शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

वीस रुपयांसाठी पाचशे-हजारांचा दंड; सोलापूरकरांनो नेहमीच कशाला सोसता हा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 16:33 IST

रिक्षाचालक म्हणतात : पेट्रोल, एलपीजी भाव वाढले व्यवसाय कसा करायचा

सोलापूर : शेअर ए रिक्षामधून सध्या सर्रासपणे तीनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक शहर जिल्ह्यात होत आहे. वाहतूक पोलीस प्रतिप्रवासी ५०० रुपयांप्रमाणे दंड आकारतात. रिक्षाचालकांची ओरड होतेय. पेट्रोल, एलपीजीचे दर वाढले असताना त्यावर कोणी बोलत नाही, व्यवसाय कसा करायचा असा सवाल करून लागले आहेत.

सोलापूर शहरात सध्या पेट्रोल, एलपीजी, सीएनजीवर इंधनावर जवळपास १२ रिक्षा चालवल्या जातात. यात एलपीजवर चालणाऱ्या रिक्षा जास्त आहेत. सध्या इंधनाचे दर शंभर रुपयांच्या पुढे आहेत. मीटरप्रमाणे भाडेही परवडत नाही. दरवाढ मागितली तरी दिली जात नाही. नुकतीच झालेली दरवाढही केवळ सहा रुपायांनी वाढवून ती १८ रुपयांपर्यंत केली आहे. त्यातही पूर्वीच्या पहिल्या एक मीटरवरून दीड किलोमीटरपर्यंत वाढ केली आहे. नाइलाजाने अधिकचे प्रवासी घेऊन वाहतूक केली जाते. यावर परिवहन प्राधिकरणानेच दरवाढ करून पर्याय काढावा, अशी रिक्षाचालकांची मागणी आहे.

----

कोंबून प्रवास करणे धोक्याचे

तीन प्रवाशांचा परवाना असताना मधल्या आसनावर चार जण, पुढे चालकाच्या दोन्ही बाजूने दोघे असे सहा जणांना घेऊन प्रवासी वाहतूक होते. ती रिक्षाचालक आणि प्रवाशांच्याही दृष्टीने धोक्याचे आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. अशी वाहतूक जीवघेणीही ठरू शकते, याचा प्रवाशांनीही विचार करावा, असा सूर संजय घोडके, शिवानी शिंदे, अमृत पानसरे आदींनी व्यक्त केला.

-----

प्रति अतिरिक्त प्रवाशांनुसार दंड

१५ ते २० रुपयांच्या प्रवासाठी शेअर रिक्षाच्या नावाखाली रिक्षाचालकांना प्रतिप्रवासी ५०० रुपयांप्रमाणे दंड मोजावा लागतो. पोलिसांच्या मते नियमानुसार प्रवासी भर कारवाईला सामोरे जायचाच प्रश्न येत नाही, तर रिक्षाचालक म्हणतात. पेट्रोलने १०० रुपये पार केले अशावेळी वाहतूक कशी करायची. कसे परवडणार? नुकतीची केलेली दरवाढही केवळ ६ रुपये केली आहे.

----

पुन्हा कारवाई तीव्र होणार

एकीकडे अपघाताची संख्या वाढत आहे. परिवहन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या नियमानुसार प्रवासी वाहतूक करणे गरजेचे असताना शेअर ए रिक्षाच्या नावाखाली तीनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक होते. अशावेळी वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाते. मध्यंतरी शिथिल झालेली कारवाई पुन्हा तीव्र करण्याचे संकेत वाहतूक विभागाने दिले आहेत.

----

शहरात १२ हजार ॲटो रिक्षा

सोलापूर शहरात पूर्वी ५ हजार अधिकृत ॲटो रिक्षा होत्या. नव्याने ७ हजार परमीट मिळाले आहेत. २०१२ पासून दरवाढ झाली नव्हती. मे महिन्यात परिवहन प्राधिकरणाने ॲट रिक्षाचालकांच्या बैठकीत पूर्वीच्या १२ रुपये प्रतिकिलोमीटरवरून आता ६ रुपये वाढ करून ती १८ रुपयांवर नेली आहे. ही दरवाढ तोकडी असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. शेअर ए रिक्षाद्वारे आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करतोय. यासाठी दरवाढ करा, जादा प्रवासी भरण्याचा प्रश्नच येत नाही, असा सवाल रिक्षाचालकांमधून होत आहे.

----

टॅग्स :Solapurसोलापूरauto rickshawऑटो रिक्षाSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस