शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जनधन योजनेमुळे ५० कोटी खाती तरीही ३० टक्के लोक बँकिंग सेवेपासून वंचितच

By appasaheb.patil | Updated: September 23, 2022 18:11 IST

कॉ. देविदास तुळजापूरकर यांचे विधान

सोलापूर : भारतातील बँकांचे राष्ट्रीयकरण झाले असून त्याचे मालक शासन आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी गर्भश्रीमंत लोकांनाच मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करीत असून त्यांच्याकडील थकीत कर्जाची आकडेवारीदेखील मोठी आहे. सामान्यांसाठी बँकांचे धोरण मात्र विकृतीचे आहे. बँकिंग धोरणाबाबत आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी आणि सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, असे प्रतिपादन बँक युनियन चळवळीचे अभ्यासक कॉम्रेड देविदास तुळजापूरकर (औरंगाबाद) यांनी केले.

शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियन, औरंगाबाद यांच्या सहकार्याने कॉम्रेड प्रभाकर यादव व्याख्यानमालेअंतर्गत कॉ. तुळजापूरकर यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी त्यांनी 'बँकांचे लोकशाहीकरण' या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. प्र-कलगुरू डॉ. राजेश गादेवार यांनी प्रास्ताविकात सर्वांचे स्वागत करून कॉम्रेड प्रभाकर यादव व्याख्यानमाले संदर्भात सविस्तर माहिती दिली. व्यासपीठावर कुलसचिव योगिनी घारे आणि बँक ऑफ महाराष्ट्र युनियनचे सरचिटणीस धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कॉ. तुळजापूरकर यांनी रिझर्व बँकेच्या तसेच शासनाच्या अन्य संकेतस्थळावरील आकडेवारीचा उहापोह करीत म्हणाले की, जनधन योजनेमुळे 50 कोटी नवीन खाती उघडण्यात आली. सर्वसामान्य ग्राहक बँकांशी जोडला गेला. आज देखील देशातील 25 ते 27 टक्के लोकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचली नाही. तंत्रज्ञानामुळे फार मोठा बदल बँकिंगच्या क्षेत्रात झाला असून त्याचा लाभ देखील होत आहे. मात्र उद्योगपती व गर्भ श्रीमंत लोकांनाच मोठ्या प्रमाणात कर्ज वाटण्यात आली आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बँकांची थकबाकी आहे. वास्तविक सामान्य जनतेला दिलेला कर्जाची टक्केवारी अतिशय कमी आहे. मोठ्या लोकांना कर्ज देण्याची स्पर्धा आहे. एक प्रकारची ही विकृती आहे, या विकृतीकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे कॉम्रेड तुळजापूरकर म्हणाले.

कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, श्रीमंतांना बँकांचा अधिक फायदा मिळतो. सर्वसामान्य ग्राहक हा राजा असे म्हटले जाते, पण प्रत्यक्षात तसे घडत नाही. ज्यांना कर्ज मिळते ते लवकर कर्ज परत करीत नाहीत. शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी याकडे लक्ष द्यावे. त्याकरिता बँकिंगमध्ये आमुलाग्र बदल होण्याची गरज आहे, असे ही डॉ. फडणवीस म्हणाल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती देवळे यांनी केले तर आभार सहायक कुलसचिव अनिल जाधव यांनी मानले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्र