शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

९१३ कोटी ५३ लाखांची विजेची बिले थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 12:47 IST

बार्शी, माढा व करमाळा तालुक्यांचा समावेश : बार्शी महावितरण विभागीय कार्यालय

ठळक मुद्देथकबाकी कमी होण्याऐवजी मागील वर्षापेक्षा जवळ जवळ  २२२ कोटींची वाढ महावितरणच्या वतीने वीज बिल वसुली मोहीम हाती घेण्यात आली

भ. के. गव्हाणेबार्शी : येथील महावितरण कार्यालयाच्या अंतर्गत येणाºया बार्शी, माढा आणि करमाळा तालुक्यात फेब्रुवारी-२०१८ अखेर ९१३ कोटी ५३ लाखांची वीज बिले थकीत आहेत. त्यात कृषीपंपाची ८७१ कोटी १५ लाख, घरगुती आणि औद्योगिक आणि इतर ग्राहकांकडे ६ कोटी ७५ लाख तर पाणीपुरवठ्याची ११ कोटी ४२ लाख रुपयांचा समावेश आहे. थकीबाकीमध्ये इतर घटकांचाही समावेश आहे. 

थकबाकी कमी कमी होण्यासाठी आजपर्यंत शासनाने व वीज वितरण कंपनीने कृषीपंप थकबाकीसाठी अनेक विविध सवलती जाहीर केल्या, सबसिडी जाहीर केली, परंतु त्यास अपेक्षेप्रमाणे ग्राहकांकडून थकबाकी वसुलीसाठी ठरविलेल्या उद्दिष्टाप्रमाणे वसुली न होता उलट थकबाकी कमी होण्याऐवजी मागील वर्षापेक्षा जवळ जवळ  २२२ कोटींची वाढ झालेली दिसत आहे.

सध्या महावितरणच्या वतीने वीज बिल वसुली मोहीम हाती घेण्यात आली असून, ती अधिक तीव्र करण्यात येत आहे. तरीही वीज बिल वसुलीस म्हणावा तसा प्रतिसाद मिळेना. सध्या सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांची संख्या विचारात घेता ती २ लाख  ८६ हजार  ६१२ इतकी आहे. त्यात बार्शी तालुक्यात घरगुती  ५५००५, व्यापारी ४७९१,   औद्योगिक १०९४  तर कृषी ग्राहक २७२४९ व इतर ४१५ असे एकूण  १ लाख १२ हजार ९१६  तर करमाळा तालुक्यात घरगुती २५९५२, व्यापारी २५०२, औद्योगिक ग्राहक ५३७, कृषी ग्राहक ३२२११ इतर  ४११  असे एकूण  ७५८१६ आहेत.  माढा तालुक्यात घरगुती २९५६९, व्यापारी ३४७०,  औद्योगिक ८३७  तर कृषी ग्राहक ४३३४९ इतर ४६४ असे एकूण  ९७८८०  ग्राहक आहेत.

राज्यातील शेतकºयांची कृषीपंपाची थकबाकी वसुलीसाठी राज्य शासनाने कृषी संजीवनी योजना जाहीर करूनही त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेतकºयांनी याचा लाभ घेतला नसल्याने थकबाकी वाढली असल्याने या कृषी संजीवनी योजनेंतर्गत मूळ असलेली थकबाकी हप्त्याने भरण्याची तरतूद करण्यात आली असून, त्यात ३० हजारांची थकबाकीदार शेतकºयांना प्रत्येक तिमाहीस  एक हप्ता अशा पाच हप्त्याची सवलत तर ३० हजारांच्यावर थकबाकीदार असतील तर प्रत्येक दीड महिन्यास एक हप्ता भरण्याची तरतूद आहे. या प्रत्येक हप्त्यासह चालू बिलही भरण्याचे आहे. कृषी संजीवनी योजनेतील कृषीपंप ग्राहकांनी मार्च २०१८ पर्यंत थकबाकी भरून लाभ घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता ताडे यांनी केले आहे .

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरण