शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

१८ साखर कारखान्यांनी अद्याप एकही हप्ता दिला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST

सोलापूर : जिल्ह्यात यंदा २९ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असला तरी दोन महिने उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात रकमा ...

सोलापूर : जिल्ह्यात यंदा २९ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असला तरी दोन महिने उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात रकमा जमा झाल्या नाहीत. जिल्ह्यातील केवळ ११ कारखान्यांनी १५ डिसेंबरपर्यंत पहिल्या हप्त्याची रक्कम अदा केली आहे.

ऑक्टोबर महिन्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला. बहुतेक कारखाने पूर्ण क्षमतेने गाळप करीत आहेत. दोन महिने उलटून गेले; परंतु १८ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर बिलाच्या रकमा जमा केलेल्या नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी १५ डिसेंबरपर्यंत रकमा जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशाला कारखान्यांनी दाद दिली नाही. सोलापूर परिसरातील कारखाने नेहमीप्रमाणे सिद्धेश्वर कारखान्याकडे बोट दाखवत आहेत. पहिले कौन या मुद्द्यावर एफआरपी देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

-------

१५ डिसेंबरपर्यंत रकमा दिलेले कारखाने

पांडुरंग, श्रीपूर २१००

सहकारमहर्षी, अकलूज- १९००

विठ्ठलराव शिंदे -२०००

कूर्मदास, लउळ २०६७

लोकनेते, अनगर - १८००

सासवडमाळी - २०००

विठ्ठल कार्पोरेशन -२०२८

भैरवनाथ २ विहाळ -२०००

युटोपीयन शुगर - १७००

विठ्ठलराव शिंदे युनिट २- २०००

भीमा टाकळी - २०००

-------------

एफआरपीचा कायदा सांगतो....

ऊस नियंत्रण आदेश १९६६नुसार गाळपाला ऊस पुरवठा केल्यानंतर १४ दिवसांच्या आत निश्चित केलेली एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे बंधनकारक आहे. रकमा निर्धारित कालावधीत जमा केल्या नाहीत तर त्या रकमेवर द.सा.द.शे. १५ टक्के दराने व्याज देण्याची सक्ती आहे.

----------

३०५ कोटी शेतकऱ्यांना देय

गाळप हंगाम सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामातील एफआरपीनुसार ५८९.८० कोटी देय होते. ११ कारखान्यांनी २८२.५४ कोटी रुपये आतापर्यंत अदा केले असून, १८ कारखाने शेतकऱ्यांचे ३०५.३५ कोटी रुपये देणे लागतात.

-----

कारखानदारांच्या अडचणी

बँका कारखान्यांना खेळत्या भांडवलासाठी कर्ज देताना हात आखडता घेत आहेत. कारखान्यांची इतर कर्ज खाती एनपीएमध्ये गेल्याने मंजूर कर्जातून रकमा अशा खात्यावर वळवून घेत आहेत. केंद्र सरकारने साखर विक्रीसाठी ठरवून दिलेला कोटा विकला जात नाही, बाजारात साखर विक्रीचे दर कमी झाल्याने कारखानदार साखर विक्रीसाठी धजावत नाहीत. साखरेचा साठा असतानाही रकमा उपलब्ध होत नाहीत. एफआरपीनुसार रकमा देता येत नसले तरी गरजेप्रमाणे शेतकऱ्यांना काही कारखाने ॲडव्हान्स देत आहेत.

----