शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

२१६० जागा अतिरिक्त; सर्व विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

By admin | Updated: June 18, 2014 01:03 IST

प्रवेश क्षमता ५५,५२० : उत्तीर्ण झाले ५२ हजार ८५४

सोलापूर : इयत्ता दहावी परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात ५२ हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या सर्व विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण जिल्ह्यातील ३४४ कनिष्ठ महाविद्यालयांतील एकूण प्रवेश क्षमता ५५ हजार ५२० इतकी आहे.मार्च २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ७५.२४ टक्के इतका लागला होता. यंदा मात्र यामध्ये १४.१३ टक्क्यांनी वाढ होऊन हा निकाल ८९.३७ टक्क्यांवर गेला आहे.सोलापूर शहरात अनुदानित व विनाअनुदानित कला शाखेच्या ६४ तुकड्या असून प्रवेश क्षमता ५६४० इतकी आहे. विज्ञान शाखेच्या ५० तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता ४४८० आहे. वाणिज्य शाखेच्या ३६ तुकड्या असून प्रवेश क्षमता ३३२० इतकी आहे. संयुक्त शाखेच्या ५ तुकड्या असून प्रवेश क्षमता ४०० इतकी आहे.सोलापूर शहरात आॅर्किड, सोनी, सेवासदन ही कनिष्ठ महाविद्यालये स्वयं अर्थसहाय्यित असून यामध्ये कला शाखेची एक तुकडी असून तिची प्रवेश क्षमता ८० आहे. विज्ञान शाखेच्या २ तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता १६० इतकी आहे. वाणिज्य शाखेच्या २ तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता १६० इतकी आहे.उर्वरित जिल्ह्यातील अनुदानित व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला शाखेच्या २६२ तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता २२ हजार ४००, विज्ञान शाखेच्या १३२ तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता ११ हजार ४४० आहे. वाणिज्य शाखेच्या २६ तुकड्या असून प्रवेश क्षमता २ हजार ५२० इतकी आहे. संयुक्त शाखेच्या २० तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता १६०० इतकी आहे.जिल्ह्यात स्वयं अर्थसहाय्यित कला शाखेच्या १७ तुकड्या आहेत. तिची प्रवेश क्षमता १५६० आहे. विज्ञान शाखेच्या २० तुकड्या असून प्रवेश क्षमता १६०० आहे. वाणिज्य शाखेच्या २ तुकड्या असून प्रवेश क्षमता १६० इतकी आहे. -----------------------------अकरावी प्रवेश वेळापत्रकदहावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी शिक्षणाधिकरी एल. एस. पोले यांनी वेळापत्रक जाहीर केले आहे. ते याप्रमाणेदि. २० ते २८ जून : कॉलेजस्तरावर प्रवेश अर्ज वाटप२४ ते २८ जून : भरलेले अर्ज संबंधित कॉलेजकडे सादर करणे२९ जून ते २ जुलै : कॉलेजस्तरावर प्रवेश अर्जांची छाननी३ जुलै : पहिली गुणवत्ता यादी ३ ते ५ जुलै : पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश८ जुलै : दुसरी गुणवत्ता यादी८ ते ९ जुलै : दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश१० जुलै : जागा रिक्त असल्यास तिसरी गुणवत्ता यादी१० ते १२ जुलै : तिसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश--------------------------------------प्रवेश सुकरइयत्ता दहावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील ५२ हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग सुकर झाला असून एकूण प्रवेश क्षमता ५५ हजार ५२० इतकी आहे. कला शाखेच्या ३४४ तुकड्या असून प्रवेश क्षमता २९ हजार ६८० आहे. विज्ञान शाखेच्या २०४ तुकड्या असून प्रवेश क्षमता १७ हजार ६८० आहे. वाणिज्य शाखेच्या ६६ तुकड्या असून प्रवेश क्षमता ६ हजार १६० इतकी आहे. संयुक्त शाखेच्या २५ तुकड्या असून प्रवेश क्षमता २ हजार इतकी आहे.-----------------------------१९ जूनला बैठकअकरावी प्रवेशाबाबत शहर व जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राचार्यांची गुरुवार, दि. १९ जून रोजी दुपारी १२ वाजता जुनी मिल कंपाउंड येथील नागेश करजगी आॅर्किड स्कूल येथे बैठक बोलाविण्यात आली आहे. यावेळी अकरावी प्रवेशाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. १२ जुलैपर्यंत अकरावी प्रवेश प्रक्रिया चालणार असून कॉॅलेजचे नियमित वर्ग १४ जुलैपासून सुरु करण्यात येणार असल्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एल. एस. पोले यांनी सांगितले.