शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

वीस रुपयांसाठी पाचशे-हजारांचा दंड; सोलापूरकरांनो नेहमीच कशाला सोसता हा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 16:33 IST

रिक्षाचालक म्हणतात : पेट्रोल, एलपीजी भाव वाढले व्यवसाय कसा करायचा

सोलापूर : शेअर ए रिक्षामधून सध्या सर्रासपणे तीनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक शहर जिल्ह्यात होत आहे. वाहतूक पोलीस प्रतिप्रवासी ५०० रुपयांप्रमाणे दंड आकारतात. रिक्षाचालकांची ओरड होतेय. पेट्रोल, एलपीजीचे दर वाढले असताना त्यावर कोणी बोलत नाही, व्यवसाय कसा करायचा असा सवाल करून लागले आहेत.

सोलापूर शहरात सध्या पेट्रोल, एलपीजी, सीएनजीवर इंधनावर जवळपास १२ रिक्षा चालवल्या जातात. यात एलपीजवर चालणाऱ्या रिक्षा जास्त आहेत. सध्या इंधनाचे दर शंभर रुपयांच्या पुढे आहेत. मीटरप्रमाणे भाडेही परवडत नाही. दरवाढ मागितली तरी दिली जात नाही. नुकतीच झालेली दरवाढही केवळ सहा रुपायांनी वाढवून ती १८ रुपयांपर्यंत केली आहे. त्यातही पूर्वीच्या पहिल्या एक मीटरवरून दीड किलोमीटरपर्यंत वाढ केली आहे. नाइलाजाने अधिकचे प्रवासी घेऊन वाहतूक केली जाते. यावर परिवहन प्राधिकरणानेच दरवाढ करून पर्याय काढावा, अशी रिक्षाचालकांची मागणी आहे.

----

कोंबून प्रवास करणे धोक्याचे

तीन प्रवाशांचा परवाना असताना मधल्या आसनावर चार जण, पुढे चालकाच्या दोन्ही बाजूने दोघे असे सहा जणांना घेऊन प्रवासी वाहतूक होते. ती रिक्षाचालक आणि प्रवाशांच्याही दृष्टीने धोक्याचे आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. अशी वाहतूक जीवघेणीही ठरू शकते, याचा प्रवाशांनीही विचार करावा, असा सूर संजय घोडके, शिवानी शिंदे, अमृत पानसरे आदींनी व्यक्त केला.

-----

प्रति अतिरिक्त प्रवाशांनुसार दंड

१५ ते २० रुपयांच्या प्रवासाठी शेअर रिक्षाच्या नावाखाली रिक्षाचालकांना प्रतिप्रवासी ५०० रुपयांप्रमाणे दंड मोजावा लागतो. पोलिसांच्या मते नियमानुसार प्रवासी भर कारवाईला सामोरे जायचाच प्रश्न येत नाही, तर रिक्षाचालक म्हणतात. पेट्रोलने १०० रुपये पार केले अशावेळी वाहतूक कशी करायची. कसे परवडणार? नुकतीची केलेली दरवाढही केवळ ६ रुपये केली आहे.

----

पुन्हा कारवाई तीव्र होणार

एकीकडे अपघाताची संख्या वाढत आहे. परिवहन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या नियमानुसार प्रवासी वाहतूक करणे गरजेचे असताना शेअर ए रिक्षाच्या नावाखाली तीनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक होते. अशावेळी वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाते. मध्यंतरी शिथिल झालेली कारवाई पुन्हा तीव्र करण्याचे संकेत वाहतूक विभागाने दिले आहेत.

----

शहरात १२ हजार ॲटो रिक्षा

सोलापूर शहरात पूर्वी ५ हजार अधिकृत ॲटो रिक्षा होत्या. नव्याने ७ हजार परमीट मिळाले आहेत. २०१२ पासून दरवाढ झाली नव्हती. मे महिन्यात परिवहन प्राधिकरणाने ॲट रिक्षाचालकांच्या बैठकीत पूर्वीच्या १२ रुपये प्रतिकिलोमीटरवरून आता ६ रुपये वाढ करून ती १८ रुपयांवर नेली आहे. ही दरवाढ तोकडी असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. शेअर ए रिक्षाद्वारे आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करतोय. यासाठी दरवाढ करा, जादा प्रवासी भरण्याचा प्रश्नच येत नाही, असा सवाल रिक्षाचालकांमधून होत आहे.

----

टॅग्स :Solapurसोलापूरauto rickshawऑटो रिक्षाSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस