शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

माढा तालुक्याची हागणदारीमुक्तीकडे वाटचाल, १०८ पैकी ७९ ग्रा़पं हागणदारीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 17:07 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली माढा पंचायत समितीच्या अंतर्गत १०८  ग्रामपंचायतीपैंकी ७९ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.

ठळक मुद्देमाढा तालुका सध्या ९१ टक्के  हागणदारीमुक्त ४३ हजार १७३ शौचालयापैकी ३८ हजार ९६४ बांधून वापरात आहेतगावागावात तब्बल ५ कोटी ६८ लाख  ८६ हजार ६०० रूपयांचा निधी खर्च

आॅनलाइन लोकमत सोलापूरलऊळ दि २३ : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली माढा पंचायत समितीच्या अंतर्गत १०८  ग्रामपंचायतीपैंकी ७९ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. प्रत्येक घरामध्ये शौचालय बांधुन त्याचा नियमित वापर करण्यासाठीचा प्रयत्न या चळवळीतून होत आहे. त्यामध्ये  तालुक्यातील उर्वरीत गावांतूनही शौचालय बांधणीला वेग आल्याचे दिसत आहे.यामुळे माढा तालुका सध्या ९१ टक्के  हागणदारीमुक्त झाला असुन १०० टक्केकडे वाटचाल करीत असल्याची माहिती गटविकास अधिकारी गोकुळदास बैरागी यांनी दिली़१०८ ग्रामपंचायतीपैकी ७९ टक्के ग्रामपंचायती सध्या हागणदारीमुक्त झाल्या असून एकुण ४३ हजार १७३ शौचालयापैकी ३८ हजार ९६४ बांधून वापरात आहेत.उर्वरित  ग्रामपंचायतीमधील ४हजार २०९ शौंचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत मिशनचे तालुका समन्वयक ज्ञानेश्वर सुतार यांच्या पथकाचे काम प्रगतीपथावर आहे. स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत आत्तापर्यंत तालुक्यातील गावागावात तब्बल ५ कोटी ६८ लाख  ८६ हजार ६०० रूपयांचा निधी अनुदानरुपी लाभार्थ्यांसाठी खर्च करण्यात आला आहे.                  माढा तालुक्यामध्ये टेंभुर्णी, उपळाई खु, मोडनिंब, कुर्डू, उपळाई बु, रोपळे, कव्हे, बेंबळे, पिंपळनेर, भोसरे अशी काही गावे मोठ्या लोकसंख्येची आहेत. त्यामुळे तालुका हगणदारीमुक्तीच्या १०० टक्के  शौचालयाच उद्दिष्ट पूर्तिसाठी   जि प चे अध्यक्ष संजय शिंदे, माढ्याचे सभापती विक्रम शिंदे ,स्वच्छ भारत मिशनचे तालुका समन्वयक ज्ञानेश्वर सुतार व ग्रामपंचायत कर्मचारी व पदाधिकारी हे वारंवार प्रबोधन करुन आत्तापर्यंत तब्बल ९१ टक्के गावे हगणदारीमुक्त केली आहेत. त्यासाठी स्वच्छता अभियान विभागाचे कामकाज वाढवून लाभार्थ्यांचे शौचालय बांधकामाचे अनुदान काम पूर्ण होताच त्वरित देण्याच्या पद्धतीमुळे व त्यांनी केलेल्या जनजागृतीमुळे सध्या तालुका हागणदारी मुक्त होण्याच्या शिखरावरती आहे.    तालुक्यातील हागणदारी मुक्ती कडे वाटचाल करणा-या व राहीलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे आहेत- मोडनिंब,टेंभूर्णी,कुर्डु,रोपळे( क),मानेगाव,तांदुळवाडी,उपळाई(बु),उपळाई( खु), दारफळ, सुलतापुर, म्हैंसगाव, कव्हे, वाकाव, वडशिंगे, परिते, अकोले( खु),अरण, चांदज,भोगेवाडी,मुंगशी, भुताष्टे, पिंपळनेर,आहेरगाव, बारलोणी, उजनी(मा), बेंबळे, घोटी,व व्होळे (खु),बारलोणी अशी आहेत.