शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

१८ साखर कारखान्यांनी अद्याप एकही हप्ता दिला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST

सोलापूर : जिल्ह्यात यंदा २९ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असला तरी दोन महिने उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात रकमा ...

सोलापूर : जिल्ह्यात यंदा २९ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असला तरी दोन महिने उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात रकमा जमा झाल्या नाहीत. जिल्ह्यातील केवळ ११ कारखान्यांनी १५ डिसेंबरपर्यंत पहिल्या हप्त्याची रक्कम अदा केली आहे.

ऑक्टोबर महिन्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला. बहुतेक कारखाने पूर्ण क्षमतेने गाळप करीत आहेत. दोन महिने उलटून गेले; परंतु १८ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर बिलाच्या रकमा जमा केलेल्या नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी १५ डिसेंबरपर्यंत रकमा जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशाला कारखान्यांनी दाद दिली नाही. सोलापूर परिसरातील कारखाने नेहमीप्रमाणे सिद्धेश्वर कारखान्याकडे बोट दाखवत आहेत. पहिले कौन या मुद्द्यावर एफआरपी देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

-------

१५ डिसेंबरपर्यंत रकमा दिलेले कारखाने

पांडुरंग, श्रीपूर २१००

सहकारमहर्षी, अकलूज- १९००

विठ्ठलराव शिंदे -२०००

कूर्मदास, लउळ २०६७

लोकनेते, अनगर - १८००

सासवडमाळी - २०००

विठ्ठल कार्पोरेशन -२०२८

भैरवनाथ २ विहाळ -२०००

युटोपीयन शुगर - १७००

विठ्ठलराव शिंदे युनिट २- २०००

भीमा टाकळी - २०००

-------------

एफआरपीचा कायदा सांगतो....

ऊस नियंत्रण आदेश १९६६नुसार गाळपाला ऊस पुरवठा केल्यानंतर १४ दिवसांच्या आत निश्चित केलेली एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे बंधनकारक आहे. रकमा निर्धारित कालावधीत जमा केल्या नाहीत तर त्या रकमेवर द.सा.द.शे. १५ टक्के दराने व्याज देण्याची सक्ती आहे.

----------

३०५ कोटी शेतकऱ्यांना देय

गाळप हंगाम सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामातील एफआरपीनुसार ५८९.८० कोटी देय होते. ११ कारखान्यांनी २८२.५४ कोटी रुपये आतापर्यंत अदा केले असून, १८ कारखाने शेतकऱ्यांचे ३०५.३५ कोटी रुपये देणे लागतात.

-----

कारखानदारांच्या अडचणी

बँका कारखान्यांना खेळत्या भांडवलासाठी कर्ज देताना हात आखडता घेत आहेत. कारखान्यांची इतर कर्ज खाती एनपीएमध्ये गेल्याने मंजूर कर्जातून रकमा अशा खात्यावर वळवून घेत आहेत. केंद्र सरकारने साखर विक्रीसाठी ठरवून दिलेला कोटा विकला जात नाही, बाजारात साखर विक्रीचे दर कमी झाल्याने कारखानदार साखर विक्रीसाठी धजावत नाहीत. साखरेचा साठा असतानाही रकमा उपलब्ध होत नाहीत. एफआरपीनुसार रकमा देता येत नसले तरी गरजेप्रमाणे शेतकऱ्यांना काही कारखाने ॲडव्हान्स देत आहेत.

----