शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

जनधन योजनेमुळे ५० कोटी खाती तरीही ३० टक्के लोक बँकिंग सेवेपासून वंचितच

By appasaheb.patil | Updated: September 23, 2022 18:11 IST

कॉ. देविदास तुळजापूरकर यांचे विधान

सोलापूर : भारतातील बँकांचे राष्ट्रीयकरण झाले असून त्याचे मालक शासन आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी गर्भश्रीमंत लोकांनाच मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करीत असून त्यांच्याकडील थकीत कर्जाची आकडेवारीदेखील मोठी आहे. सामान्यांसाठी बँकांचे धोरण मात्र विकृतीचे आहे. बँकिंग धोरणाबाबत आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी आणि सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, असे प्रतिपादन बँक युनियन चळवळीचे अभ्यासक कॉम्रेड देविदास तुळजापूरकर (औरंगाबाद) यांनी केले.

शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियन, औरंगाबाद यांच्या सहकार्याने कॉम्रेड प्रभाकर यादव व्याख्यानमालेअंतर्गत कॉ. तुळजापूरकर यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी त्यांनी 'बँकांचे लोकशाहीकरण' या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. प्र-कलगुरू डॉ. राजेश गादेवार यांनी प्रास्ताविकात सर्वांचे स्वागत करून कॉम्रेड प्रभाकर यादव व्याख्यानमाले संदर्भात सविस्तर माहिती दिली. व्यासपीठावर कुलसचिव योगिनी घारे आणि बँक ऑफ महाराष्ट्र युनियनचे सरचिटणीस धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कॉ. तुळजापूरकर यांनी रिझर्व बँकेच्या तसेच शासनाच्या अन्य संकेतस्थळावरील आकडेवारीचा उहापोह करीत म्हणाले की, जनधन योजनेमुळे 50 कोटी नवीन खाती उघडण्यात आली. सर्वसामान्य ग्राहक बँकांशी जोडला गेला. आज देखील देशातील 25 ते 27 टक्के लोकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचली नाही. तंत्रज्ञानामुळे फार मोठा बदल बँकिंगच्या क्षेत्रात झाला असून त्याचा लाभ देखील होत आहे. मात्र उद्योगपती व गर्भ श्रीमंत लोकांनाच मोठ्या प्रमाणात कर्ज वाटण्यात आली आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बँकांची थकबाकी आहे. वास्तविक सामान्य जनतेला दिलेला कर्जाची टक्केवारी अतिशय कमी आहे. मोठ्या लोकांना कर्ज देण्याची स्पर्धा आहे. एक प्रकारची ही विकृती आहे, या विकृतीकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे कॉम्रेड तुळजापूरकर म्हणाले.

कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, श्रीमंतांना बँकांचा अधिक फायदा मिळतो. सर्वसामान्य ग्राहक हा राजा असे म्हटले जाते, पण प्रत्यक्षात तसे घडत नाही. ज्यांना कर्ज मिळते ते लवकर कर्ज परत करीत नाहीत. शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी याकडे लक्ष द्यावे. त्याकरिता बँकिंगमध्ये आमुलाग्र बदल होण्याची गरज आहे, असे ही डॉ. फडणवीस म्हणाल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती देवळे यांनी केले तर आभार सहायक कुलसचिव अनिल जाधव यांनी मानले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्र