाची काळजी दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्यांना वेगवेगळ्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. याबाबत सरकारने योग्य धोरण राबवावे या मागणीसाठी लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक नवरदेवांचा मुंडवळ्या बांधून जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्हाला बायको मिळवून द्या, या मागणीसाठी ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने मोर्चा काढला. 

या मोर्चात सहभागी झालेले मुलं लग्नातील नवरदेवासारखी नटली होती. त्याची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. या मोर्चात शेकडो अविवाहित मुलं सहभागी झाले होते. या आगळ्या वेगळ्या मोर्चाने सोलापूरकरांचे लक्ष वेधले. या मोर्चाचे नेतृत्व ज्योती क्रांती परिषदेचे संस्थापक रमेश बारस्कर यांनी केले होते. 

दरम्यान, सरकारने केलेल्या कायद्यामुळे लोकसंख्येवर निर्बंध आले आहेत. मात्र, गर्भलिंग निदान चाचणीचा कायद्याची अंमलबजावणी राज्यामध्ये नियमानुसार होत नाही. महाराष्ट्रासह परराज्यामध्ये गर्भलिंग निदान चाचणीच्या माध्यमातून मुलींऐवजी मुलांना प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे मुलींची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीचे भविष्य अंधकारमय झाले आहे. वेळेत लग्न जमत नसल्याने मुले व्यसनाधीन होत आहेत.

पर्यायाने देशातील राज्यातील तरुण शक्ती कमकुवत होत चालली आहे. यांना सशक्त करणे ही सरकारची जबाबदारी असून याबाबत सरकारने विचार करावा. जिल्ह्यातल्या लग्न न झालेल्या अनेक तरुण मुलांचा विचार करून तरुणांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोहोळ परिसरातील लग्न न झालेल्या नवरदेवांचा डोक्याला मुंडवळ्या बांधून मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही यावेळी बारसकर यांनी सांगितले.