शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

२१६० जागा अतिरिक्त; सर्व विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

By admin | Updated: June 18, 2014 01:03 IST

प्रवेश क्षमता ५५,५२० : उत्तीर्ण झाले ५२ हजार ८५४

सोलापूर : इयत्ता दहावी परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात ५२ हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या सर्व विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण जिल्ह्यातील ३४४ कनिष्ठ महाविद्यालयांतील एकूण प्रवेश क्षमता ५५ हजार ५२० इतकी आहे.मार्च २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ७५.२४ टक्के इतका लागला होता. यंदा मात्र यामध्ये १४.१३ टक्क्यांनी वाढ होऊन हा निकाल ८९.३७ टक्क्यांवर गेला आहे.सोलापूर शहरात अनुदानित व विनाअनुदानित कला शाखेच्या ६४ तुकड्या असून प्रवेश क्षमता ५६४० इतकी आहे. विज्ञान शाखेच्या ५० तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता ४४८० आहे. वाणिज्य शाखेच्या ३६ तुकड्या असून प्रवेश क्षमता ३३२० इतकी आहे. संयुक्त शाखेच्या ५ तुकड्या असून प्रवेश क्षमता ४०० इतकी आहे.सोलापूर शहरात आॅर्किड, सोनी, सेवासदन ही कनिष्ठ महाविद्यालये स्वयं अर्थसहाय्यित असून यामध्ये कला शाखेची एक तुकडी असून तिची प्रवेश क्षमता ८० आहे. विज्ञान शाखेच्या २ तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता १६० इतकी आहे. वाणिज्य शाखेच्या २ तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता १६० इतकी आहे.उर्वरित जिल्ह्यातील अनुदानित व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला शाखेच्या २६२ तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता २२ हजार ४००, विज्ञान शाखेच्या १३२ तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता ११ हजार ४४० आहे. वाणिज्य शाखेच्या २६ तुकड्या असून प्रवेश क्षमता २ हजार ५२० इतकी आहे. संयुक्त शाखेच्या २० तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता १६०० इतकी आहे.जिल्ह्यात स्वयं अर्थसहाय्यित कला शाखेच्या १७ तुकड्या आहेत. तिची प्रवेश क्षमता १५६० आहे. विज्ञान शाखेच्या २० तुकड्या असून प्रवेश क्षमता १६०० आहे. वाणिज्य शाखेच्या २ तुकड्या असून प्रवेश क्षमता १६० इतकी आहे. -----------------------------अकरावी प्रवेश वेळापत्रकदहावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी शिक्षणाधिकरी एल. एस. पोले यांनी वेळापत्रक जाहीर केले आहे. ते याप्रमाणेदि. २० ते २८ जून : कॉलेजस्तरावर प्रवेश अर्ज वाटप२४ ते २८ जून : भरलेले अर्ज संबंधित कॉलेजकडे सादर करणे२९ जून ते २ जुलै : कॉलेजस्तरावर प्रवेश अर्जांची छाननी३ जुलै : पहिली गुणवत्ता यादी ३ ते ५ जुलै : पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश८ जुलै : दुसरी गुणवत्ता यादी८ ते ९ जुलै : दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश१० जुलै : जागा रिक्त असल्यास तिसरी गुणवत्ता यादी१० ते १२ जुलै : तिसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश--------------------------------------प्रवेश सुकरइयत्ता दहावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील ५२ हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग सुकर झाला असून एकूण प्रवेश क्षमता ५५ हजार ५२० इतकी आहे. कला शाखेच्या ३४४ तुकड्या असून प्रवेश क्षमता २९ हजार ६८० आहे. विज्ञान शाखेच्या २०४ तुकड्या असून प्रवेश क्षमता १७ हजार ६८० आहे. वाणिज्य शाखेच्या ६६ तुकड्या असून प्रवेश क्षमता ६ हजार १६० इतकी आहे. संयुक्त शाखेच्या २५ तुकड्या असून प्रवेश क्षमता २ हजार इतकी आहे.-----------------------------१९ जूनला बैठकअकरावी प्रवेशाबाबत शहर व जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राचार्यांची गुरुवार, दि. १९ जून रोजी दुपारी १२ वाजता जुनी मिल कंपाउंड येथील नागेश करजगी आॅर्किड स्कूल येथे बैठक बोलाविण्यात आली आहे. यावेळी अकरावी प्रवेशाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. १२ जुलैपर्यंत अकरावी प्रवेश प्रक्रिया चालणार असून कॉॅलेजचे नियमित वर्ग १४ जुलैपासून सुरु करण्यात येणार असल्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एल. एस. पोले यांनी सांगितले.