शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

सोलापूर जिल्ह्यातील जलयुक्तसाठी २६५ गावांची निवड

By admin | Updated: March 18, 2017 19:56 IST

सोलापूर जिल्ह्यातील जलयुक्तसाठी २६५ गावांची निवड

सोलापूर जिल्ह्यातील जलयुक्तसाठी २६५ गावांची निवडजलयुक्त शिवार अभियान: अक्कलकोट तालुक्यातील सर्वाधिक गावांचा समावेशसोलापूर :- जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ या वर्षाकरिता जिल्ह्यातील २६५ गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या गावांची निवड करण्यात आल्याचे अभियानाचे सदस्य सचिव तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी कळविले आहे. यामध्ये सर्वाधित ५३ गावे अक्कलकोट तालुक्यातील असून सर्वात कमी, सात गावे उत्तर सोलापूर तालुक्यातील आहेत.जलयुक्त शिवार अभियानात २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २८० तर २०१६-१७ मध्ये २६५ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांत जलसंधारणाची विविध कामे पूर्ण करण्यात आली आहेत. निवडलेल्या गावांत कामांसाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार २३ मार्च २०१७ पर्यंत शिवार भेट, पाण्याचा ताळेबंद तयार करणे, गाव कृती आराखडा तयार करणे, जिल्हा समितीची मान्यता घेणे आदी कामे करणे अपेक्षित आहे. ३१ मार्च पर्यंत कामांचे सर्व्हेंक्षण करणे, अंदाजपत्रक तयार करणे आदी कामे पूर्ण करायची आहेत.५ एप्रिल पर्यंत कामांचे कायार्देश निर्गमित करणे अपेक्षित आहे. शिवार भेटी दरम्यान आणि गावपातळी वरील आराखडा तयार करण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतीशिल शेतकरी उपस्थित राहतील. याची संबंधित अधिका-यांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बिराजदार यांनी सर्व संबंधित अधिका-यांना केले आहे.

 

----------------------------------------------------निवडण्यात आलेली तालुकानिहाय गावे पुढीलप्रमाणे : - उत्तर सोलापूर (७ गावे) - खेड, शिवणी, ति-हे, बाणेगांव, हगलूर, साखरेवाडी, बेलाटी,-दक्षिण सोलापूर (२६ गावे) - राजूर, सिंदखेड, वडकबाळ, औराद, वरळेगांव, उळेवाडी, बक्षिहिप्परगे, पिंजारवाडी, दर्गनहळ्ळी,, दोडृडी, शिर्पनहळ्ळी, गंगेवाडी,, औज, आ. हिपळे, रामपूर, कर्देहळृळी, लिंबिचिंचोळी,तिल्लेहाळ, शिरवळ, शिगंडवाडी, आलेगांव, कंदलगांव, गावडेवाडी, वोंगी, वडजी, फताडेवाडी, गुर्देहळ्ळी, तोगराळी, होटगी (स्टे), बसवनगर, मनगोळी, अकोले म. चंद्रहाळ, बरुर, बंदलगी, बोलकवठा.-अक्कलकोट (५३ गावे)- जेऊर, घुंगरेगांव, पितापुर, करजगी, कडबगांव, ब्यागीहळ्ळी, चपळगांववाडी, दर्शनाळ, किणीवाडी, किणी, जेऊरवाडी, सुलेर जवळगे, तोळणुर, दुधनी, कोळीबेट, ममदाबाद, काळेगांव, आंदेवाडी, ज. बादोले खु. हैद्रा, हंजगी, मैंदर्गी, साफळे, शिरवळ, हिंगणी, हत्तीकणबस, अरळी, शावळ, बोरेगांव, आकतनाळ, मिरजगी, वागदरी, सांगवी खु., रामपुर, काझीकणबस, नागणसुर, कोन्हाळी, सदलापुर, भुरीकवठा, पालापूर, निमगांव, उमरगे, करनुर, जैनापुर, नाविंदगी, गौडगांव खु, मुंढेवाडी, कलहिप्परगे, शिरवळवाडी, गौडगांव बु., बोरगांव, खैराट, गोगांव, -मोहोळ (२७)- वाळूज, करणवाडी (आ), वाफळे, शेटफळ,सिध्देवाडी, तांबोळे, न. पिंपरी, कोन्हेरी, मोरवंची, चिंचाली, म. चौधरी , बोपले, सोहाळे, वाघोली, कामती खु, कामती बु. जामगांव बु, जामगांव खु, पीरटाकळी, हराळवाडी, वडवळ, शिरापुर (सो), वाघोलीवाडी, बैरागवाडी, कातेवाडी, घोरपडी, लमाणतांडा, - माढा (२१)-बारलोणी, कुडुवार्डी, अंबाड, रिधोरे, तांदुळवाडी, आलेगांव खु, रुई, टाकळी टे., आलेगांव बु, निमगांव टे, बादलेवाडी, उपळवटे, चांदज, दहिवली, कन्हेरगांव, वडोली, उंदरगांव, बुद्रुकवाडी, सुलतानपुर, शिंदेवाडी, जाखले -करमाळा (२४ गावे)- भोसे, रोशेवाडी, देवीचा माळ, भिलारवाडी,वरकटणे, सरपडोह, कुंभेज, निंभोरी, झरे, देवळाली,खडकेवाडी, मिरगव्हाण, निलज, पांगरे, दिवेगव्हाण, गोरेवाडी, हुलगेवाडी, शेटफळ, भगतवाडी, शेलगांव (क), कावळवाडी, कोळगांव, गौंडरे, भाळवणी,- बार्शी (४२ गावे)- बोरगांव झा, रऊळगांव, गाताचीवाडी, नागोबाचीवाडी,लक्ष्याचीवाडी, कसळंब, ढेंबरेवाडी,मालेगांव,ज्योतीबाचीवाडी,उपळे दु, सासुरे, रुई, मिर्झनपुर, संगमनेर, शेळगांव आर, मानेगांव, रातंजन, मुंगशी वा, इलेवार्डी, जवळगांव, काळेगांव, तुर्कपिंपरी, खडकोणी, चुंब, काटेगांव, कोरेगांव, शेळगांव मा, तांबेवाडी, कापसी, जामगांव आ, राळेरास, धामनगांव दु,कासारवाडी, उंबरगे, श्रीपतपिंपरी, शेंद्री, वांगरवाडी, बार्शी, वैराग, झरेगांव, निंबळक, सजार्पूर, -पंढरपूर (१५गावे)-पळशी, सुपली, वाडी करोली, शेळवे, उपरी, लेणार वाडी, कासेगांव, एकलासपूर, ओझेवाडी, नेपतगांव, शिरगांव, नारायण चिंचोली, मगरवाडी, गुरसाळे, टाकळी, -सांगोला (१२गावे)- सोमेवाडी, बंडगरवाडी ( चोपडी), गायगव्हाण, खिलारवाडी, उदनवाडी, हाबिसेवाडी, शिरभावी, मेधवडे, बामणी, संगेवाडी, देवळे, गोडसेवाडी, - मंगळवेढा (१० गावे)- बोराळे, मुंढेवाडी, डोणज, भालेवाडी, फटेवाडी, मंगळवेढा, मुढवी, उचेढाण, बठाण, माचणूर, - माळशिरस (१८ गावे) - मोटेवाडी(मा),सदाशिवनगर,वेळापूर, पिलीव, कोळेगांव, नातेपुते, चौदेश्वरवाडी, गिरझणी, बागेवाडी,दहिगांव, कोंडबावी, काळमवाडी, निमगांव, खंडाळी, माळखांबी, माळशिरस, कन्हेर, फोंडशिरस.--------------------------असे आहे नियोजनजलयुक्त शिवार अभियानासाठी निवडलेल्या गावामध्ेय २३ मार्च २०१७ पर्यंत शिवार भेट, पाण्याचा ताळेबंद तयार करणे, गाव कृती आराखडा तयार करणे, जिल्हा समितीची मान्यता घेणे आदी कामे करणे अपेक्षित आहे. ३१ मार्च पर्यंत कामांचे सर्व्हेंक्षण करणे, अंदाजपत्रक तयार करणे आदी कामे पूर्ण करायची आहेत.५ एप्रिल पर्यंत कामांचे कायार्देश निर्गमित करणे अपेक्षित आहे. शिवार भेटी दरम्यान आणि गावपातळी वरील आराखडा तयार करण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतीशिल शेतकरी उपस्थित राहतील असे नियोजन जिल्हा कृषी विभागाने केले आहे़