शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याला तीन कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:21 IST

कुर्डूवाडी : केंद्र सरकारच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात कुर्डूवाडी शहरातील रेल्वे कारखान्याला नवीन दोन शेड निर्मितीसाठी, संरक्षण भिंत बांधकामासाठी ...

कुर्डूवाडी : केंद्र सरकारच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात कुर्डूवाडी शहरातील रेल्वे कारखान्याला नवीन दोन शेड निर्मितीसाठी, संरक्षण भिंत बांधकामासाठी आणि इतर काही कामांसाठी तब्बल तीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त येथील रेल्वे कारखान्याकडून जर काही प्रस्तावित कामे रेल्वे बोर्डाकडे दाखल झाल्यास त्याला आणखी काही वेगळा निधीही देण्यास केंद्रीय रेल्वे विभागाने अर्थसंकल्पात हिरवा कंदील दाखविला आहे.

याबरोबरच येथील कारखान्यात ५११ अधिकारी, कर्मचारी व इतर वर्गांच्या विविध पदांची भरतीही रेल्वेच्या आरआरसीमार्फत लवकरच करण्यात येईल,येथील रेल्वे गेटच्या भुयारी मार्गासाठीही अर्थसंकल्पात निधी उपलब्ध केला आहे. त्याचेही रखडलेले काम सहा महिन्यांत पूर्ण केले जाईल अशी मंजुरी केंद्रीय अर्थसंकल्पात दिल्याने येथील रेल्वे कारखान्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच, रेल्वे कारखाना संघर्ष समिती व सर्वसामान्य नागरिकांत आनंद व्यक्त होत आहे. यामुळे एकेकाळी मोडकळीस चाललेला व स्थलांतरित होणार की काय अशा परिस्थितीत असणारा रेल्वे कारखाना आता नव्याने ऊर्जावस्थेत येत असल्याने शहरवासीयांनाही या रेल्वे कारखान्याविषयी भविष्य वाटू लागले आहे.

येथील रेल्वे कारखान्याविषयी शहरातील अनेक पक्षांच्या लोकनेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी दिल्ली वाऱ्या केलेल्या आहेत. येथील कारखाना स्थलांतरित होऊ नये यासाठी आंदोलनेही झाली. याबाबत रेल्वे कारखान्याचे उपमुख्य यांत्रिकी अभियंता संजय साळवे यांच्याशी संवाद साधला असता कारखान्याला निधी मिळणे हे अपेक्षितच आहे. त्यांनी मिळालेल्या निधीबद्दल वरिष्ठांचे आभार मानले. यामुळे भविष्यात जोमाने काम करू असे त्यांनी सांगितले.

----

कारखान्याला भविष्यात खूप निधी येणार आहे. शहराचे पुन्हा नंदनवन होणार आहे. येथील कारखान्याला एकदा रेल्वे मंत्र्यांनी भेट द्यावी अशी अपेक्षा आहे.

- महेंद्र जगताप

कामगार नेते

----

नोकरभरतीत स्थानिकांना संधी द्या

सोलापूर रेल्वे विभागातील कुर्डूवाडी रेल्वे वर्कशॉप साठी रेल्वे रिकृटमेंट बोर्डाने सध्या २१ जागांसाठी जाहिरात नुकतीच काढली आहे. या जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत ही ६ फेब्रुवारी पासून ५ मार्चपर्यंत आहे. रेल्वेने येथील रेल्वे कारखान्यात विविध पदांच्या ५११ जागा भरण्यात येणार आहे. त्यात या २१ जागा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होताच काढल्या आहेत. यात स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे.